शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
5
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
6
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
8
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
9
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
10
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
11
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
12
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
13
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
14
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
15
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
16
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
17
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
18
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
19
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
20
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन

मिशन मॅट्रिक उपक्रमामुळे दहावीच्या निकालात २५ टक्क्यांनी वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 10:58 IST

या उपक्रमामुळे यंदा इयत्ता दहावी निकालाच्या टक्केवारीत भरघोस वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गतवर्षी दहावीच्या निकालाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून तत्कालीन सीईओ आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून शाळांमध्ये मिशन मॅट्रिक हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमामुळे यंदा इयत्ता दहावी निकालाच्या टक्केवारीत भरघोस वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा माध्यमिक शिक्षण विभागाने केला आहे.मिशन मॅट्रिक उपक्रमामुळे शेकडो शाळांना फायदा झाला आहे. जिल्ह्यातील १६0 शाळांचा निकाल १00 टक्के लागला आहे. एवढेच नाहीतर जिल्ह्यातील २८९ शाळांचा निकालही ७५ टक्क्यांच्यावर लागला आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी २0१९ या वर्षात जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये मिशन मॅट्रिक हा उपक्रम राबविला. मिशन मॅट्रिक उपक्रमांतर्गत तीन उद्दिष्टे ठेवण्यात आली होती.जिल्ह्यातील ज्या शाळांचा निकाल ३0 टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्या शाळांचा निकाल ५0 टक्क्यांनी वाढविणे, प्रत्येक शाळेचा निकाल ६ टक्क्यांनी वाढविणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा निकाल ३ ते ५ टक्क्यांनी वाढविण्याचे टार्गेट ठरविण्यात आले होते. त्यासाठी प्रत्येक माध्यमिक शाळेला कृती कार्यक्रम ठरवून दिला होता.आॅक्टोबर २0१९ मध्ये प्रत्येक मुख्याध्यापकाकडून इयत्ता दहावीचा निकाल वाढविण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजनांचे सादरीकरण करून घेण्यात आले होते. तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने मुख्याध्यापकांच्या सादरीकरणाचे विश्लेषण करून कमकुवत विद्यार्थ्यांना कसे पास श्रेणीत आणता येईल, याबाबत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने मुख्याध्यापक, शिक्षकांना सूक्ष्म नियोजन करून दिले. सराव परीक्षा घेणे, सराव परीक्षेच्या निकालाचे विश्लेषण करून विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले होते. याच कारणांमुळे यंदा इयत्ता दहावीचा निकाल ९५.५२ टक्के लागला आहे. मिशन मॅट्रिक उपक्रमांसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. समाधान डुकरे, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, देवेंद्र अवचार, शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद जाधव, मुख्याध्यापक, शिक्षकांनी परिश्रम घेतले.

गतवर्षी ३0 टक्क्यांपेक्षा कमी निकाल लागलेल्या ३१ शाळांचा निकालातही वाढगतवर्षी दहावीच्या निकालात जिल्ह्यातील ३१ शाळांचा निकाल ३0 टक्क्यांपेक्षाही कमी लागला होता. यंदा मिशन मॅट्रिकमुळे या शाळांच्या निकालातही सुधारणा झाली आहे. या ३१ शाळांचा निकाल ५0 ते ७५ टक्के लागला आहे.

मिशन मॅट्रिक उपक्रमाचा जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना फायदा झाला आहे. यंदा दहावीचा निकाल २५ टक्क्यांनी वाढला आहे. गतवर्षी १00 टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या १२0 होती. आता त्यात ४0 ने वाढ झाली आहे.-प्रकाश मुकुंद,शिक्षणाधिकारी, माध्यमिक

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र