अकोला: राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया १३ जुलैपासून सुरू झाली खरी; मात्र शहरासह ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांची दमछाक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे ४ दिवस उरले असून, त्यातही दोन दिवस सुटी असल्याने असंख्य उमेदवार निवडणूक लढण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत मुदत संपणार्या राज्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच पोटनिवडणुकांसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करणे व स्वीकारण्याची प्रक्रिया १३ जुलैपासून सुरू झाली आहे. १८ व १९ जुलै हे सुटीचे दोन दिवस वगळता २0 जुलैपर्यंंत दररोज सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. सेतू सुविधा केंद्र, ई-महासेवा केंद्र, ग्रामपंचायतींमधील संग्राम कक्ष किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध असलेल्या कोणत्याही ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरावयाचे आहेत. ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्याची ह्यप्रिंटह्ण काढून तहसीलदार तथा निवडणूक अधिकार्याकडे सादर करावयाची आहे; परंतु शहरांसह ग्रामीण भागात बहुतांश सेतू सुविधा केंद्र, ई-महासेवा केंद्र, तसेच ग्रामपंचायतींच्या संग्राम कक्षांमध्ये ह्यइंटरनेट कनेक्टिव्हिटीह्ण मिळत नसल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यात उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरताना संकेतस्थळ सुरू न होणे किंवा सुरू होण्यास विलंब लागणे, संकेतस्थळ उघडल्यानंतर कनेक्टिव्हिटी खंडित झाल्याने ते वारंवार बंद पडणे, तसेच स्पीड नसल्याने ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यास विलंब होणे, आदी समस्यांनी उमेदवार निवडणुकीआधीच त्रस्त झाले आहेत. ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २0 जुलैपर्यंंत असली तरी, १८ व १९ जुलै हे दोन दिवस सुटी असल्याने, हे दोन दिवस इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत. अशा परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणूक लढविणारे अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्यापासून वंचित राहणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात अकोल्याचे तहसीलदार संतोष शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी इच्छुक उमेदवारांकडून मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे सांगीतले. या अडचणींमुळे ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्याची मागणीही होत आहे. शासन स्तरावर यासंदर्भात विचार केला जाईल, असेही ते म्हणाले. *निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वीच उमेदवार हैराण! ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याची तयारी इच्छुक उमेदवारांनी केली आहे; मात्र निवडणुकीसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरताना इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसभर थांबून उमेदवारी अर्ज भरला जात नाही. त्यामुळे निवडणूक रिंगणात उतरण्यापूर्वी, उमेदवारी अर्ज भरतानाच उमेदवारांची दमछाक होत आहे.
अनेक उमेदवार निवडणूक लढण्यापासून वंचित राहण्याची शक्यता!
By admin | Updated: July 15, 2015 23:27 IST