शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

शेतमालाला हमी भाव न देता खात्यात तुटपुंज्या मदतीचा गवगवा- आमदार नितीन देशमुख

By आशीष गावंडे | Updated: March 2, 2024 23:32 IST

शेतकरी संघर्ष यात्रेत आमदारांनी सरकारवर निशाणा

आशिष गावंडे, अकोला: अस्मानी संकटाने राज्यातील शेतकरी हतबल झाला असताना केंद्र व राज्य सरकारकडून कापूस, साेयाबीन, कांदा, तूर यासह इतर शेतमालाला हमी दिला जात नाही. हमीभावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला प्राधान्य न देता सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात दर तीन महिन्यांच्या कालावधीत तुटपुंजी आर्थिक मदत केली जात असल्याचे सांगत शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधला.

शहराचे आराध्य दैवत श्री राजेश्वर मंदिर परिसरात शेतकरी संघर्ष यात्रेचा शनिवारी रात्री समाराेप करण्यात आला,यावेळी आ.देशमुख यांनी भाजपाचा समाचार घेतला. व्यासपिठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गजानन दाळू गुरूजी, बुलढाणा सहायक संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, हरिदास भदे, संजय गावंडे, जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर, बबलू देशमुख, उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा, राहुल कराळे, ज्योत्स्ना चोरे, मंजुषा शेळके, देवश्री ठाकरे आदी उपस्थित हाेते.

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी काेराेना काळात जनतेचा मनापासून सांभाळ केला. उध्दव ठाकरे यांच्या कामाची दखल घेतल्यामुळेच देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला हाेता. यामुळे भाजपला पाेटशुळ निर्माण झाल्याने त्यांनी जाणीवपूर्वक काेराेना काळातील कामकाजावर आराेप केल्याचेही देशमुख यांनी सांगितले. यावेळी व्यासपिठावरील मान्यवरांनी उपस्थितांना संबाेधित करुन संघर्ष यात्रेमुळे जिल्ह्यातील शेतकरी एकवटल्याचे स्पष्ट केले. 

राज्यातील वातावरण दुषित केले!

भाजपचे हिंदुत्व बेगडी असून धर्म,जातीवर आधारित राजकारण करण्याचा चूकीचा पायंडा निर्माण केल्याची टिका आ.नितीन देशमुख यांनी केली. सख्खे भाऊ, काका,पुतण्यांमध्ये फोडाफोडी करून घराघरांमध्ये भांडणे लावली, असे यापूर्वी कधीच घडले नाही. ही परिस्थिती पाहता लोकांनी सुज्ञ होण्याची गरज असल्याचे आवाहन आ.देशमुख यांनी केले.

देशात लाेकशाही पायदळीतपास यंत्रणांचा गैरवापर करुन राजकीय पक्षातील नेत्यांवर दबावतंत्राचा वापर केला जात आहे. भ्रष्टाचाराचे आराेप केल्यानंतर त्याच नेत्याला पक्षात का सामील करुन घेता, असा सवाल यावेळी आ.देशमुख यांनी उपस्थित केला. भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची चाैकशी बंद हाेते,हे सर्व पाहता लाेकशाही पायदळी तुडविल्या जात असल्याचा आराेप आ.देशमुख यांनी केला.

टॅग्स :Akolaअकोला