शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

निवडणूक जिंकण्यासाठी मराठा आरक्षण - प्रदीप ढोबळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 19:12 IST

मराठा आरक्षण हे केवळ निवडणूक जिंकण्यासाठी दिलेले आरक्षण असल्याचं ओबीसी सेवासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी रविवारी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

अकोला : संविधानाच्या कसोटीवर कोणालाही आरक्षण मिळत असेल, तर तो सामाजिक न्यायाचा एक भाग आहे. पण, मराठा आरक्षण हे केवळ निवडणूक जिंकण्यासाठी दिलेले आरक्षण असल्याचं ओबीसी सेवासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी रविवारी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ओबीसी सेवासंघाच्या ९ व्या राज्यस्तरीय अधिवेशनानिमित्ताने रविवार ९ डिसेंबर रोजी अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’ दिलेल्या खास मुलाखतीत ओबीसी चळवळ, राजकीय षडयंत्र आणि इतर मुद्यांवर दिलखुलास चर्चा केली.प्रश्न : ओबीसीचा लढा किती वर्षांपासून सुरू आहे ?राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक समता निर्माण करण्यासाठी २४ एप्रिल २००० रोजी बदलापूर, मुंबई येथे ओबीसी सेवा संघाची स्थापना झाली. मागील १८ वर्षांपासून सातत्याने ओबीसी वर्गाच्या विकासासाठी काही वेळी सरकारशी चर्चा करुन, कधी धरणे धरून, कधी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय परिषदा घेऊन कार्य केले आहे. ओबीसी सेवा संघाने २००१ ला ओबीसी वर्गाच्या जनगणनेसाठी मुंबई उच्च न्यायालयात पिटीशन दाखल केले होते. त्यानंतर २००८ साली भंडारा येथे देशातील पहिली जनगणना परिषद घेण्यात आली.

प्रश्न : मराठा आरक्षणासंदर्भात असमर्थता आहे का?संवीधानाच्या कसोटीवर कोणालाही आरक्षण मिळत असेल, तर ते सामाजिक न्यायाचा भाग आहे. पण, मराठा समाजाला मिळालेले आरक्षण न्यायालयीन कसोटीवर करे उतरणार नाही. कारण, मराठा समाजाला देण्यात आलेले १६ टक्के आरक्षण कोणत्या पार्श्वभूमीवर दिले आहे, याचं गणित जुळत नाही. मराठा समाजाची जनगणना झालेली नाही. अपूर्ण आकडेवारीमुळे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही.

प्रश्न : ओबीसीचा संघर्ष कशासाठी ?ओबीसी समाज विखूरलेला असून, अजूनही वैचारीक गुलामगीरीत जखळलेला आहे. हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्मात ओबीसी असून, आपसात भांडणे हा या समाचाचा संघर्ष नाही. तर समाजाला एकत्रित आणण्याची गरज आहे. हाच मोठा संघर्ष ओबीसी सेवा संघाच्या माध्यमातून लढल्या जात आहे. कारण, हा समाज एकत्र आल्यास आणि सत्ता मिळवल्यास या लोकशाहीत बहुजनांचेच राज्य असेल.प्रश्न : ओबीसी सेवासंघात युवकांची काय भूमीका आहे ?ओबीसीला प्रबळ करायचं असेल, तर त्यात युवकांची मोठी भूमीका आहे. सामाजिक विषमता, बेरोजगारीत जखळलेल्या युवा वर्गाला जागृक करून त्यांच्यातून नेतृत्व निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी ओबीसी सेवासंघ कार्यरत आहे. या राज्य अधिवेशनाला राज्यभरातील युवकांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली आहे. युवकांमधूनच ओबीसीचं पुढचं प्रभावी नेतृत्व उदयास येईल. त्यासाठी युवकांनी संघर्षासाठी पुढे येण्याची गरज आहे.

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत