शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

माेफत धान्याचा गैरव्यवहार रोखण्यासाठी गावागांवात ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 11:16 IST

Meetings of Village Vigilance Committees : मोफत धान्याचा गैरव्यवहार रोखण्यासाठी जिल्हयातील गावागावांत ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत.

-संतोष येलकर 

अकोला: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनामार्फत सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत लाभार्थी रेशन कार्डधारकांना मोफत धान्याचे वितरण करण्यात येत आहे; मात्र वितरीत करण्यात आलेल्या मोफत धान्याचा गैरव्यवहार होऊ नये, यासाठी जिल्हयातील गावागावांत ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १० एप्रिल रोजी जिल्हयातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) व तहसीलदारांना दिले. त्यानुसार मोफत धान्याचा गैरव्यवहार रोखण्यासाठी जिल्हयातील गावागावांत ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग आणि निर्बंधांच्या परिस्थितीत सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत गरिब रेशन कार्डधारकांना दरमहा मोफत धान्याचे वितरण करण्यात येत आहे. त्यामध्ये राज्य शासनामार्फत गत मे महिन्यात मोफत धान्याचे वितरण करण्यात आले असून, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेंतर्गत मे व जून या दोन महिन्यांत मोफत धान्य वाटप करण्यात येत असून, दिवाळीपर्यंत मोफत धान्याचे वितरण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हयात प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत लाभार्थी रेशन कार्डधारकांना गहू व तांदूळ इत्यादी धान्याचे मोफत वितरण करण्यात येत असून, रास्तभाव धान्य दुकानांमधून वितरीत करण्यात आलेल्या मोफत धान्याची विक्री होणार नाही, गैरव्यवहार होणार नाही, यासाठी जिल्हयातील प्रत्येक गावांत ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका घेऊन, जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हयातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले. त्यानुसार वितरीत करण्यात आलेल्या मोफत धान्याचा गैरव्यवहार रोखण्यासाठी जिल्हयातील गावागावांत ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत.

 

सरपंचांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठका !

कोरोना काळात प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशन कार्डधारकांना वितरीत करण्यात आलेल्या धान्याची विक्री, गैरव्यवहार होऊ नये, यासाठी जिल्हयातील प्रत्येक गावांत ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. संबंधित सरपंच तथा ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत.

 

कोरोना काळात जिल्हयातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत लाभार्थी रेशन कार्डधारकांना वितरीत करण्यात आलेल्या मोफत धान्याचा गैरव्यवहार होऊ नये, यासाठी जिल्हयातील प्रत्येक गावांत ग्राम दक्षता बैठका घेऊन जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार गावागावांत ग्राम दक्षता बैठका घेण्यात येणार आहेत.

बी.यू.काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत