शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

माेबाइल अन् मद्याने कालवले अनेकांच्या सुखी संसारात विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 11:12 IST

Akola News : बहुतांश दाम्पत्यांचे समुपदेशन करून त्यांचे संसार पुन्हा फुलविण्याचे काम या विभागाने केले आहे.

- सचिन राऊत

अकाेला : मोबाइलमुळे वाढता विसंवाद, मद्य पिण्याचे वाढते प्रमाण, चारित्र्यावर संशय अशा विविध कारणांमुळे गृहकलहांत वाढ होत आहे. वाढते वाद वेळीच न मिटल्यास अनेक सुखी संसार मोडकळीस देखील येतात. गेल्या वर्षभरात अशी शेकडो प्रकरणे भरोसा सेलकडे दाखल झाली आहेत. यातील बहुतांश दाम्पत्यांचे समुपदेशन करून त्यांचे संसार पुन्हा फुलविण्याचे काम या विभागाने केले आहे. मोबाइल, तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा वाढता वापर, मद्य आणि नशा, हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून छळ आदी कारणांमुळे पती, पत्नीत वाद होऊन प्रकरण पोलीस ठाणे आणि न्यायालयात पोहोचण्याच्या प्रमाणात अलीकडे वाढ झाली आहे. त्यातून पुढे काही प्रकरणे

काडीमोडपर्यंत देखील पोचली आहेत. पती, पत्नीतील वादाचे हे प्रकरण सर्वप्रथम भरोसा सेलकडे जाते. या ठिकाणी दोघांचे समुपदेशन करून वाट मिटविण्यात येत आहेत़

चारित्र्यावर संशय हेच कारण

नेहमीच मोबाइलवर बोलणे, व्हॉट्सअॅप, फेसबुक बघत बसणे, घरात लक्ष न देणे, स्वयंपाक येत नाही, माहेरहून पैसे आणत नाही अशी वादाची विविध कारणे आहेत.

त्याचबरोबर पती, पत्नी एकमेकांवर संशय घेतात, घरात वेळ देत नाहीत, अशा तक्रारी देखील वाढत आहेत.

बायकोचा जाच वाढला

अनेकदा पती किंवा सासरच्या मंडळींकडून महिलांचा छळ केला जातो. या वेळी जाच वाढल्याची देखील काही प्रकरणे समोर येत आहेत. महिलांकडून होणाऱ्या खोट्या तक्रारींमुळे देखील काही पुरुषांना मनस्ताप सहन करावा लागतो.

 

नेहमी आईशी बोलते म्हणून वाद

मोबाइल हे पती-पलीच्या भांडणाचे कारण असल्याचे अनेकदा समोर आले आहे. पत्नी नेहमीच आई आणि बहिणीसोबत फोनवर बोलत असते. त्यामुळे तिचे घरातील कामाकडे लक्ष नसते, अशा प्रकारच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे़

अन् पुन्हा फुलले संसार

पती, पत्नीच्या वादाची प्रकरणे भरोसा सेलकडे पाठविली जातात. या कक्षातील अधिकारी दोघांचेही समुपदेशन करुन संसार पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतात. वर्षभरात आलेल्या सुमारे ४०० प्रकरणांपैकी जवळपास २५० पेक्षा अधिक संसार पुन्हा फुलले आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाMobileमोबाइल