शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
2
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
3
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी,'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
4
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
5
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा उत्पादन परवाना रद्द; तामिळनाडू सरकारने कंपनी बंद करण्याचे दिले आदेश!
6
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
7
मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका, न्यायमूर्तींनी दिला मोठा निर्णय, सुप्रिम कोर्टात काय घडलं?
8
टाटा-इन्फोसिससह 'हे' शेअर्स आपटले; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा लाल रंगात; 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
9
चीननंतर अमेरिकेने सुरू केली भारताची हेरगिरी; पाळत ठेवण्यासाठी 'ओशन टायटन'ला पाठवले, कारण...
10
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
11
DSP सिराज नंबर वन! झिम्बाब्वेच्या गड्याला टाकले मागे; पण इथं टॉप ५ मध्ये दिसत नाही बुमराहचं नाव
12
मजुराला रस्त्याच्या कडेला सापडला एक दगड, घरी नेल्यावर कळलं की...; क्षणात आयुष्य बदलले!
13
Shani Gochar 2025: शनि देवाची खास दिवाळी भेट: २० ऑक्टोबरपासून 'या' ८ राशींच्या तिजोरीत होणार धनवृद्धी!
14
दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास
15
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
16
कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली
17
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
18
Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक
19
बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
20
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल

शेतमालाला हमी भाव न देता खात्यात तुटपुंज्या मदतीचा गवगवा- आमदार नितीन देशमुख

By आशीष गावंडे | Updated: March 2, 2024 23:32 IST

शेतकरी संघर्ष यात्रेत आमदारांनी सरकारवर निशाणा

आशिष गावंडे, अकोला: अस्मानी संकटाने राज्यातील शेतकरी हतबल झाला असताना केंद्र व राज्य सरकारकडून कापूस, साेयाबीन, कांदा, तूर यासह इतर शेतमालाला हमी दिला जात नाही. हमीभावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला प्राधान्य न देता सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात दर तीन महिन्यांच्या कालावधीत तुटपुंजी आर्थिक मदत केली जात असल्याचे सांगत शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधला.

शहराचे आराध्य दैवत श्री राजेश्वर मंदिर परिसरात शेतकरी संघर्ष यात्रेचा शनिवारी रात्री समाराेप करण्यात आला,यावेळी आ.देशमुख यांनी भाजपाचा समाचार घेतला. व्यासपिठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गजानन दाळू गुरूजी, बुलढाणा सहायक संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, हरिदास भदे, संजय गावंडे, जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर, बबलू देशमुख, उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा, राहुल कराळे, ज्योत्स्ना चोरे, मंजुषा शेळके, देवश्री ठाकरे आदी उपस्थित हाेते.

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी काेराेना काळात जनतेचा मनापासून सांभाळ केला. उध्दव ठाकरे यांच्या कामाची दखल घेतल्यामुळेच देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला हाेता. यामुळे भाजपला पाेटशुळ निर्माण झाल्याने त्यांनी जाणीवपूर्वक काेराेना काळातील कामकाजावर आराेप केल्याचेही देशमुख यांनी सांगितले. यावेळी व्यासपिठावरील मान्यवरांनी उपस्थितांना संबाेधित करुन संघर्ष यात्रेमुळे जिल्ह्यातील शेतकरी एकवटल्याचे स्पष्ट केले. 

राज्यातील वातावरण दुषित केले!

भाजपचे हिंदुत्व बेगडी असून धर्म,जातीवर आधारित राजकारण करण्याचा चूकीचा पायंडा निर्माण केल्याची टिका आ.नितीन देशमुख यांनी केली. सख्खे भाऊ, काका,पुतण्यांमध्ये फोडाफोडी करून घराघरांमध्ये भांडणे लावली, असे यापूर्वी कधीच घडले नाही. ही परिस्थिती पाहता लोकांनी सुज्ञ होण्याची गरज असल्याचे आवाहन आ.देशमुख यांनी केले.

देशात लाेकशाही पायदळीतपास यंत्रणांचा गैरवापर करुन राजकीय पक्षातील नेत्यांवर दबावतंत्राचा वापर केला जात आहे. भ्रष्टाचाराचे आराेप केल्यानंतर त्याच नेत्याला पक्षात का सामील करुन घेता, असा सवाल यावेळी आ.देशमुख यांनी उपस्थित केला. भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची चाैकशी बंद हाेते,हे सर्व पाहता लाेकशाही पायदळी तुडविल्या जात असल्याचा आराेप आ.देशमुख यांनी केला.

टॅग्स :Akolaअकोला