शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

मेरे राखी का मतलब है प्यार भैया… - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:22 IST

बहीण-भावाच्या अतूट नात्याचे बंधन रक्षाबंधन सण साजरा करून दरवर्षी नव्याने अधिक घट्ट केले जाते. अगदी लहानपणापासून बहीण-भावामध्ये सुख-दुःखाचे उभे-आडवे ...

बहीण-भावाच्या अतूट नात्याचे बंधन रक्षाबंधन सण साजरा करून दरवर्षी नव्याने अधिक घट्ट केले जाते. अगदी लहानपणापासून बहीण-भावामध्ये सुख-दुःखाचे उभे-आडवे धागे एकत्रित विणून वर्षानुवर्ष हे रक्षाबंधन अतूट होत असते. राखी म्हणून जो धागा भावाच्या हातात बांधला जातो ही केवळ नावापुरती परंपरा नाही त्यातील भावना समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जन्माला आल्यापासून एकत्रित राहिलेले बहीण-भाऊ विवाहानंतर वेगवेगळ्या मार्गाने जातात त्यावेळी त्यांना एकत्रित आणण्याचे एक माध्यम म्हणजे रक्षाबंधन. कारण तो स्नेह हा दिवस जपून ठेवतो. फक्त हे बंधन बहीण आणि भावांनी समजून घ्यावे!

हल्ली या पवित्र नात्यातही स्वार्थ भरलेला दिसतो. कुठे कुठे हा सण देण्या- घेण्यापुरता राहिला आहे. बहीण भावाच्या या नात्यात व्यवहार, व्यापार डोकावताना दिसतो. पैशाने सर्व काही तोलणाऱ्या या जगात निरर्थक गोष्टीलाही महत्त्व दिले जाते. बहिणीने राखी बांधली की गलेलठ्ठ मागणी असते किंवा बहीण मोठी मागणी करेल, अशी भावाला भीती असते. अशा वेळी पवित्र नात्यात प्रेम लोपल्यासारखे वाटते. खरेतर हा पवित्र धागा म्हणजे केवळ साधा धागा नसून तो बांधण्यामागची भावना तेवढीच पवित्र असली, तर तो अनमोल असतो. या धाग्यात प्रेम, स्नेह, ममता बांधली गेली पाहिजे. हे एक पवित्र बंधन आहे. मुळात नि:स्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचे नाते म्हटले जाते.

तसेच या सणामागची दुसरी भूमिका म्हणजे, महिलाप्रती असलेल्या संरक्षणाची भावना वाढीस लागावी. आपल्या संस्कृतीमध्ये अशा सणांना बांधून समाजाला योग्य दिशा दिली जाते. राखी या शब्दात ‘रक्षण कर’ किंवा ‘राख म्हणजे सांभाळा’ हा संकेत आहे. कोणत्याही कर्तबगार करारी पुरुषाच्या हाती राखी बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हा त्याचा गर्भित अर्थ असल्यामुळे आज जागोजागी स्त्रियांवर अत्याचार होताना दिसतात. अशा वेळी पुरुषाने प्रत्येक स्त्रीचा सन्मान करावा तिच्यावर अत्याचार नाही, तर तिचे रक्षण करावे. हा रक्षणामागचा उद्देश खूप मोठा आहे. रक्षाबंधन हे देशात समाजात परिवारात एकसूत्रता, एक बद्धता राहावी, प्रेम, सलोख्याचे भाव निर्माण व्हावे या हेतूने सणाच्या माध्यमातून संस्कृतीने सांगितलेला हा एक सुंदर उपाय आहे. राखी म्हणजे एक अनमोल धागा जो कोणत्याही संपत्ती सोबत तोलला जाऊ शकत नाही. बहीण-भावाच्या नात्याला दरवर्षी एक घट्ट प्रेमाची लपेट यामुळे बसते, म्हणून राखीचा अर्थ केवळ प्रेम आणि प्रेम आहे...

-प्रा. संगीता के. पवार (काळणे),

विदर्भ महाविद्यालय, बुलडाणा