शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

महिलांवरील अत्याचाराबाबत मोदींचे मौन - पृथ्वीराज चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:19 IST

कोणत्याही घटनेवर अवघ्या दोन मिनिटात टिष्ट्वट करणारे मोदी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर मौन का राहतात. त्यातून देशातील महिला किती असुरक्षित आहेत, हे अधोरेखित होत आहे, या गंभीर विषयावर राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी अकोल्यात लक्ष वेधले.

अकोला : भाजप पदाधिकारी, आमदार, खासदारांनी महिलांवर अत्याचार केल्याचे प्रकार पुढे आल्यानंतरही प्रधानमंत्री मोदी यांनी कोणतीही प्रतिक्रिया अथवा कारवाईसाठी दखलही घेतली नाही, कोणत्याही घटनेवर अवघ्या दोन मिनिटात टिष्ट्वट करणारे मोदी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर मौन का राहतात. त्यातून देशातील महिला किती असुरक्षित आहेत, हे अधोरेखित होत आहे, या गंभीर विषयावर राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी अकोल्यात लक्ष वेधले. जिल्हा पत्रकार संघाने आयोजित केलेल्या मिट द प्रेसमध्ये त्यांनी विविध मुद्यांवर मते मांडली.२०१४ मध्ये भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, या घोषणेवर विश्वास ठेवून जनतेने भाजपला सत्ता दिली. प्रत्यक्षात आता होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या बातम्याही प्रसारमाध्यमांनी देऊ नये, एवढे दबावतंत्र वापरले जात आहे. राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचाराच्या बातम्या न येण्यासाठी हे तंत्र वापरले जात आहे; मात्र प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यातही ज्या चार न्यायाधिशांनी बंड केले होते, त्यापैकी एक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. त्यामुळे लोकशाही शाबूत ठेवण्याचे काम सर्वोच्च न्यायालय करेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला. विरोधकांना संपवण्यासाठी कारवाईचा धाक दाखवत भाजपमध्ये सामिल करून घेतले जात आहे. त्यामध्ये एकाचवेळी तीन राज्याचे माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये गेल्याचे उदाहरणही त्यांनी दिले.सध्या हुकूमशाही पद्धतीने देशातील अनेक संस्था मोडीत काढण्याचा चंगच भाजप सरकारने बांधला आहे. पुन्हा भाजप सत्तेत आल्यास संवैधानिक व्यवस्थाच मोडीत निघेल. संविधानाच्या अस्तित्त्वावरच घाला घातला जाईल, लोकशाहीचा गळा घोटला जाईल, अशी भीतीही चव्हाण यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीसोबतच सेक्युलर पक्षांशी आघाडीलोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबतच इतर सेक्युलर पक्षांची आघाडीची बोलणी सुरू आहे. आघाडीतील संभाव्य घटक पक्षांना त्यांची मागणी आणि त्यातुलनेत देय जागांची संख्या संबंधितांना कळवण्यात आली आहे. मागणी आणि प्रत्यक्ष जागा याचा ताळमेळ होऊनच आघाडीचा अंतिम निर्णय होणार आहे. भारिप-बमसंचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत पक्षपातळीवर चार वेळा चर्चा झाली; मात्र ते काँग्रेसकडून बोलणी झाली नसल्याचे सांगतात, हा त्यांचा विषय आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण