शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

रोहयो मजुरांचे हजेरीपत्रक आता ग्रामपंचायत स्तरावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 12:31 IST

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांचे हजेरीपत्रक आता ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत निर्गमित करण्यात येणार आहे.

- संतोष येलकरअकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांचे हजेरीपत्रक आता ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत निर्गमित करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून हजेरीपत्रक निर्गमित करण्याची कार्यवाही तातडीने सुरू कण्याचे निर्देश जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १७ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांना (बीडीओ) दिले.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत काम करणाºया मजुरांचे हजेरीपत्रक निर्गमित करण्याचे काम सध्या पंचायत समिती स्तरावरील ‘डाटा एन्ट्री’ आॅपरेटरमार्फत करण्यात येत आहे; परंतु रोहयो अंतर्गत काम करणाºया मजुरांना मजुरी तातडीने मिळावी, यासाठी २३ एप्रिल २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार रोहयो अंतर्गत मजुरांचे हजेरीपत्रक ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र चालकांमार्फत निर्गमित करण्याचा आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता. त्यानुषंगाने रोहयो अंतर्गत मजुरांचे हजेरीपत्रक ग्रामपंचायत स्तरावरावरून आपले सरकार केंद्र चालकांमार्फत निर्गमित करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांना दिले.ग्रामविकास सचिवांनीव्यक्त केली तीव्र नाराजी!रोहयो मजुरांचे हजेरीपत्रक ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत निर्गमित करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र चालक, तालुका स्तरावरील डाटा एन्ट्री आॅपरेटर व सहायक कार्यक्रम अधिकाºयांना गत मे महिन्यात तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले; मात्र ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र चालकांमार्फत हजेरीपत्रक निर्गमित करण्याचे काम सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे यासंदर्भात शासनाच्या ग्रामविकास सचिवांनी १७ डिसेंबर रोजी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’मध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली.मजुरी २१ दिवसांत अदा करणे बंधनकारक!शासन निर्णयानुसार जॉबकार्डधारक रोहयो मजुरांना काम उपलब्ध केलेल्या दिनांकापासून २१ दिवसांच्या आत मजुरी अदा करणे बंधनकारक राहणार असल्याचेही उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ‘बीडीओं’ना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजनाgram panchayatग्राम पंचायत