शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

मिशन मॅट्रिक उपक्रमामुळे दहावीच्या निकालात २५ टक्क्यांनी वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 10:58 IST

या उपक्रमामुळे यंदा इयत्ता दहावी निकालाच्या टक्केवारीत भरघोस वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गतवर्षी दहावीच्या निकालाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून तत्कालीन सीईओ आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून शाळांमध्ये मिशन मॅट्रिक हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमामुळे यंदा इयत्ता दहावी निकालाच्या टक्केवारीत भरघोस वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा माध्यमिक शिक्षण विभागाने केला आहे.मिशन मॅट्रिक उपक्रमामुळे शेकडो शाळांना फायदा झाला आहे. जिल्ह्यातील १६0 शाळांचा निकाल १00 टक्के लागला आहे. एवढेच नाहीतर जिल्ह्यातील २८९ शाळांचा निकालही ७५ टक्क्यांच्यावर लागला आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी २0१९ या वर्षात जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये मिशन मॅट्रिक हा उपक्रम राबविला. मिशन मॅट्रिक उपक्रमांतर्गत तीन उद्दिष्टे ठेवण्यात आली होती.जिल्ह्यातील ज्या शाळांचा निकाल ३0 टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्या शाळांचा निकाल ५0 टक्क्यांनी वाढविणे, प्रत्येक शाळेचा निकाल ६ टक्क्यांनी वाढविणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा निकाल ३ ते ५ टक्क्यांनी वाढविण्याचे टार्गेट ठरविण्यात आले होते. त्यासाठी प्रत्येक माध्यमिक शाळेला कृती कार्यक्रम ठरवून दिला होता.आॅक्टोबर २0१९ मध्ये प्रत्येक मुख्याध्यापकाकडून इयत्ता दहावीचा निकाल वाढविण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजनांचे सादरीकरण करून घेण्यात आले होते. तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने मुख्याध्यापकांच्या सादरीकरणाचे विश्लेषण करून कमकुवत विद्यार्थ्यांना कसे पास श्रेणीत आणता येईल, याबाबत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने मुख्याध्यापक, शिक्षकांना सूक्ष्म नियोजन करून दिले. सराव परीक्षा घेणे, सराव परीक्षेच्या निकालाचे विश्लेषण करून विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले होते. याच कारणांमुळे यंदा इयत्ता दहावीचा निकाल ९५.५२ टक्के लागला आहे. मिशन मॅट्रिक उपक्रमांसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. समाधान डुकरे, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, देवेंद्र अवचार, शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद जाधव, मुख्याध्यापक, शिक्षकांनी परिश्रम घेतले.

गतवर्षी ३0 टक्क्यांपेक्षा कमी निकाल लागलेल्या ३१ शाळांचा निकालातही वाढगतवर्षी दहावीच्या निकालात जिल्ह्यातील ३१ शाळांचा निकाल ३0 टक्क्यांपेक्षाही कमी लागला होता. यंदा मिशन मॅट्रिकमुळे या शाळांच्या निकालातही सुधारणा झाली आहे. या ३१ शाळांचा निकाल ५0 ते ७५ टक्के लागला आहे.

मिशन मॅट्रिक उपक्रमाचा जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना फायदा झाला आहे. यंदा दहावीचा निकाल २५ टक्क्यांनी वाढला आहे. गतवर्षी १00 टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या १२0 होती. आता त्यात ४0 ने वाढ झाली आहे.-प्रकाश मुकुंद,शिक्षणाधिकारी, माध्यमिक

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र