शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Maharashtra Election 2019 : आज फैसला; मैदानात कोण राहणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 10:56 IST

मैदानात कोण कायम राहणार, याचा निर्णय सोमवार, ७ सप्टेंबर रोजी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल झाल्यानंतर जवळपास प्रत्येक मतदारसंघात बंडखोरांनी पक्षाच्या उमेदवारांसह प्रतिस्पर्धी पक्षाच्या उमेदवारांनाही कोंडीत पकडले आहे. या सर्व बंडोबांना थंडोबा करण्यासाठी विविध कसरती सुरू आहेत. तर कुणाला पक्षशिस्तीचा बडगाही दाखविला जात आहे. दुसरीकडे विविध समाजाच्या बैठका वेगाने सुरू असून, समाजातील दोन उमेदवारांपैकी एकाने माघार घेण्याबाबत दबावही टाकला जात आहे. या पृष्ठभूमीवर मैदानात कोण कायम राहणार, याचा निर्णय सोमवार, ७ सप्टेंबर रोजी होत आहे. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत कोणते बंडोबा थंडोबा झाले, हे स्पष्ट होईलच.अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेस नेते मदन भरगड यांनी ‘वंचित’ची उमेदवारी घेतल्यामुळे त्यांची उमेदवारी कायम राहीलच. भाजपाचे सदस्य डॉ. अशोक ओळंबे यांचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज वैध ठरला आहे. त्यांना भाजपाने पक्षातून निलंबित केले आहे. भाजपमध्ये ओळंबे हे पालकमंत्री गटाचे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची उमेदवारी पालकमंत्र्यांच्या निर्देशावरून मागे घेतली जाते का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. बाळापूर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण गव्हाणकर व भारिपचे गजानन दांदळे यांच्या उमेदवारीबाबत रविवारी समाजाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णयावर या दोन्ही उमेदवारांच्या लढतीची तीव्रता ठरणार आहे. अशीच स्थिती बळीराम सिरस्कार व डॉ. संतोष हुशे यांची आहे. अकोला पूर्व या मतदारसंघातून ‘वंचित’चे नेते व माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे हे रिंगणात कायम राहिले तर येथे आजी आमदाराला दोन माजी आमदारांचे आव्हान ठरेल. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपचे बंडखोर राजकुमार नाचणे यांनी प्रहार जनशक्ती संघटनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविली आहे. त्यामुळे ते कायम राहण्याचे संकेत आहेत. ‘वंचित’चे बंडखोर सम्राट डोंगरे, अकोटमधील सेनेचे बंडखोर अनिल गावंडे यांच्याही उमेदवारीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. या सर्व बंडोबांना रोखण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न होत आहेत. सोमवारी दुपारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत यामधील काही बंडोबा थंड झाले, तर संभाव्य मत विभाजन टळेल, अन्यथा सर्वच मतदारसंघांत चुरशीच्या लढती आणखी तीव्र चुरसमध्ये बदलतील.

१४२ उमेदवारी अर्ज वैधजिल्ह्यातील पाच मतदारसंघांमध्ये छाननीअंती १०१ उमेदवारांचे १४२ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, ७ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या लढतीचे चित्र सोमवारी दुपारनंतर निश्चित होणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण