शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

चांगली वसुली असलेल्या भागांमध्ये महावितरण बदलणार ६00 रोहित्रे

By admin | Updated: November 22, 2014 23:36 IST

कृषी पंपांना मिळणार वीज, सिंचनाचा प्रश्न सुटणार!

अकोला: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)ने, कृषी पंपांची वीज देयक वसुली चांगली असलेल्या भागांमधील ६00 रोहित्रे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कृषी पंपांना सुरळीत वीज पुरवठा होऊन, सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. राज्यात अतिभारामुळे जळालेल्या, किंवा बंद पडलेल्या रोहित्रांची संख्या बरीच आहे. परिणामी कृषी पंपधारक शेतकर्‍यांची स्थिती, सिंचनासाठी पाणी आहे, पण वीज नाही, अशी झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन, महावितरणने राज्यात ६00 रोहित्र बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नियमित वीज देयक अदा करणार्‍या शेतकर्‍यांचा निकष लावण्यात येणार आहे. रोहित्रे बदलण्यासाठी महावितरणने तातडीने ६00 वितरण रोहित्रे राज्यातील क्षेत्रीय कार्यालयांकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या रोहित्रावरील कृषी पंपधारक देयके नियमित भरतात, अशीच रोहित्रे बदलण्यासाठी नव्या रोहित्रांचा वापर करावा, अशी सूचना मुख्य कार्यालयाच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आली आहे. सोबतच कृषी पंपांची रोहित्रे जळण्याचे प्रकार नियंत्रणात आणण्याकरिता, महावितरणने रोज मुख्यालयातूनच झाडाझडती घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुळात रोहित्र अतिभारीत असल्याशिवाय जळत नाहीत. *वीज व शेतकर्‍यांमध्ये रोहित्र अडसर सिंचनाची सोय असलेल्या भागात पाण्याचा पुरेसा साठा आहे. महावितरणकडे मुबलक वीजही आहे; मात्र रोहीत्र जळण्याच्या व चोरी जाण्याच्या घटना गत काही दिवसांपासून घडत आहेत. त्यामुळे वीज व पाणी असल्यावरही केवळ रोहित्रांच्या बिघाडामुळे शेतकरी सिंचन करू शकत नाहीत.