शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

चाराटंचाई निर्मूलनासाठी आधुनिक तंत्र

By admin | Updated: October 22, 2015 01:43 IST

गुरांच्या वैरणाची तजवीज; बुलडाणा जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ५0४ शेतक-यांना लाभ.

नीलेश जोशी / खामगाव : अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणार्‍या तथा सरासरी ५0 टक्क्य़ांपेक्षा कमी पाऊस पडलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील नऊ तालु्क्यांत चाराटंचाई भासू नये, यासाठी हायड्रोपोनिक या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चारानिर्मिती करण्यात येणार आहे. अवघ्या सात दिवसांत हा चारा तयार होत असल्याने मार्च महिन्यानंतर जिल्ह्यात निर्माण होणार्‍या संभाव्य चाराटंचाईला तोंड देण्यासाठी कृषी विभागाकडून हे प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कमी खर्चात अवघ्या आठ दिवसांत हा चारा शेतकर्‍यांना उपलब्ध होऊन पशुधनाची चार्‍याची समस्या निकाली निघण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, या चारानिर्मितीसाठी माती किंवा जमिनीची गरज नसून, ट्रेमध्येच या चार्‍याचे उत्पादन घेता येणार आहे. उपरोक्त योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ५0४ शेतकर्‍यांची यासाठी निवड करण्यात येणार असून, तालुकानिहाय प्रत्येकी ५६ शेतकर्‍यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तालुकानिहाय ४२ सर्वसाधारण गटातील, नऊ अनुसूचित जातीमधील आणि पाच अनुसूचित जमातीमधील शेतकर्‍यांची यासाठी निवड केली जाईल. यामध्ये प्रामुख्याने अल्पभूधारक शेतकरी आणि भूमिहीन शेतमजुरांना प्राधान्य देण्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. एकट्या बुलडाणा जिल्ह्यासाठी ३0 लाख २४ हजार रुपयांची तरतूद या उपक्रमासंदर्भात करण्यात आली आहे. प्रतिप्रकल्प २४ हजार रुपये खर्च अपेक्षित असून, २५ टक्के सबसिडी राज्य शासन या प्रकल्पासाठी देणार आहे.