शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

मेरे राखी का मतलब है प्यार भैया… - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:22 IST

बहीण-भावाच्या अतूट नात्याचे बंधन रक्षाबंधन सण साजरा करून दरवर्षी नव्याने अधिक घट्ट केले जाते. अगदी लहानपणापासून बहीण-भावामध्ये सुख-दुःखाचे उभे-आडवे ...

बहीण-भावाच्या अतूट नात्याचे बंधन रक्षाबंधन सण साजरा करून दरवर्षी नव्याने अधिक घट्ट केले जाते. अगदी लहानपणापासून बहीण-भावामध्ये सुख-दुःखाचे उभे-आडवे धागे एकत्रित विणून वर्षानुवर्ष हे रक्षाबंधन अतूट होत असते. राखी म्हणून जो धागा भावाच्या हातात बांधला जातो ही केवळ नावापुरती परंपरा नाही त्यातील भावना समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जन्माला आल्यापासून एकत्रित राहिलेले बहीण-भाऊ विवाहानंतर वेगवेगळ्या मार्गाने जातात त्यावेळी त्यांना एकत्रित आणण्याचे एक माध्यम म्हणजे रक्षाबंधन. कारण तो स्नेह हा दिवस जपून ठेवतो. फक्त हे बंधन बहीण आणि भावांनी समजून घ्यावे!

हल्ली या पवित्र नात्यातही स्वार्थ भरलेला दिसतो. कुठे कुठे हा सण देण्या- घेण्यापुरता राहिला आहे. बहीण भावाच्या या नात्यात व्यवहार, व्यापार डोकावताना दिसतो. पैशाने सर्व काही तोलणाऱ्या या जगात निरर्थक गोष्टीलाही महत्त्व दिले जाते. बहिणीने राखी बांधली की गलेलठ्ठ मागणी असते किंवा बहीण मोठी मागणी करेल, अशी भावाला भीती असते. अशा वेळी पवित्र नात्यात प्रेम लोपल्यासारखे वाटते. खरेतर हा पवित्र धागा म्हणजे केवळ साधा धागा नसून तो बांधण्यामागची भावना तेवढीच पवित्र असली, तर तो अनमोल असतो. या धाग्यात प्रेम, स्नेह, ममता बांधली गेली पाहिजे. हे एक पवित्र बंधन आहे. मुळात नि:स्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचे नाते म्हटले जाते.

तसेच या सणामागची दुसरी भूमिका म्हणजे, महिलाप्रती असलेल्या संरक्षणाची भावना वाढीस लागावी. आपल्या संस्कृतीमध्ये अशा सणांना बांधून समाजाला योग्य दिशा दिली जाते. राखी या शब्दात ‘रक्षण कर’ किंवा ‘राख म्हणजे सांभाळा’ हा संकेत आहे. कोणत्याही कर्तबगार करारी पुरुषाच्या हाती राखी बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हा त्याचा गर्भित अर्थ असल्यामुळे आज जागोजागी स्त्रियांवर अत्याचार होताना दिसतात. अशा वेळी पुरुषाने प्रत्येक स्त्रीचा सन्मान करावा तिच्यावर अत्याचार नाही, तर तिचे रक्षण करावे. हा रक्षणामागचा उद्देश खूप मोठा आहे. रक्षाबंधन हे देशात समाजात परिवारात एकसूत्रता, एक बद्धता राहावी, प्रेम, सलोख्याचे भाव निर्माण व्हावे या हेतूने सणाच्या माध्यमातून संस्कृतीने सांगितलेला हा एक सुंदर उपाय आहे. राखी म्हणजे एक अनमोल धागा जो कोणत्याही संपत्ती सोबत तोलला जाऊ शकत नाही. बहीण-भावाच्या नात्याला दरवर्षी एक घट्ट प्रेमाची लपेट यामुळे बसते, म्हणून राखीचा अर्थ केवळ प्रेम आणि प्रेम आहे...

-प्रा. संगीता के. पवार (काळणे),

विदर्भ महाविद्यालय, बुलडाणा