शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

माेफत धान्याचा गैरव्यवहार रोखण्यासाठी गावागांवात ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 11:16 IST

Meetings of Village Vigilance Committees : मोफत धान्याचा गैरव्यवहार रोखण्यासाठी जिल्हयातील गावागावांत ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत.

-संतोष येलकर 

अकोला: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनामार्फत सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत लाभार्थी रेशन कार्डधारकांना मोफत धान्याचे वितरण करण्यात येत आहे; मात्र वितरीत करण्यात आलेल्या मोफत धान्याचा गैरव्यवहार होऊ नये, यासाठी जिल्हयातील गावागावांत ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १० एप्रिल रोजी जिल्हयातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) व तहसीलदारांना दिले. त्यानुसार मोफत धान्याचा गैरव्यवहार रोखण्यासाठी जिल्हयातील गावागावांत ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग आणि निर्बंधांच्या परिस्थितीत सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत गरिब रेशन कार्डधारकांना दरमहा मोफत धान्याचे वितरण करण्यात येत आहे. त्यामध्ये राज्य शासनामार्फत गत मे महिन्यात मोफत धान्याचे वितरण करण्यात आले असून, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेंतर्गत मे व जून या दोन महिन्यांत मोफत धान्य वाटप करण्यात येत असून, दिवाळीपर्यंत मोफत धान्याचे वितरण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हयात प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत लाभार्थी रेशन कार्डधारकांना गहू व तांदूळ इत्यादी धान्याचे मोफत वितरण करण्यात येत असून, रास्तभाव धान्य दुकानांमधून वितरीत करण्यात आलेल्या मोफत धान्याची विक्री होणार नाही, गैरव्यवहार होणार नाही, यासाठी जिल्हयातील प्रत्येक गावांत ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका घेऊन, जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हयातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले. त्यानुसार वितरीत करण्यात आलेल्या मोफत धान्याचा गैरव्यवहार रोखण्यासाठी जिल्हयातील गावागावांत ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत.

 

सरपंचांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठका !

कोरोना काळात प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशन कार्डधारकांना वितरीत करण्यात आलेल्या धान्याची विक्री, गैरव्यवहार होऊ नये, यासाठी जिल्हयातील प्रत्येक गावांत ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. संबंधित सरपंच तथा ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत.

 

कोरोना काळात जिल्हयातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत लाभार्थी रेशन कार्डधारकांना वितरीत करण्यात आलेल्या मोफत धान्याचा गैरव्यवहार होऊ नये, यासाठी जिल्हयातील प्रत्येक गावांत ग्राम दक्षता बैठका घेऊन जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार गावागावांत ग्राम दक्षता बैठका घेण्यात येणार आहेत.

बी.यू.काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत