शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
4
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
5
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
7
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
8
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
9
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
10
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
12
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
13
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
14
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
15
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
16
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
17
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
18
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
19
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
20
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांवरील अत्याचाराबाबत मोदींचे मौन - पृथ्वीराज चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:19 IST

कोणत्याही घटनेवर अवघ्या दोन मिनिटात टिष्ट्वट करणारे मोदी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर मौन का राहतात. त्यातून देशातील महिला किती असुरक्षित आहेत, हे अधोरेखित होत आहे, या गंभीर विषयावर राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी अकोल्यात लक्ष वेधले.

अकोला : भाजप पदाधिकारी, आमदार, खासदारांनी महिलांवर अत्याचार केल्याचे प्रकार पुढे आल्यानंतरही प्रधानमंत्री मोदी यांनी कोणतीही प्रतिक्रिया अथवा कारवाईसाठी दखलही घेतली नाही, कोणत्याही घटनेवर अवघ्या दोन मिनिटात टिष्ट्वट करणारे मोदी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर मौन का राहतात. त्यातून देशातील महिला किती असुरक्षित आहेत, हे अधोरेखित होत आहे, या गंभीर विषयावर राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी अकोल्यात लक्ष वेधले. जिल्हा पत्रकार संघाने आयोजित केलेल्या मिट द प्रेसमध्ये त्यांनी विविध मुद्यांवर मते मांडली.२०१४ मध्ये भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, या घोषणेवर विश्वास ठेवून जनतेने भाजपला सत्ता दिली. प्रत्यक्षात आता होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या बातम्याही प्रसारमाध्यमांनी देऊ नये, एवढे दबावतंत्र वापरले जात आहे. राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचाराच्या बातम्या न येण्यासाठी हे तंत्र वापरले जात आहे; मात्र प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यातही ज्या चार न्यायाधिशांनी बंड केले होते, त्यापैकी एक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. त्यामुळे लोकशाही शाबूत ठेवण्याचे काम सर्वोच्च न्यायालय करेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला. विरोधकांना संपवण्यासाठी कारवाईचा धाक दाखवत भाजपमध्ये सामिल करून घेतले जात आहे. त्यामध्ये एकाचवेळी तीन राज्याचे माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये गेल्याचे उदाहरणही त्यांनी दिले.सध्या हुकूमशाही पद्धतीने देशातील अनेक संस्था मोडीत काढण्याचा चंगच भाजप सरकारने बांधला आहे. पुन्हा भाजप सत्तेत आल्यास संवैधानिक व्यवस्थाच मोडीत निघेल. संविधानाच्या अस्तित्त्वावरच घाला घातला जाईल, लोकशाहीचा गळा घोटला जाईल, अशी भीतीही चव्हाण यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीसोबतच सेक्युलर पक्षांशी आघाडीलोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबतच इतर सेक्युलर पक्षांची आघाडीची बोलणी सुरू आहे. आघाडीतील संभाव्य घटक पक्षांना त्यांची मागणी आणि त्यातुलनेत देय जागांची संख्या संबंधितांना कळवण्यात आली आहे. मागणी आणि प्रत्यक्ष जागा याचा ताळमेळ होऊनच आघाडीचा अंतिम निर्णय होणार आहे. भारिप-बमसंचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत पक्षपातळीवर चार वेळा चर्चा झाली; मात्र ते काँग्रेसकडून बोलणी झाली नसल्याचे सांगतात, हा त्यांचा विषय आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण