शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

महिलांवरील अत्याचाराबाबत मोदींचे मौन - पृथ्वीराज चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:19 IST

कोणत्याही घटनेवर अवघ्या दोन मिनिटात टिष्ट्वट करणारे मोदी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर मौन का राहतात. त्यातून देशातील महिला किती असुरक्षित आहेत, हे अधोरेखित होत आहे, या गंभीर विषयावर राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी अकोल्यात लक्ष वेधले.

अकोला : भाजप पदाधिकारी, आमदार, खासदारांनी महिलांवर अत्याचार केल्याचे प्रकार पुढे आल्यानंतरही प्रधानमंत्री मोदी यांनी कोणतीही प्रतिक्रिया अथवा कारवाईसाठी दखलही घेतली नाही, कोणत्याही घटनेवर अवघ्या दोन मिनिटात टिष्ट्वट करणारे मोदी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर मौन का राहतात. त्यातून देशातील महिला किती असुरक्षित आहेत, हे अधोरेखित होत आहे, या गंभीर विषयावर राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी अकोल्यात लक्ष वेधले. जिल्हा पत्रकार संघाने आयोजित केलेल्या मिट द प्रेसमध्ये त्यांनी विविध मुद्यांवर मते मांडली.२०१४ मध्ये भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, या घोषणेवर विश्वास ठेवून जनतेने भाजपला सत्ता दिली. प्रत्यक्षात आता होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या बातम्याही प्रसारमाध्यमांनी देऊ नये, एवढे दबावतंत्र वापरले जात आहे. राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचाराच्या बातम्या न येण्यासाठी हे तंत्र वापरले जात आहे; मात्र प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यातही ज्या चार न्यायाधिशांनी बंड केले होते, त्यापैकी एक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. त्यामुळे लोकशाही शाबूत ठेवण्याचे काम सर्वोच्च न्यायालय करेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला. विरोधकांना संपवण्यासाठी कारवाईचा धाक दाखवत भाजपमध्ये सामिल करून घेतले जात आहे. त्यामध्ये एकाचवेळी तीन राज्याचे माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये गेल्याचे उदाहरणही त्यांनी दिले.सध्या हुकूमशाही पद्धतीने देशातील अनेक संस्था मोडीत काढण्याचा चंगच भाजप सरकारने बांधला आहे. पुन्हा भाजप सत्तेत आल्यास संवैधानिक व्यवस्थाच मोडीत निघेल. संविधानाच्या अस्तित्त्वावरच घाला घातला जाईल, लोकशाहीचा गळा घोटला जाईल, अशी भीतीही चव्हाण यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीसोबतच सेक्युलर पक्षांशी आघाडीलोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबतच इतर सेक्युलर पक्षांची आघाडीची बोलणी सुरू आहे. आघाडीतील संभाव्य घटक पक्षांना त्यांची मागणी आणि त्यातुलनेत देय जागांची संख्या संबंधितांना कळवण्यात आली आहे. मागणी आणि प्रत्यक्ष जागा याचा ताळमेळ होऊनच आघाडीचा अंतिम निर्णय होणार आहे. भारिप-बमसंचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत पक्षपातळीवर चार वेळा चर्चा झाली; मात्र ते काँग्रेसकडून बोलणी झाली नसल्याचे सांगतात, हा त्यांचा विषय आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण