शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला हमी भाव न देता खात्यात तुटपुंज्या मदतीचा गवगवा- आमदार नितीन देशमुख

By आशीष गावंडे | Updated: March 2, 2024 23:32 IST

शेतकरी संघर्ष यात्रेत आमदारांनी सरकारवर निशाणा

आशिष गावंडे, अकोला: अस्मानी संकटाने राज्यातील शेतकरी हतबल झाला असताना केंद्र व राज्य सरकारकडून कापूस, साेयाबीन, कांदा, तूर यासह इतर शेतमालाला हमी दिला जात नाही. हमीभावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला प्राधान्य न देता सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात दर तीन महिन्यांच्या कालावधीत तुटपुंजी आर्थिक मदत केली जात असल्याचे सांगत शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधला.

शहराचे आराध्य दैवत श्री राजेश्वर मंदिर परिसरात शेतकरी संघर्ष यात्रेचा शनिवारी रात्री समाराेप करण्यात आला,यावेळी आ.देशमुख यांनी भाजपाचा समाचार घेतला. व्यासपिठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गजानन दाळू गुरूजी, बुलढाणा सहायक संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, हरिदास भदे, संजय गावंडे, जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर, बबलू देशमुख, उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा, राहुल कराळे, ज्योत्स्ना चोरे, मंजुषा शेळके, देवश्री ठाकरे आदी उपस्थित हाेते.

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी काेराेना काळात जनतेचा मनापासून सांभाळ केला. उध्दव ठाकरे यांच्या कामाची दखल घेतल्यामुळेच देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला हाेता. यामुळे भाजपला पाेटशुळ निर्माण झाल्याने त्यांनी जाणीवपूर्वक काेराेना काळातील कामकाजावर आराेप केल्याचेही देशमुख यांनी सांगितले. यावेळी व्यासपिठावरील मान्यवरांनी उपस्थितांना संबाेधित करुन संघर्ष यात्रेमुळे जिल्ह्यातील शेतकरी एकवटल्याचे स्पष्ट केले. 

राज्यातील वातावरण दुषित केले!

भाजपचे हिंदुत्व बेगडी असून धर्म,जातीवर आधारित राजकारण करण्याचा चूकीचा पायंडा निर्माण केल्याची टिका आ.नितीन देशमुख यांनी केली. सख्खे भाऊ, काका,पुतण्यांमध्ये फोडाफोडी करून घराघरांमध्ये भांडणे लावली, असे यापूर्वी कधीच घडले नाही. ही परिस्थिती पाहता लोकांनी सुज्ञ होण्याची गरज असल्याचे आवाहन आ.देशमुख यांनी केले.

देशात लाेकशाही पायदळीतपास यंत्रणांचा गैरवापर करुन राजकीय पक्षातील नेत्यांवर दबावतंत्राचा वापर केला जात आहे. भ्रष्टाचाराचे आराेप केल्यानंतर त्याच नेत्याला पक्षात का सामील करुन घेता, असा सवाल यावेळी आ.देशमुख यांनी उपस्थित केला. भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची चाैकशी बंद हाेते,हे सर्व पाहता लाेकशाही पायदळी तुडविल्या जात असल्याचा आराेप आ.देशमुख यांनी केला.

टॅग्स :Akolaअकोला