शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

निवडणूक जिंकण्यासाठी मराठा आरक्षण - प्रदीप ढोबळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 19:12 IST

मराठा आरक्षण हे केवळ निवडणूक जिंकण्यासाठी दिलेले आरक्षण असल्याचं ओबीसी सेवासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी रविवारी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

अकोला : संविधानाच्या कसोटीवर कोणालाही आरक्षण मिळत असेल, तर तो सामाजिक न्यायाचा एक भाग आहे. पण, मराठा आरक्षण हे केवळ निवडणूक जिंकण्यासाठी दिलेले आरक्षण असल्याचं ओबीसी सेवासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी रविवारी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ओबीसी सेवासंघाच्या ९ व्या राज्यस्तरीय अधिवेशनानिमित्ताने रविवार ९ डिसेंबर रोजी अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’ दिलेल्या खास मुलाखतीत ओबीसी चळवळ, राजकीय षडयंत्र आणि इतर मुद्यांवर दिलखुलास चर्चा केली.प्रश्न : ओबीसीचा लढा किती वर्षांपासून सुरू आहे ?राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक समता निर्माण करण्यासाठी २४ एप्रिल २००० रोजी बदलापूर, मुंबई येथे ओबीसी सेवा संघाची स्थापना झाली. मागील १८ वर्षांपासून सातत्याने ओबीसी वर्गाच्या विकासासाठी काही वेळी सरकारशी चर्चा करुन, कधी धरणे धरून, कधी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय परिषदा घेऊन कार्य केले आहे. ओबीसी सेवा संघाने २००१ ला ओबीसी वर्गाच्या जनगणनेसाठी मुंबई उच्च न्यायालयात पिटीशन दाखल केले होते. त्यानंतर २००८ साली भंडारा येथे देशातील पहिली जनगणना परिषद घेण्यात आली.

प्रश्न : मराठा आरक्षणासंदर्भात असमर्थता आहे का?संवीधानाच्या कसोटीवर कोणालाही आरक्षण मिळत असेल, तर ते सामाजिक न्यायाचा भाग आहे. पण, मराठा समाजाला मिळालेले आरक्षण न्यायालयीन कसोटीवर करे उतरणार नाही. कारण, मराठा समाजाला देण्यात आलेले १६ टक्के आरक्षण कोणत्या पार्श्वभूमीवर दिले आहे, याचं गणित जुळत नाही. मराठा समाजाची जनगणना झालेली नाही. अपूर्ण आकडेवारीमुळे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही.

प्रश्न : ओबीसीचा संघर्ष कशासाठी ?ओबीसी समाज विखूरलेला असून, अजूनही वैचारीक गुलामगीरीत जखळलेला आहे. हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्मात ओबीसी असून, आपसात भांडणे हा या समाचाचा संघर्ष नाही. तर समाजाला एकत्रित आणण्याची गरज आहे. हाच मोठा संघर्ष ओबीसी सेवा संघाच्या माध्यमातून लढल्या जात आहे. कारण, हा समाज एकत्र आल्यास आणि सत्ता मिळवल्यास या लोकशाहीत बहुजनांचेच राज्य असेल.प्रश्न : ओबीसी सेवासंघात युवकांची काय भूमीका आहे ?ओबीसीला प्रबळ करायचं असेल, तर त्यात युवकांची मोठी भूमीका आहे. सामाजिक विषमता, बेरोजगारीत जखळलेल्या युवा वर्गाला जागृक करून त्यांच्यातून नेतृत्व निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी ओबीसी सेवासंघ कार्यरत आहे. या राज्य अधिवेशनाला राज्यभरातील युवकांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली आहे. युवकांमधूनच ओबीसीचं पुढचं प्रभावी नेतृत्व उदयास येईल. त्यासाठी युवकांनी संघर्षासाठी पुढे येण्याची गरज आहे.

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत