शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

राज्यात ८,६४२ ग्रामपंचायत स्तरावर ‘रोहयो’ची कामे सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 10:53 IST

राज्यातील २८ हजार ६४२ ग्रामपंचायतींपैकी केवळ ८ हजार १४४ ग्रामपंचायतींच्या स्तरावर रोजगार हमी योजनेची कामे सुरू.

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यातील २८ हजार ६४२ ग्रामपंचायतींपैकी सद्यस्थितीत ८ हजार १४४ ग्रामपंचायतींच्या स्तरावर कामे सुरू असून, उर्वरित २० हजार ४९८ ग्रामपंचायत स्तरावर ‘रोहयो’ची कामे केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर मोठ्या शहरातून गावाकडे परतलेल्या मजुरांच्या हाताला काम नाही. या पृष्ठभूमीवर गाव पातळीवर मजुरांकडून कामाची मागणी होताच रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध शासकीय यंत्रणा आणि ग्रामपंचायतींच्या स्तरावर कामे केली जातात; परंतु महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राज्य आयुक्तालयाच्या अहवालानुसार १४ सप्टेंबरपर्यंत राज्यातील २८ हजार ६४२ ग्रामपंचायतींपैकी केवळ ८ हजार १४४ ग्रामपंचायतींच्या स्तरावर रोजगार हमी योजनेची कामे सुरू असून, राज्यातील उर्वरित २० हजार ४९८ ग्रामपंचायत स्तरावर रोहयोची कामे सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींकडून रोहयोची कामे केव्हा सुरू करण्यात येणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना