शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

शेतक-यांचा माती जगविण्याचा संदेश आता आंतरराष्ट्रीय स्तरावर

By admin | Updated: February 28, 2015 00:45 IST

फिलिपाइन्स येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत अकोल्यातील शेतक-यांचा समावेश.

अकोला : मातीचा पोत कायम ठेवून उत्पादनाचा हव्यास न करता माती जगविण्याचा निंबारा येथील गणेश नानोटे या शेतकर्‍याचा प्रयोग आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील निंबारा या छोट्याशा गावातील शेतकर्‍याची फिलिपाइन्स येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. फिलिपाइन्स येथील मनीला मकारी येथे नववी पॅन एशिया फार्र्मस एक्सचेंज प्रोग्रामचे आयोजन २ ते ७ मार्चदरम्यान करण्यात आले आहे. या कार्यक्रमाकरिता भारतातून पाच शेतकर्‍यांची निवड करण्यात आली. यामध्ये अकोला जिल्ह्यातील निंबारा येथील गणेश नानोटे यांना संधी मिळाली आहे. नानोटे यांच्या नावाची शिफारस दिल्ली येथील अँबल इंडिया या स्वयंसेवी संस्थेने केली होती. नानोटे यांना स्वामिनाथन फाउंडेशनचे पुरस्कार मिळाले आहेत. तसेच शेती गौरव पुरस्कार, रोटरी क्लबचा कृषी दीपस्तंभ पुरस्कार, तुकडोजी महाराज सेवा समिती अकोला व ह्यलोकमतह्णच्यावतीने दिला जाणारा कृषिरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी शेतात केलेले संशोधन ते आता फिलिपाइन्स येथे मांडणार आहेत. नानोटे यांच्याकडे ५0 एकर ओलिताची शेती आहे. ते प्रामुख्याने कपाशीचे पीक घेतात. कपाशी व गव्हाचे पीक आल्यानंतर कुटार काढून त्याची विक्री न करता ते शेतातच गाडतात. त्यातून सेंद्रिय खत तयार होते. या खतामुळे पुढील वर्षी उत्पादनात वाढ होते. उत्पादनाच्या हव्यासापोटी मातीत जास्तीत जास्त रासायनिक खते टाकणे व मातीचा पोत बिघडविण्यास नानोटे यांचा विरोध आहे. त्यामुळे ते मातीत आवश्यक तेवढेच खत टाकतात. त्यामुळे उत्पादनातही वाढ होते. कपाशीचे एक वर्षांचे पीक ते केवळ सहा महिनेच घेतात. त्यांच्या या प्रयोगामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होत असून, मातीचे आरोग्यही चांगले राहते. या प्रयोगाबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.