शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : आज फैसला; मैदानात कोण राहणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 10:56 IST

मैदानात कोण कायम राहणार, याचा निर्णय सोमवार, ७ सप्टेंबर रोजी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल झाल्यानंतर जवळपास प्रत्येक मतदारसंघात बंडखोरांनी पक्षाच्या उमेदवारांसह प्रतिस्पर्धी पक्षाच्या उमेदवारांनाही कोंडीत पकडले आहे. या सर्व बंडोबांना थंडोबा करण्यासाठी विविध कसरती सुरू आहेत. तर कुणाला पक्षशिस्तीचा बडगाही दाखविला जात आहे. दुसरीकडे विविध समाजाच्या बैठका वेगाने सुरू असून, समाजातील दोन उमेदवारांपैकी एकाने माघार घेण्याबाबत दबावही टाकला जात आहे. या पृष्ठभूमीवर मैदानात कोण कायम राहणार, याचा निर्णय सोमवार, ७ सप्टेंबर रोजी होत आहे. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत कोणते बंडोबा थंडोबा झाले, हे स्पष्ट होईलच.अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेस नेते मदन भरगड यांनी ‘वंचित’ची उमेदवारी घेतल्यामुळे त्यांची उमेदवारी कायम राहीलच. भाजपाचे सदस्य डॉ. अशोक ओळंबे यांचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज वैध ठरला आहे. त्यांना भाजपाने पक्षातून निलंबित केले आहे. भाजपमध्ये ओळंबे हे पालकमंत्री गटाचे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची उमेदवारी पालकमंत्र्यांच्या निर्देशावरून मागे घेतली जाते का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. बाळापूर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण गव्हाणकर व भारिपचे गजानन दांदळे यांच्या उमेदवारीबाबत रविवारी समाजाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णयावर या दोन्ही उमेदवारांच्या लढतीची तीव्रता ठरणार आहे. अशीच स्थिती बळीराम सिरस्कार व डॉ. संतोष हुशे यांची आहे. अकोला पूर्व या मतदारसंघातून ‘वंचित’चे नेते व माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे हे रिंगणात कायम राहिले तर येथे आजी आमदाराला दोन माजी आमदारांचे आव्हान ठरेल. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपचे बंडखोर राजकुमार नाचणे यांनी प्रहार जनशक्ती संघटनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविली आहे. त्यामुळे ते कायम राहण्याचे संकेत आहेत. ‘वंचित’चे बंडखोर सम्राट डोंगरे, अकोटमधील सेनेचे बंडखोर अनिल गावंडे यांच्याही उमेदवारीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. या सर्व बंडोबांना रोखण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न होत आहेत. सोमवारी दुपारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत यामधील काही बंडोबा थंड झाले, तर संभाव्य मत विभाजन टळेल, अन्यथा सर्वच मतदारसंघांत चुरशीच्या लढती आणखी तीव्र चुरसमध्ये बदलतील.

१४२ उमेदवारी अर्ज वैधजिल्ह्यातील पाच मतदारसंघांमध्ये छाननीअंती १०१ उमेदवारांचे १४२ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, ७ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या लढतीचे चित्र सोमवारी दुपारनंतर निश्चित होणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण