शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

चांगली वसुली असलेल्या भागांमध्ये महावितरण बदलणार ६00 रोहित्रे

By admin | Updated: November 22, 2014 23:36 IST

कृषी पंपांना मिळणार वीज, सिंचनाचा प्रश्न सुटणार!

अकोला: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)ने, कृषी पंपांची वीज देयक वसुली चांगली असलेल्या भागांमधील ६00 रोहित्रे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कृषी पंपांना सुरळीत वीज पुरवठा होऊन, सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. राज्यात अतिभारामुळे जळालेल्या, किंवा बंद पडलेल्या रोहित्रांची संख्या बरीच आहे. परिणामी कृषी पंपधारक शेतकर्‍यांची स्थिती, सिंचनासाठी पाणी आहे, पण वीज नाही, अशी झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन, महावितरणने राज्यात ६00 रोहित्र बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नियमित वीज देयक अदा करणार्‍या शेतकर्‍यांचा निकष लावण्यात येणार आहे. रोहित्रे बदलण्यासाठी महावितरणने तातडीने ६00 वितरण रोहित्रे राज्यातील क्षेत्रीय कार्यालयांकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या रोहित्रावरील कृषी पंपधारक देयके नियमित भरतात, अशीच रोहित्रे बदलण्यासाठी नव्या रोहित्रांचा वापर करावा, अशी सूचना मुख्य कार्यालयाच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आली आहे. सोबतच कृषी पंपांची रोहित्रे जळण्याचे प्रकार नियंत्रणात आणण्याकरिता, महावितरणने रोज मुख्यालयातूनच झाडाझडती घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुळात रोहित्र अतिभारीत असल्याशिवाय जळत नाहीत. *वीज व शेतकर्‍यांमध्ये रोहित्र अडसर सिंचनाची सोय असलेल्या भागात पाण्याचा पुरेसा साठा आहे. महावितरणकडे मुबलक वीजही आहे; मात्र रोहीत्र जळण्याच्या व चोरी जाण्याच्या घटना गत काही दिवसांपासून घडत आहेत. त्यामुळे वीज व पाणी असल्यावरही केवळ रोहित्रांच्या बिघाडामुळे शेतकरी सिंचन करू शकत नाहीत.