शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बाजार समिती बंद, शेतकऱ्यांची लूट थांबवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:19 IST

शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची टीका माजी आमदार संजय गावंडे यांनी केली आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी ...

शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची टीका माजी आमदार संजय गावंडे यांनी केली आहे.

जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. शेतकऱ्यांना नगदी रक्कम देऊनच खरेदी करावी लागते. अशावेळी भाव वाढतील या आशेने पुढील हंगामाची तयारी व घरखर्च यासाठी शेतकरी मालाची साठवणूक करीत असतो. परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती काही दिवसापासून बंद असून २२ तारखेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे दलाल गावोगावी जाऊन शेतकऱ्यांचा माल कमी भावात खरेदी शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. पुढील हंगामाची चिंता असलेल्या शेतकऱ्यांना आपला शेतीमाल कमी भावात विकावा लागत आहे. शेतकरी आपला माल विकण्यासाठी ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर अवलंबून असतो. तेथील अधिकाऱ्यांना बाजार समिती चालू ठेवण्यात कुठल्याही प्रकारचे स्वारस्य नसते. कारण शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचा नगदीचा फायदा त्यांना नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लुटणारे व्यापारी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करीत असतात. बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती सध्या निर्माण झाली असल्याचे माजी आमदार संजय गावंडे यांनी म्हटले आहे.