शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अधिकाऱ्यांच्या सोईसाठी पशुधन विकास मंडळाचे स्थलांतरण - दशरथ भांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 19:20 IST

Dashrath Bhande अकोल्यातील पशुधन विकास मंडळ नागपूर येथे स्थलांतरीत केल्याचा शासन निर्णय नुकताच घेण्यात आला.

अकोला: केंद्र पुरस्कृत राज्यस्तरीय पशुधन विकास मंडळाचे एकाएकी नागपूरला स्थलांतरण हे अधिकाऱ्यांच्या सोईसाठी करण्यात आल्याचा आरोप करत, या निर्णयाचा डॉ. दशरथ भांडे यांनी बुधवारी तीव्र निषेध केला.अकोल्यातील पशुधन विकास मंडळ नागपूर येथे स्थलांतरीत केल्याचा शासन निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यानंतर रविवारी पशुधन विकास मंडळ कार्यालयाचे तडकाफडकी स्थलांतरण करण्यास सुरुवात केली होती. या संदर्भात बुधवारी शासकीय विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे बोलत होते. शासनापेक्षा प्रशासनाच्या मताचा सन्मान हा लाजिरवाणा असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले. केंद्र सरकार पुरस्कृत राजय्स्तरीय पशुधवन विकास मंडळाचे प्रमुख कार्यालय १८ वर्षांपूर्वीच अकोल्यात स्थापन झाले. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हा मानाचा तुराच आहे,. राज्यस्तरीय बियाणे महामंडळाची इमारत व पशुधन विकास मंडळाची स्थापना या दोन्ही घटना अकोलेकरांसाठी गर्वा्या आहेत. मात्र, १८ वर्षांनंतर काहीही कारण नसताना केवळ अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी पशुधन विकास मंडळाचे कार्यालय हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळी विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी बांधवांच्या जीवनात पशुधनाला महत्त्वा आहे. त्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने जिल्ह्यात उत्तम देशी पशु प्रगत करुन दुग्ध उत्पादन वाढविणे हा त्या मागचा केंद्र शासनाचा हेतू होता. त्याला पश्चिम महाराष्ट्रातील काहींनी साथ दिली, परंतु राज्य मंत्री मंडळातील त्या खात्याचा मंत्री म्हणून महामंडळ अकोल्यात कसे महत्त्वाचे हे सर्वांना पटवून दिले व सर्व विरोध मोडून अकोल्यात या महामंडळाची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले. अकोल्यासाठी हे महामंडळ अतिशय महत्त्वाचे असून सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी या निर्णयाचा केवळ विरोधच नाही, तर एक जुटीने यासाठी संघर्ष करण्याची गरज असल्याचे मत डॉ. भांडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. राज्यात सध्या अनेक पक्षाचे सरकार सत्तेत आहे. सहाजिकच नाेकरशाहीची मनमानि स्वहिताचे निर्णय घेण्यास सरसावल्याचे त्यांनी२१ डिसेंबर २०१९ चा शासन निर्णय, असो की पर्यटन महोत्सवात मागील तीस वर्षांपासून समाविष्ट असलेले विदर्भाचे नंदनवन चिखलदरा वगळण्याचा निर्णय असो, अशा अनेक बाबी महाराष्ट्राला शोभणाऱ्या नसल्याचे म्हणत डॉ. भांडे यांनी या निर्णयांचा निषेध व्यक्त केला.

टॅग्स :AkolaअकोलाDashrath Bhandeदशरथ भांडे