शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

माेबाइल अन् मद्याने कालवले अनेकांच्या सुखी संसारात विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 11:12 IST

Akola News : बहुतांश दाम्पत्यांचे समुपदेशन करून त्यांचे संसार पुन्हा फुलविण्याचे काम या विभागाने केले आहे.

- सचिन राऊत

अकाेला : मोबाइलमुळे वाढता विसंवाद, मद्य पिण्याचे वाढते प्रमाण, चारित्र्यावर संशय अशा विविध कारणांमुळे गृहकलहांत वाढ होत आहे. वाढते वाद वेळीच न मिटल्यास अनेक सुखी संसार मोडकळीस देखील येतात. गेल्या वर्षभरात अशी शेकडो प्रकरणे भरोसा सेलकडे दाखल झाली आहेत. यातील बहुतांश दाम्पत्यांचे समुपदेशन करून त्यांचे संसार पुन्हा फुलविण्याचे काम या विभागाने केले आहे. मोबाइल, तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा वाढता वापर, मद्य आणि नशा, हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून छळ आदी कारणांमुळे पती, पत्नीत वाद होऊन प्रकरण पोलीस ठाणे आणि न्यायालयात पोहोचण्याच्या प्रमाणात अलीकडे वाढ झाली आहे. त्यातून पुढे काही प्रकरणे

काडीमोडपर्यंत देखील पोचली आहेत. पती, पत्नीतील वादाचे हे प्रकरण सर्वप्रथम भरोसा सेलकडे जाते. या ठिकाणी दोघांचे समुपदेशन करून वाट मिटविण्यात येत आहेत़

चारित्र्यावर संशय हेच कारण

नेहमीच मोबाइलवर बोलणे, व्हॉट्सअॅप, फेसबुक बघत बसणे, घरात लक्ष न देणे, स्वयंपाक येत नाही, माहेरहून पैसे आणत नाही अशी वादाची विविध कारणे आहेत.

त्याचबरोबर पती, पत्नी एकमेकांवर संशय घेतात, घरात वेळ देत नाहीत, अशा तक्रारी देखील वाढत आहेत.

बायकोचा जाच वाढला

अनेकदा पती किंवा सासरच्या मंडळींकडून महिलांचा छळ केला जातो. या वेळी जाच वाढल्याची देखील काही प्रकरणे समोर येत आहेत. महिलांकडून होणाऱ्या खोट्या तक्रारींमुळे देखील काही पुरुषांना मनस्ताप सहन करावा लागतो.

 

नेहमी आईशी बोलते म्हणून वाद

मोबाइल हे पती-पलीच्या भांडणाचे कारण असल्याचे अनेकदा समोर आले आहे. पत्नी नेहमीच आई आणि बहिणीसोबत फोनवर बोलत असते. त्यामुळे तिचे घरातील कामाकडे लक्ष नसते, अशा प्रकारच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे़

अन् पुन्हा फुलले संसार

पती, पत्नीच्या वादाची प्रकरणे भरोसा सेलकडे पाठविली जातात. या कक्षातील अधिकारी दोघांचेही समुपदेशन करुन संसार पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतात. वर्षभरात आलेल्या सुमारे ४०० प्रकरणांपैकी जवळपास २५० पेक्षा अधिक संसार पुन्हा फुलले आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाMobileमोबाइल