शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कैद्यांद्वारे होत आहे ‘मास्क’ची निर्मिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 14:04 IST

जिल्हा मध्यवर्ती कारागृहांमध्ये कैद्यांकडून मास्कची निर्मिती करून घेण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात आगामी पंधरा दिवस ‘कोरोना’चे संकट आहे. त्यावर मात करण्यासाठी सर्वच स्तरातून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाचा संभाव्य धोका पाहता राज्यभरातील सर्वच जिल्हा मध्यवर्ती कारागृहांमध्ये कैद्यांकडून मास्कची निर्मिती करून घेण्यात येत आहे.राज्यात सर्वत्र कोरोनाचे संकट आहे. त्यावर मात करण्यासाठी राज्यभरात प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. शिवाय, आगामी काळातील स्थिती पाहता वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही मास्कचा तुटवडा भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्यंतरी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारागृहातील कैद्यांद्वारे मास्क निर्मितीची संकल्पना मांडली होती.त्यांच्या या संकल्पनेला प्रतिसाद देत राज्यभरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांद्वारे मास्क निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे.मास्क निर्मिती करताना कैद्यांकडून स्वच्छतादेखील पाळण्यात येत आहे. शिवाय, सर्वसाधारण विषाणूंचादेखील एकापासून दुसºयाला संसर्ग होऊ नये, यासाठी तेदेखील मास्क लावूनच काम करीत असल्याचे चित्र जिल्हा कारागृहात दिसून येते.‘मास्क’चा उपयोग कैदी अन् पोलीस कर्मचाऱ्यांसाठीच! कारागृहात निर्मित मास्कचा उपयोग हा कैद्यांसह कारागृहातील पोलीस कर्मचाºयांसाठीच केला जाणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला बाहेरून मास्क विकत आणावे लागणार नाहीत.

कोरोनाचा धोका पाहता कारागृहात आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी बाहेरून येताना हात व तोंड स्वच्छ धुवूनच कारागृहात प्रवेश करीत आहेत. कैद्याकडून मास्कची निर्मितीदेखील करण्यात येत आहे. या मास्कचा उपयोग कैद्यांसह पोलीस कर्मचारी करणार आहेत.- ए. एस. सदाफुले, कारागृह अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कारागृह, अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या