शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

वनाैषधी, दिनचर्या, आहाराद्वारे अनेकांना केले राेगमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:17 IST

संतोषकुमार गवई पातूर : आजच्या धावपळीच्या युगात अगदी लहानपणापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. आजारपणावर लाखाे रुपये खर्चही ...

संतोषकुमार गवई

पातूर : आजच्या धावपळीच्या युगात अगदी लहानपणापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. आजारपणावर लाखाे रुपये खर्चही हाेतात. मात्र, वनाैषधीतून शेकडाे रुग्णांना राेगमुक्त करणाऱ्या वनौषधी जाणकाराचे नाव सतीश निमकाळे. आसोला येथील ५० वर्षीय सतीश निमकाळे यांचे शिक्षण बी. ए.पर्यंत झाले आहे. स्वतःला समाजसेवेत झोकून गोर-गरिबांचा डॉक्टर म्हणून ते नावारूपास आले आहेत.

सध्या देशात वेगाने वाढत असलेला आजार म्हणजे शुगर (मधुमेह). परंतु हा आजार नेमका कशामुळे होतो? हा अनुवांशिक असतो का? यावर उपाय काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे वनौषधीचे जाणकार सतीश निमकाळे यांच्याकडे आहेत. मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, कंबरदुखी, गुडघेदुखी, पोटाचे विकार, मूळव्याधसारख्या असाध्य आजारांनी त्रस्त असलेल्या शेकडो रोग्यांना आपल्या वनौषधीच्या माध्यमातून रोगमुक्त केले.

सतीश निमकाळे यांना वनौषधींचे ज्ञान राजस्थानमधून प्राप्त झाले. गरज ही शोधाची जननी असते. या उक्तीप्रमाणे त्यांच्या आयुष्यात अनेक दुःखद घटना घडल्या. त्यांच्या आईचे हृदय निकामी झाल्याने मृत्यू झाला. मुलाला हृदयाचा आजार, वडिलांना मधुमेह व पॅरॅलिसिस, तर पत्नीलासुद्धा हायग्रेड कॅन्सर अशा परिस्थितीत करावे काय? म्हणून सतीश निमकाळे यांनी रोग व रोगाची कारणे शोधण्याला सुरुवात केली. आहार हेच औषध असून आपली दिनचर्या बदलणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पत्नीला कॅन्सरसारख्या असाध्य रोगाने ग्रासले आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किमोथेरपी देणे क्रमप्राप्त असतानासुद्धा किमोथेरपी न देता आपल्या पत्नीला कोणतेही औषध न देता त्यांनी कॅन्सरमुक्त केले. आज त्यांची पत्नी ठणठणीत आहे. सतीश निमकाळे यांच्या अभ्यासावरून माणूस व माणसाने पाळलेल्या प्राण्यांना रोगांनी ग्रासले असल्यामुळे आहार हेच औषध म्हणून घेणे बंधनकारक आहे, असे ते सांगतात. जो खाईल पोळी त्याची सुटणार नाही गोळी, असे त्यांचे ठाम मत आहे. कारण गव्हात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने मानवी शरीरास ते हानिकारक असल्याचे ते सांगतात. वैद्य सतीश निमकाळे यांनी आतापर्यंत शेकडो रुग्णांना आपल्या नैसर्गिक वनस्पतीच्या माध्यमातून अनेक दुर्धर आजारातून मुक्त केले आहे. प्रधानमंत्र्यांच्या ‘फिट इंडिया’ माेहिमेत भाग घेऊन आपल्या गावापासून सुरुवात करून संपूर्ण महाराष्ट्र रोगमुक्त करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक हाेत असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.