शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

वनाैषधी, दिनचर्या, आहाराद्वारे अनेकांना केले राेगमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:17 IST

संतोषकुमार गवई पातूर : आजच्या धावपळीच्या युगात अगदी लहानपणापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. आजारपणावर लाखाे रुपये खर्चही ...

संतोषकुमार गवई

पातूर : आजच्या धावपळीच्या युगात अगदी लहानपणापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. आजारपणावर लाखाे रुपये खर्चही हाेतात. मात्र, वनाैषधीतून शेकडाे रुग्णांना राेगमुक्त करणाऱ्या वनौषधी जाणकाराचे नाव सतीश निमकाळे. आसोला येथील ५० वर्षीय सतीश निमकाळे यांचे शिक्षण बी. ए.पर्यंत झाले आहे. स्वतःला समाजसेवेत झोकून गोर-गरिबांचा डॉक्टर म्हणून ते नावारूपास आले आहेत.

सध्या देशात वेगाने वाढत असलेला आजार म्हणजे शुगर (मधुमेह). परंतु हा आजार नेमका कशामुळे होतो? हा अनुवांशिक असतो का? यावर उपाय काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे वनौषधीचे जाणकार सतीश निमकाळे यांच्याकडे आहेत. मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, कंबरदुखी, गुडघेदुखी, पोटाचे विकार, मूळव्याधसारख्या असाध्य आजारांनी त्रस्त असलेल्या शेकडो रोग्यांना आपल्या वनौषधीच्या माध्यमातून रोगमुक्त केले.

सतीश निमकाळे यांना वनौषधींचे ज्ञान राजस्थानमधून प्राप्त झाले. गरज ही शोधाची जननी असते. या उक्तीप्रमाणे त्यांच्या आयुष्यात अनेक दुःखद घटना घडल्या. त्यांच्या आईचे हृदय निकामी झाल्याने मृत्यू झाला. मुलाला हृदयाचा आजार, वडिलांना मधुमेह व पॅरॅलिसिस, तर पत्नीलासुद्धा हायग्रेड कॅन्सर अशा परिस्थितीत करावे काय? म्हणून सतीश निमकाळे यांनी रोग व रोगाची कारणे शोधण्याला सुरुवात केली. आहार हेच औषध असून आपली दिनचर्या बदलणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पत्नीला कॅन्सरसारख्या असाध्य रोगाने ग्रासले आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किमोथेरपी देणे क्रमप्राप्त असतानासुद्धा किमोथेरपी न देता आपल्या पत्नीला कोणतेही औषध न देता त्यांनी कॅन्सरमुक्त केले. आज त्यांची पत्नी ठणठणीत आहे. सतीश निमकाळे यांच्या अभ्यासावरून माणूस व माणसाने पाळलेल्या प्राण्यांना रोगांनी ग्रासले असल्यामुळे आहार हेच औषध म्हणून घेणे बंधनकारक आहे, असे ते सांगतात. जो खाईल पोळी त्याची सुटणार नाही गोळी, असे त्यांचे ठाम मत आहे. कारण गव्हात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने मानवी शरीरास ते हानिकारक असल्याचे ते सांगतात. वैद्य सतीश निमकाळे यांनी आतापर्यंत शेकडो रुग्णांना आपल्या नैसर्गिक वनस्पतीच्या माध्यमातून अनेक दुर्धर आजारातून मुक्त केले आहे. प्रधानमंत्र्यांच्या ‘फिट इंडिया’ माेहिमेत भाग घेऊन आपल्या गावापासून सुरुवात करून संपूर्ण महाराष्ट्र रोगमुक्त करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक हाेत असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.