शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

निवडणूक जिंकण्यासाठी मराठा आरक्षण - प्रदीप ढोबळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 19:12 IST

मराठा आरक्षण हे केवळ निवडणूक जिंकण्यासाठी दिलेले आरक्षण असल्याचं ओबीसी सेवासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी रविवारी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

अकोला : संविधानाच्या कसोटीवर कोणालाही आरक्षण मिळत असेल, तर तो सामाजिक न्यायाचा एक भाग आहे. पण, मराठा आरक्षण हे केवळ निवडणूक जिंकण्यासाठी दिलेले आरक्षण असल्याचं ओबीसी सेवासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी रविवारी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ओबीसी सेवासंघाच्या ९ व्या राज्यस्तरीय अधिवेशनानिमित्ताने रविवार ९ डिसेंबर रोजी अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’ दिलेल्या खास मुलाखतीत ओबीसी चळवळ, राजकीय षडयंत्र आणि इतर मुद्यांवर दिलखुलास चर्चा केली.प्रश्न : ओबीसीचा लढा किती वर्षांपासून सुरू आहे ?राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक समता निर्माण करण्यासाठी २४ एप्रिल २००० रोजी बदलापूर, मुंबई येथे ओबीसी सेवा संघाची स्थापना झाली. मागील १८ वर्षांपासून सातत्याने ओबीसी वर्गाच्या विकासासाठी काही वेळी सरकारशी चर्चा करुन, कधी धरणे धरून, कधी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय परिषदा घेऊन कार्य केले आहे. ओबीसी सेवा संघाने २००१ ला ओबीसी वर्गाच्या जनगणनेसाठी मुंबई उच्च न्यायालयात पिटीशन दाखल केले होते. त्यानंतर २००८ साली भंडारा येथे देशातील पहिली जनगणना परिषद घेण्यात आली.

प्रश्न : मराठा आरक्षणासंदर्भात असमर्थता आहे का?संवीधानाच्या कसोटीवर कोणालाही आरक्षण मिळत असेल, तर ते सामाजिक न्यायाचा भाग आहे. पण, मराठा समाजाला मिळालेले आरक्षण न्यायालयीन कसोटीवर करे उतरणार नाही. कारण, मराठा समाजाला देण्यात आलेले १६ टक्के आरक्षण कोणत्या पार्श्वभूमीवर दिले आहे, याचं गणित जुळत नाही. मराठा समाजाची जनगणना झालेली नाही. अपूर्ण आकडेवारीमुळे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही.

प्रश्न : ओबीसीचा संघर्ष कशासाठी ?ओबीसी समाज विखूरलेला असून, अजूनही वैचारीक गुलामगीरीत जखळलेला आहे. हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्मात ओबीसी असून, आपसात भांडणे हा या समाचाचा संघर्ष नाही. तर समाजाला एकत्रित आणण्याची गरज आहे. हाच मोठा संघर्ष ओबीसी सेवा संघाच्या माध्यमातून लढल्या जात आहे. कारण, हा समाज एकत्र आल्यास आणि सत्ता मिळवल्यास या लोकशाहीत बहुजनांचेच राज्य असेल.प्रश्न : ओबीसी सेवासंघात युवकांची काय भूमीका आहे ?ओबीसीला प्रबळ करायचं असेल, तर त्यात युवकांची मोठी भूमीका आहे. सामाजिक विषमता, बेरोजगारीत जखळलेल्या युवा वर्गाला जागृक करून त्यांच्यातून नेतृत्व निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी ओबीसी सेवासंघ कार्यरत आहे. या राज्य अधिवेशनाला राज्यभरातील युवकांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली आहे. युवकांमधूनच ओबीसीचं पुढचं प्रभावी नेतृत्व उदयास येईल. त्यासाठी युवकांनी संघर्षासाठी पुढे येण्याची गरज आहे.

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत