शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

झारखंड मधील माेबाइल चाेरटे पाेलिसांच्या जाळ्यात; साडेसात लाखांचे माेबाइल जप्त

By आशीष गावंडे | Updated: September 9, 2024 18:42 IST

रेल्वे पाेलिसांची कारवाइ

आशिष गावंडे

अकाेला: गणेशाेत्सवाच्या निमीत्ताने भाविकांची गर्दी हेरुन त्यांच्या माेबाइलवर हात साफ करणारे झारखंड मधील तीन माेबाइल चाेरटे रविवारी ८ सप्टेंबर राेजी रेल्वे पाेलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून ७ लक्ष ३५ हजार रुपये किंमतीचे महागडे माेबाइल जप्त करण्यात आल्याची माहिती साेमवारी अकाेला रेल्वे पाेलिस स्टेशनच्या प्रभारी सहा.पाेलिस निरीक्षक अर्चना गाढवे यांनी दिली. 

कन्हैयाकुमार उमेश रविदास (२४), गब्बर नोनिया मोहार चौधरी (३०) व एक १५वर्षांचा अल्पवयीन मुलगा सर्व रा. साहेबगंज, झारखंड अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. सणासुदीच्या दिवसांत भुरटे चाेर सक्रिय हाेतात. सध्या सर्वत्र गणेश उत्सवानिमीत्त आनंदमयी वातावरण निर्माण झाले आहे. गणरायांचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करतात. ही बाब हेरुन झारखंडमधील माेबाइल चाेरटे अकाेला रेल्वे स्टेशन परिसरात दाखल झाल्याची माहिती रेल्वे पाेलिसांना मिळाली हाेती. ८ सप्टेंबर राेजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार रेल्वे स्टेशन परिसरात गस्तीवर असताना कन्हैयाकुमार उमेश रविदास हा रेल्वे स्टेशनवर संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. त्याला ताब्यात घेवून पाेलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरी करण्याच्या उ‌द्देशातून त्याच्या इतर दाेन साथीदारांसह शहरात दाखल झाल्याची कबुली दिली. यावरुन पाेलिसांनी त्याचा साथीदार गब्बर नोनिया मोहार चौधरी व एक १५ वर्षांचा अल्पवयीन मुलगा याला ताब्यात घेतले.

यादरम्यान, त्यांच्याकडून ७ लक्ष ३५ हजार रुपये किंमतीचे महागडे १९ माेबाइल जप्त करण्यात आले. ही कारवाइ अकाेला रेल्वे पोलिस स्टेशनच्या प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक अर्चना गाढवे, सहायक पोलिस निरीक्षक पंकज ढोके, फाैजदार सतिश चव्हाण, संतोष वडगीरे, सुशिल सांगळे, विजय रेवेकर, इरफान पठाण, कपिल गवई, विजय शेगावकर, तुषार गोंगे यांनी केली.  भाड्याच्या खाेलीत वास्तव्य

झारखंडमधील माेबाइल चाेरटे मागील पाच ते सहा दिवसांपासून आपातापा राेडवरील संतकबीर नगर मध्ये भाडेतत्वावर खोली घेवून राहत असल्याचे तपासात समाेर आले. त्यांची कसून चाैकशी केली असता, त्यांनी शहरातील काही भागात तसेच रेल्वे स्टेशन परिसर, बार्शीटाकळी व अमरावती अशा वेगवेगळ्या ठिकाणी माेबाइल लंपास केल्याचे सांगितले.माेबाइल हवा;पाेलिसांसाेबत संपर्क साधा

मागील सहा ते सात दिवसांत ज्या नागरिकांच्या माेबाइलची चाेरी झाली, त्यांनी तातडीने रेल्वे पाेलिसांसाेबत संपर्क साधण्याचे आवाहन पाेलिसांकडून करण्यात आले आहे.