शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

‘ईव्हीएम’ विरोधात लढ्याचा संकल्प करा - प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 13:34 IST

अकोला: येणाऱ्या निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) नको, ‘बॅलेट पेपर’ हवे असे सांगत, ‘ईव्हीएम’ विरोधात लढ्याचा संकल्प करण्याचे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केले.

ठळक मुद्देकोला क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित धम्म मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. मानवतेची ही व्यवस्था राहील की नाही, याबाबतचा फैसला २०१९ ची सार्वत्रिक निवड ठरवणार असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.मताचा अधिकार या शस्त्राच्या आधारेच मोदी सरकारचा पराभव केला पाहिजे, असेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले.

अकोला: येणाऱ्या निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) नको, ‘बॅलेट पेपर’ हवे असे सांगत, ‘ईव्हीएम’ विरोधात लढ्याचा संकल्प करण्याचे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केले.धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा शाखेच्यावतीने अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित धम्म मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अंजली आंबेडकर, भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, प्रदेश महासचिव भुईगळ, भन्ते बी. संघपाल, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे,भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य अध्यक्ष यू.जी. बोराळे, माजी मंत्री डॉ.डी.एम. भांडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, डी.एन. खंडारे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ. रहेमान खान, डॉ. सुरेश शेळके, सुजात आंबेडकर, वंदना वासनिक, अरुंधती सिरसाट आदी धम्मपीठावर उपस्थित होते.लोकशाही व्यवस्थेत ‘ईव्हीएम’ विरोधी लढ्यात सहभागी झाल्यास निवडणूक आयोगाला मतदान प्रक्रियेसाठी ‘ईव्हीएम’ वापरासंदर्भात निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे ‘ईव्हीएम’विरोधी लढयाचा संकल्प करण्याचे आवाहन अ‍ॅड. आंबेडकर यांनी केले. एक परिवर्तन १९५० ला झाले असून, मानवतेची व्यवस्था निर्माण करण्यात आली. मानवतेच्या या व्यवस्थेला सुरुंग लावण्याची आज देशातील परिस्थिती आहे, मानवतेची ही व्यवस्था राहील की नाही, याबाबतचा फैसला २०१९ ची सार्वत्रिक निवड ठरवणार असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. मताच्या अधिकारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार घालवू शकतो, मग या शस्त्राचा योग्य वापर आपण का करीत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मताचा अधिकार या शस्त्राच्या आधारेच मोदी सरकारचा पराभव केला पाहिजे, असेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, प्रदेश महासचिव अमीतभाई भुईगळ, प्रा. अंजली आंबेडकर, आ. बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, यू.जी. बोराळे, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, संध्या वाघोडे, रवींद्र दारोकार गुुरुजी यांनीही विचार मांडले. भन्ते बी. संघपाल यांनी सामूहिक त्रिशरण -पंचशील दिल्यानंतर सुरू झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव खंडारे, संचालन राजाभाऊ लबडे गुरुजी यांनी, तर आभारप्रदर्शन श्रावण ठोसर यांनी केले.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर