शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

मेरे राखी का मतलब है प्यार भैया… - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:22 IST

बहीण-भावाच्या अतूट नात्याचे बंधन रक्षाबंधन सण साजरा करून दरवर्षी नव्याने अधिक घट्ट केले जाते. अगदी लहानपणापासून बहीण-भावामध्ये सुख-दुःखाचे उभे-आडवे ...

बहीण-भावाच्या अतूट नात्याचे बंधन रक्षाबंधन सण साजरा करून दरवर्षी नव्याने अधिक घट्ट केले जाते. अगदी लहानपणापासून बहीण-भावामध्ये सुख-दुःखाचे उभे-आडवे धागे एकत्रित विणून वर्षानुवर्ष हे रक्षाबंधन अतूट होत असते. राखी म्हणून जो धागा भावाच्या हातात बांधला जातो ही केवळ नावापुरती परंपरा नाही त्यातील भावना समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जन्माला आल्यापासून एकत्रित राहिलेले बहीण-भाऊ विवाहानंतर वेगवेगळ्या मार्गाने जातात त्यावेळी त्यांना एकत्रित आणण्याचे एक माध्यम म्हणजे रक्षाबंधन. कारण तो स्नेह हा दिवस जपून ठेवतो. फक्त हे बंधन बहीण आणि भावांनी समजून घ्यावे!

हल्ली या पवित्र नात्यातही स्वार्थ भरलेला दिसतो. कुठे कुठे हा सण देण्या- घेण्यापुरता राहिला आहे. बहीण भावाच्या या नात्यात व्यवहार, व्यापार डोकावताना दिसतो. पैशाने सर्व काही तोलणाऱ्या या जगात निरर्थक गोष्टीलाही महत्त्व दिले जाते. बहिणीने राखी बांधली की गलेलठ्ठ मागणी असते किंवा बहीण मोठी मागणी करेल, अशी भावाला भीती असते. अशा वेळी पवित्र नात्यात प्रेम लोपल्यासारखे वाटते. खरेतर हा पवित्र धागा म्हणजे केवळ साधा धागा नसून तो बांधण्यामागची भावना तेवढीच पवित्र असली, तर तो अनमोल असतो. या धाग्यात प्रेम, स्नेह, ममता बांधली गेली पाहिजे. हे एक पवित्र बंधन आहे. मुळात नि:स्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचे नाते म्हटले जाते.

तसेच या सणामागची दुसरी भूमिका म्हणजे, महिलाप्रती असलेल्या संरक्षणाची भावना वाढीस लागावी. आपल्या संस्कृतीमध्ये अशा सणांना बांधून समाजाला योग्य दिशा दिली जाते. राखी या शब्दात ‘रक्षण कर’ किंवा ‘राख म्हणजे सांभाळा’ हा संकेत आहे. कोणत्याही कर्तबगार करारी पुरुषाच्या हाती राखी बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हा त्याचा गर्भित अर्थ असल्यामुळे आज जागोजागी स्त्रियांवर अत्याचार होताना दिसतात. अशा वेळी पुरुषाने प्रत्येक स्त्रीचा सन्मान करावा तिच्यावर अत्याचार नाही, तर तिचे रक्षण करावे. हा रक्षणामागचा उद्देश खूप मोठा आहे. रक्षाबंधन हे देशात समाजात परिवारात एकसूत्रता, एक बद्धता राहावी, प्रेम, सलोख्याचे भाव निर्माण व्हावे या हेतूने सणाच्या माध्यमातून संस्कृतीने सांगितलेला हा एक सुंदर उपाय आहे. राखी म्हणजे एक अनमोल धागा जो कोणत्याही संपत्ती सोबत तोलला जाऊ शकत नाही. बहीण-भावाच्या नात्याला दरवर्षी एक घट्ट प्रेमाची लपेट यामुळे बसते, म्हणून राखीचा अर्थ केवळ प्रेम आणि प्रेम आहे...

-प्रा. संगीता के. पवार (काळणे),

विदर्भ महाविद्यालय, बुलडाणा