शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

‘ईव्हीएम’ विरोधात लढ्याचा संकल्प करा - प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 13:34 IST

अकोला: येणाऱ्या निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) नको, ‘बॅलेट पेपर’ हवे असे सांगत, ‘ईव्हीएम’ विरोधात लढ्याचा संकल्प करण्याचे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केले.

ठळक मुद्देकोला क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित धम्म मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. मानवतेची ही व्यवस्था राहील की नाही, याबाबतचा फैसला २०१९ ची सार्वत्रिक निवड ठरवणार असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.मताचा अधिकार या शस्त्राच्या आधारेच मोदी सरकारचा पराभव केला पाहिजे, असेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले.

अकोला: येणाऱ्या निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) नको, ‘बॅलेट पेपर’ हवे असे सांगत, ‘ईव्हीएम’ विरोधात लढ्याचा संकल्प करण्याचे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केले.धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा शाखेच्यावतीने अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित धम्म मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अंजली आंबेडकर, भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, प्रदेश महासचिव भुईगळ, भन्ते बी. संघपाल, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे,भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य अध्यक्ष यू.जी. बोराळे, माजी मंत्री डॉ.डी.एम. भांडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, डी.एन. खंडारे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ. रहेमान खान, डॉ. सुरेश शेळके, सुजात आंबेडकर, वंदना वासनिक, अरुंधती सिरसाट आदी धम्मपीठावर उपस्थित होते.लोकशाही व्यवस्थेत ‘ईव्हीएम’ विरोधी लढ्यात सहभागी झाल्यास निवडणूक आयोगाला मतदान प्रक्रियेसाठी ‘ईव्हीएम’ वापरासंदर्भात निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे ‘ईव्हीएम’विरोधी लढयाचा संकल्प करण्याचे आवाहन अ‍ॅड. आंबेडकर यांनी केले. एक परिवर्तन १९५० ला झाले असून, मानवतेची व्यवस्था निर्माण करण्यात आली. मानवतेच्या या व्यवस्थेला सुरुंग लावण्याची आज देशातील परिस्थिती आहे, मानवतेची ही व्यवस्था राहील की नाही, याबाबतचा फैसला २०१९ ची सार्वत्रिक निवड ठरवणार असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. मताच्या अधिकारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार घालवू शकतो, मग या शस्त्राचा योग्य वापर आपण का करीत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मताचा अधिकार या शस्त्राच्या आधारेच मोदी सरकारचा पराभव केला पाहिजे, असेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, प्रदेश महासचिव अमीतभाई भुईगळ, प्रा. अंजली आंबेडकर, आ. बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, यू.जी. बोराळे, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, संध्या वाघोडे, रवींद्र दारोकार गुुरुजी यांनीही विचार मांडले. भन्ते बी. संघपाल यांनी सामूहिक त्रिशरण -पंचशील दिल्यानंतर सुरू झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव खंडारे, संचालन राजाभाऊ लबडे गुरुजी यांनी, तर आभारप्रदर्शन श्रावण ठोसर यांनी केले.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर