शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

झारखंड मधील माेबाइल चाेरटे पाेलिसांच्या जाळ्यात; साडेसात लाखांचे माेबाइल जप्त

By आशीष गावंडे | Updated: September 9, 2024 18:42 IST

रेल्वे पाेलिसांची कारवाइ

आशिष गावंडे

अकाेला: गणेशाेत्सवाच्या निमीत्ताने भाविकांची गर्दी हेरुन त्यांच्या माेबाइलवर हात साफ करणारे झारखंड मधील तीन माेबाइल चाेरटे रविवारी ८ सप्टेंबर राेजी रेल्वे पाेलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून ७ लक्ष ३५ हजार रुपये किंमतीचे महागडे माेबाइल जप्त करण्यात आल्याची माहिती साेमवारी अकाेला रेल्वे पाेलिस स्टेशनच्या प्रभारी सहा.पाेलिस निरीक्षक अर्चना गाढवे यांनी दिली. 

कन्हैयाकुमार उमेश रविदास (२४), गब्बर नोनिया मोहार चौधरी (३०) व एक १५वर्षांचा अल्पवयीन मुलगा सर्व रा. साहेबगंज, झारखंड अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. सणासुदीच्या दिवसांत भुरटे चाेर सक्रिय हाेतात. सध्या सर्वत्र गणेश उत्सवानिमीत्त आनंदमयी वातावरण निर्माण झाले आहे. गणरायांचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करतात. ही बाब हेरुन झारखंडमधील माेबाइल चाेरटे अकाेला रेल्वे स्टेशन परिसरात दाखल झाल्याची माहिती रेल्वे पाेलिसांना मिळाली हाेती. ८ सप्टेंबर राेजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार रेल्वे स्टेशन परिसरात गस्तीवर असताना कन्हैयाकुमार उमेश रविदास हा रेल्वे स्टेशनवर संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. त्याला ताब्यात घेवून पाेलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरी करण्याच्या उ‌द्देशातून त्याच्या इतर दाेन साथीदारांसह शहरात दाखल झाल्याची कबुली दिली. यावरुन पाेलिसांनी त्याचा साथीदार गब्बर नोनिया मोहार चौधरी व एक १५ वर्षांचा अल्पवयीन मुलगा याला ताब्यात घेतले.

यादरम्यान, त्यांच्याकडून ७ लक्ष ३५ हजार रुपये किंमतीचे महागडे १९ माेबाइल जप्त करण्यात आले. ही कारवाइ अकाेला रेल्वे पोलिस स्टेशनच्या प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक अर्चना गाढवे, सहायक पोलिस निरीक्षक पंकज ढोके, फाैजदार सतिश चव्हाण, संतोष वडगीरे, सुशिल सांगळे, विजय रेवेकर, इरफान पठाण, कपिल गवई, विजय शेगावकर, तुषार गोंगे यांनी केली.  भाड्याच्या खाेलीत वास्तव्य

झारखंडमधील माेबाइल चाेरटे मागील पाच ते सहा दिवसांपासून आपातापा राेडवरील संतकबीर नगर मध्ये भाडेतत्वावर खोली घेवून राहत असल्याचे तपासात समाेर आले. त्यांची कसून चाैकशी केली असता, त्यांनी शहरातील काही भागात तसेच रेल्वे स्टेशन परिसर, बार्शीटाकळी व अमरावती अशा वेगवेगळ्या ठिकाणी माेबाइल लंपास केल्याचे सांगितले.माेबाइल हवा;पाेलिसांसाेबत संपर्क साधा

मागील सहा ते सात दिवसांत ज्या नागरिकांच्या माेबाइलची चाेरी झाली, त्यांनी तातडीने रेल्वे पाेलिसांसाेबत संपर्क साधण्याचे आवाहन पाेलिसांकडून करण्यात आले आहे.