शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

अनेक उमेदवार निवडणूक लढण्यापासून वंचित राहण्याची शक्यता!

By admin | Updated: July 15, 2015 23:27 IST

ग्रा.पं. निवडणूक, ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरताना तांत्रिक अडचणी, उमेदवारांची दमछाक.

अकोला: राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया १३ जुलैपासून सुरू झाली खरी; मात्र शहरासह ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांची दमछाक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे ४ दिवस उरले असून, त्यातही दोन दिवस सुटी असल्याने असंख्य उमेदवार निवडणूक लढण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत मुदत संपणार्‍या राज्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच पोटनिवडणुकांसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करणे व स्वीकारण्याची प्रक्रिया १३ जुलैपासून सुरू झाली आहे. १८ व १९ जुलै हे सुटीचे दोन दिवस वगळता २0 जुलैपर्यंंत दररोज सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. सेतू सुविधा केंद्र, ई-महासेवा केंद्र, ग्रामपंचायतींमधील संग्राम कक्ष किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध असलेल्या कोणत्याही ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरावयाचे आहेत. ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्याची ह्यप्रिंटह्ण काढून तहसीलदार तथा निवडणूक अधिकार्‍याकडे सादर करावयाची आहे; परंतु शहरांसह ग्रामीण भागात बहुतांश सेतू सुविधा केंद्र, ई-महासेवा केंद्र, तसेच ग्रामपंचायतींच्या संग्राम कक्षांमध्ये ह्यइंटरनेट कनेक्टिव्हिटीह्ण मिळत नसल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यात उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरताना संकेतस्थळ सुरू न होणे किंवा सुरू होण्यास विलंब लागणे, संकेतस्थळ उघडल्यानंतर कनेक्टिव्हिटी खंडित झाल्याने ते वारंवार बंद पडणे, तसेच स्पीड नसल्याने ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यास विलंब होणे, आदी समस्यांनी उमेदवार निवडणुकीआधीच त्रस्त झाले आहेत. ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २0 जुलैपर्यंंत असली तरी, १८ व १९ जुलै हे दोन दिवस सुटी असल्याने, हे दोन दिवस इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत. अशा परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणूक लढविणारे अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्यापासून वंचित राहणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात अकोल्याचे तहसीलदार संतोष शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी इच्छुक उमेदवारांकडून मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे सांगीतले. या अडचणींमुळे ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्याची मागणीही होत आहे. शासन स्तरावर यासंदर्भात विचार केला जाईल, असेही ते म्हणाले. *निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वीच उमेदवार हैराण! ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याची तयारी इच्छुक उमेदवारांनी केली आहे; मात्र निवडणुकीसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरताना इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसभर थांबून उमेदवारी अर्ज भरला जात नाही. त्यामुळे निवडणूक रिंगणात उतरण्यापूर्वी, उमेदवारी अर्ज भरतानाच उमेदवारांची दमछाक होत आहे.