शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

महाजनादेश यात्रेतून मांडणार सरकारचा लेखाजोखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 13:55 IST

अकोला : गत पाच वर्षांत राज्यात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा लोकांसमोर मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली असून, मंगळवार, ६ आॅगस्ट रोजी महाजनादेश यात्रा अकोल्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत पाच वर्षांत राज्यात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा लोकांसमोर मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली असून, मंगळवार, ६ आॅगस्ट रोजी महाजनादेश यात्रा अकोल्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. ६ आॅगस्ट रोजी महाजनादेश यात्रा अकोल्यात पोहोचणार असून, सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. अकोल्यातील मुक्कामानंतर बुधवारी सकाळी ११ वाजता बाळापूर येथे मुख्यमंत्र्यांसह महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यात येणार असल्याचे डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. राज्याला कायम दुष्काळमुक्त करण्यासाठी जनादेश मागण्याकरिता मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा येत आहे, असेही डॉ. रणजित पाटील यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड व माजी आमदार नारायणराव गव्हाणकर उपस्थित होते.

अकोला पोलीस आयुक्तालय निर्मितीला प्राधान्य!पिंप्री चिंचवड, मीरा भार्इंदर येथे पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाली असून, आता अकोला आणि कोल्हापूर येथे पोलीस आयुक्तालय निर्मितीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. गत पाच वर्षांत जिल्ह्यातील विविध विकास कामांची माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील