शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

आधुनिक तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे - खासदार संजय धोत्रे

By atul.jaiswal | Updated: April 3, 2018 16:44 IST

   अकोला: शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे खूप गरजेचे असुन  त्यादृष्टीने शासन प्रयत्न करीत आहे.  शेतक-यांच्या विकासासाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या असुन  शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन खासदार संजय धोत्रे यांनी केले.            कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषि विभाग आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विदयापीठ यांच्या संयुक्त विदयामाने विदयापीठाच्या परिसरात  आयोजित ...

ठळक मुद्दे पाच दिवसीय जिल्हा कृषि महोत्सवाचा समारोप आज खासदार संजय धोत्रे यांच्या उपस्थीत संपन्न झाला. खासदार संजय धोत्रे ,महापोर विजय अग्रवाल,आमदार रणधिर सावरकर यांनी यावेळी महोत्सवातील स्टॉलला भेट दिली. शेती श्रेत्रात उत्कृष्ठ काम करना-या शेतक-यांचा, स्टॉलधारकांचा, बचत गटाच्या महिलांचा सत्कार.

   अकोला: शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे खूप गरजेचे असुन  त्यादृष्टीने शासन प्रयत्न करीत आहे.  शेतक-यांच्या विकासासाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या असुन  शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन खासदार संजय धोत्रे यांनी केले.

            कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषि विभाग आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विदयापीठ यांच्या संयुक्त विदयामाने विदयापीठाच्या परिसरात  आयोजित पाच दिवसीय जिल्हा कृषि महोत्सवाचा समारोप आज खासदार संजय धोत्रे यांच्या उपस्थीत संपन्न झाला, यावेळी महापोर विजय अग्रवाल,आमदार रणधिर सावरकर, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.विलास खर्चे, उदयान विभागाचे संचालक डॉ. नागरे , जिल्हा कृषी अधिक्षक राजेंद्र निकम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड,  कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक उमेश ठाकरे, आत्माचे प्रकल्प संचालक सुरेश बाविस्कर, सहायक संचालक कुरबान तडवी  आदींची  प्रमुख  उपस्थिती  होती .

            खासदार म्हणाले की, कृषी विदयापीठ, शास्त्रज्ञ, संशोधक यांच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान शेतीसाठी उपलब्ध झाले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विदयापीठाचा यामध्ये मोलाचा वाटा आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी हे सर्व तंत्रज्ञान शेतक-यापर्यंत पोहचविण्याचे काम कृषि विभाग करत आहे , अशाप्रकारचे कृषिप्रर्दशनाच्या माध्यमातुन शासनाच्या विविध योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत गेल्या पाहिजेत. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच जोडधंदाही करावा, असे आवाहन त्यांनी केले.            .

            यावेळी महापोर विजय अग्रवाल,आमदार रणधिर सावरकर, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.विलास खर्चे, उदयान विभागाचे संचालक डॉ. नागरे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सुरेश बाविस्कर यांनी केले. यावेळी शेतीश्रेत्रात उत्कृष्ठ काम करना-या शेतक-यांचा , स्टॉलधारकांचा  तसेच बचत गटाच्या महिलांचा सत्कार शाल,श्रीफळ व स्मृती चीन्ह  देऊन  मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पुर्वि  खासदार संजय धोत्रे ,महापोर विजय अग्रवाल,आमदार रणधिर सावरकर यांनी यावेळी महोत्सवातील स्टॉलला भेट दिली.     कृषि प्रदर्शनात शासनाच्या विविध योजना / उपक्रमांची माहिती देणारे  शासकीय दालने, शेतीशी निगडीत खाजगी कंपन्या, उद्योजक, शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे  दालने, सेंद्रिय शेतमालाची उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीची दालने तसेच आधुनिक शेती औजारांची दालने आहेत.या दालनाची त्यानी पाहणी केली .            यावेळी  कृषि शास्त्रज्ञ, कृषि व संलग्न विभागातील तज्ञ अधिकारी, शेतकरी, स्टॉल धारक उपस्थीत होते .

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Agro Festival 2018अकोला जिल्हा कृषी महोत्सव २०१८Sanjay Dhotreसंजय धोत्रे