शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

पालकमंत्र्यांनी केली पीक नुकसानाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 18:22 IST

सर्वप्रथम पालकमंत्री डॉ. पाटील यांनी कान्हेरी सरप येथील सोयाबीनच्या शेताला भेट दिली.

अकोला  जिल्ह्यात 19 ते 29 ऑक्टोंबर या कालावधीत अवकाळी पावसामुळे 100 टक्के शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान झाले असल्याचे निर्देशनात आले आहेत. सरसकट नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधीताना दिले. जिल्हाधिकारी यांच्या दालनात अवकाळी पाऊस व शेतीपिकांच्या नुकसानीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपसंचालक कृषी अरुण वाघमारे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोंखडे, विमा कंपणीचे जिल्हा समन्वय डि.एस. सपकाळ, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला असेल अशा शेतकऱ्यांना त्याचा अर्ज असो अथवा नसो विमा योजनेचा सरसकट लाभ देण्यात यावा, असे निर्देश विमा कंपणीच्या अधिकाऱ्यांना दिले. विमा कंपणीकडून मदत प्राप्त झाल्यास ती अविलंब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी यासाठी पुर्व तयारी व अधिक मार्गदर्शन आताच विमा कंपणीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मागवून घ्यावे व शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.

 जिल्हयातील 2 लक्ष 66 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला असून आतापर्यंत 48 हजार शेतकऱ्यांचे पिक विमा नुकसान अर्ज प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांनी पिक विमा नुकसान अर्ज कृषी सहाय्यक किवा तहसिलदाराकडे जमा करावेत असे आवाहन पालकमंत्री यांनी केले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा  व तालुकास्तरावर मदत कक्ष तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी  जिल्हा प्रशासनाला दिले. विविध सेवा सहकारी संस्थाच्या 412 गट सचिवामार्फत पिक विमा नुकसान अर्ज जमा करण्यात येत आहे. तरी विमा धारक शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील गट सचिवाची संपर्क साधावा असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.  अवकाळी पावसामुळे आलेल्या आपत्तीमध्ये जिल्हयात 6 व्यक्तीना मृत्यू आला असून त्यापैकी 5 व्यक्तीना शासकीय मदत देण्यात आली आहे. बाळापूर तालुक्यातील 1 व्यक्ती पुरात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीच्या कुटूंबाला त्वरीत मदत देण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिलेत.

नुकसानग्रस्‍त शेतीची पाहणी

ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत करांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी  पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज शनिवारी (दि. 2) केली. शेतकऱ्यांच्या शेतात भेट देऊन पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे सांत्वन केले. शासनाकडून सात बारा असलेल्या शेतकऱ्यांना सर्वेक्षण करुन मदत करण्यात येईल असे आश्वासन देवून त्यांना आश्वत केले.  यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, कृषी उपसंचालक अरुण वाघमारे तसेच इतर अधिकारी होते.

सर्वप्रथम पालकमंत्री डॉ. पाटील यांनी कान्हेरी सरप येथील सोयाबीनच्या शेताला भेट दिली. शेतात सोंगुण ठेवलेल्या सोयाबीनचे पीकांच्या गंजीला अवकाळी पावसामुळे खराब होवून सोयाबिन कुजून गेले आहे तसेच त्यांना कोंब फुटले आहेत. शेतातील ज्वारीच्या कणसाना बुर्शी लागून खराब झाले आहे.आळंदा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनला कोंब फुटले  आहे. असे निदर्शनात आले असून कापशी तलाव येथील कपाशीच्या पीकांचे अति पावसामुळे बोंड खराब झाल्यामुळे नुकसान झालेले आहे. बाळापूर तालुक्यातील गायगाव,  निमकर्दा, मोरगांव सादीजन तसेच तेल्हारा तालुक्यातील दहीगाव या गावाच्या शेत शिवाराला भेट देवून पालकमंत्री डॉ. पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी  केली. जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, ज्वारी व तूर  पिकांचे अतोनात नुकसान झाले असून सरसकट नुकसान भरपाई चे प्रस्ताव  पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत शासन कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील