शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

पालकमंत्र्यांनी केली पीक नुकसानाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 18:22 IST

सर्वप्रथम पालकमंत्री डॉ. पाटील यांनी कान्हेरी सरप येथील सोयाबीनच्या शेताला भेट दिली.

अकोला  जिल्ह्यात 19 ते 29 ऑक्टोंबर या कालावधीत अवकाळी पावसामुळे 100 टक्के शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान झाले असल्याचे निर्देशनात आले आहेत. सरसकट नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधीताना दिले. जिल्हाधिकारी यांच्या दालनात अवकाळी पाऊस व शेतीपिकांच्या नुकसानीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपसंचालक कृषी अरुण वाघमारे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोंखडे, विमा कंपणीचे जिल्हा समन्वय डि.एस. सपकाळ, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला असेल अशा शेतकऱ्यांना त्याचा अर्ज असो अथवा नसो विमा योजनेचा सरसकट लाभ देण्यात यावा, असे निर्देश विमा कंपणीच्या अधिकाऱ्यांना दिले. विमा कंपणीकडून मदत प्राप्त झाल्यास ती अविलंब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी यासाठी पुर्व तयारी व अधिक मार्गदर्शन आताच विमा कंपणीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मागवून घ्यावे व शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.

 जिल्हयातील 2 लक्ष 66 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला असून आतापर्यंत 48 हजार शेतकऱ्यांचे पिक विमा नुकसान अर्ज प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांनी पिक विमा नुकसान अर्ज कृषी सहाय्यक किवा तहसिलदाराकडे जमा करावेत असे आवाहन पालकमंत्री यांनी केले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा  व तालुकास्तरावर मदत कक्ष तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी  जिल्हा प्रशासनाला दिले. विविध सेवा सहकारी संस्थाच्या 412 गट सचिवामार्फत पिक विमा नुकसान अर्ज जमा करण्यात येत आहे. तरी विमा धारक शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील गट सचिवाची संपर्क साधावा असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.  अवकाळी पावसामुळे आलेल्या आपत्तीमध्ये जिल्हयात 6 व्यक्तीना मृत्यू आला असून त्यापैकी 5 व्यक्तीना शासकीय मदत देण्यात आली आहे. बाळापूर तालुक्यातील 1 व्यक्ती पुरात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीच्या कुटूंबाला त्वरीत मदत देण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिलेत.

नुकसानग्रस्‍त शेतीची पाहणी

ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत करांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी  पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज शनिवारी (दि. 2) केली. शेतकऱ्यांच्या शेतात भेट देऊन पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे सांत्वन केले. शासनाकडून सात बारा असलेल्या शेतकऱ्यांना सर्वेक्षण करुन मदत करण्यात येईल असे आश्वासन देवून त्यांना आश्वत केले.  यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, कृषी उपसंचालक अरुण वाघमारे तसेच इतर अधिकारी होते.

सर्वप्रथम पालकमंत्री डॉ. पाटील यांनी कान्हेरी सरप येथील सोयाबीनच्या शेताला भेट दिली. शेतात सोंगुण ठेवलेल्या सोयाबीनचे पीकांच्या गंजीला अवकाळी पावसामुळे खराब होवून सोयाबिन कुजून गेले आहे तसेच त्यांना कोंब फुटले आहेत. शेतातील ज्वारीच्या कणसाना बुर्शी लागून खराब झाले आहे.आळंदा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनला कोंब फुटले  आहे. असे निदर्शनात आले असून कापशी तलाव येथील कपाशीच्या पीकांचे अति पावसामुळे बोंड खराब झाल्यामुळे नुकसान झालेले आहे. बाळापूर तालुक्यातील गायगाव,  निमकर्दा, मोरगांव सादीजन तसेच तेल्हारा तालुक्यातील दहीगाव या गावाच्या शेत शिवाराला भेट देवून पालकमंत्री डॉ. पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी  केली. जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, ज्वारी व तूर  पिकांचे अतोनात नुकसान झाले असून सरसकट नुकसान भरपाई चे प्रस्ताव  पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत शासन कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील