शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

चांगली वसुली असलेल्या भागांमध्ये महावितरण बदलणार ६00 रोहित्रे

By admin | Updated: November 22, 2014 23:36 IST

कृषी पंपांना मिळणार वीज, सिंचनाचा प्रश्न सुटणार!

अकोला: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)ने, कृषी पंपांची वीज देयक वसुली चांगली असलेल्या भागांमधील ६00 रोहित्रे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कृषी पंपांना सुरळीत वीज पुरवठा होऊन, सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. राज्यात अतिभारामुळे जळालेल्या, किंवा बंद पडलेल्या रोहित्रांची संख्या बरीच आहे. परिणामी कृषी पंपधारक शेतकर्‍यांची स्थिती, सिंचनासाठी पाणी आहे, पण वीज नाही, अशी झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन, महावितरणने राज्यात ६00 रोहित्र बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नियमित वीज देयक अदा करणार्‍या शेतकर्‍यांचा निकष लावण्यात येणार आहे. रोहित्रे बदलण्यासाठी महावितरणने तातडीने ६00 वितरण रोहित्रे राज्यातील क्षेत्रीय कार्यालयांकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या रोहित्रावरील कृषी पंपधारक देयके नियमित भरतात, अशीच रोहित्रे बदलण्यासाठी नव्या रोहित्रांचा वापर करावा, अशी सूचना मुख्य कार्यालयाच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आली आहे. सोबतच कृषी पंपांची रोहित्रे जळण्याचे प्रकार नियंत्रणात आणण्याकरिता, महावितरणने रोज मुख्यालयातूनच झाडाझडती घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुळात रोहित्र अतिभारीत असल्याशिवाय जळत नाहीत. *वीज व शेतकर्‍यांमध्ये रोहित्र अडसर सिंचनाची सोय असलेल्या भागात पाण्याचा पुरेसा साठा आहे. महावितरणकडे मुबलक वीजही आहे; मात्र रोहीत्र जळण्याच्या व चोरी जाण्याच्या घटना गत काही दिवसांपासून घडत आहेत. त्यामुळे वीज व पाणी असल्यावरही केवळ रोहित्रांच्या बिघाडामुळे शेतकरी सिंचन करू शकत नाहीत.