शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

हरभरा बियाण्यांच्या लाभार्थी याद्या महाबीजने दडवल्या

By admin | Updated: January 10, 2017 02:31 IST

याद्या न मिळाल्यास शासनाचे अनुदान रोखले जाण्याचा इशारा कृषी विभाग देणार आहे.

अकोला, दि. ९- शासनाच्या अनुदानित हरभरा बियाणे वाटप केलेल्या लाभार्थीच्या महाबीजने प्रमाणित केलेल्या याद्या जिल्हा व्यवस्थापकांनी १३ दिवसानंतरही दिलेल्या नाहीत. त्यामुळे गावपातळीवर चौकशीमध्ये खोळंबा निर्माण झाला आहे. चौकशी पथकांना याद्या न मिळाल्यास शासनाचे अनुदान रोखले जाईल, असा इशारा आता जिल्हा व्यवस्थापकांसोबतच व्यवस्थापकीय संचालकांना स्मरणपत्रातून शासनाचा कृषी विभाग देणार आहे. रब्बी हंगामात हरभरा पिकाचे क्षेत्र वाढवण्यासाठी शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बियाणे अनुदानावर देण्यात आले. प्रति किलोमागे २५ ते ३0 रुपये अनुदान ठरले. त्यानुसार महाबीजला बियाणे पुरवठय़ाचे आदेश देण्यात आले. महाबीजने २४ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरदरम्यान वाटप केलेल्या बियाण्यांचा हिशेबच वितरक, केंद्र संचालकांकडून घेतला नाही. त्याचवेळी वितरकांनी लाभार्थींना कशा पद्धतीने बियाणे वाटप केले, याचा जाबही विचारला नाही. दरम्यान, दीपक कृषी सेवा केंद्राची डिलरशिप रद्द करण्यात आली. ही कारवाई थातूर-मातूरच आहे. त्यातून काय साधले, याबाबतही फारसे पदरात पडलेले नाही. या काळात महाबीजचे डिलर, त्यांनी वाटप केलेले कृषी सेवा केंद्र यांच्याकडून ज्यांना बियाणे वाटप केले, त्या शेतकर्‍यांच्या याद्या महाबीजकडे आधीपासूनच असणे आवश्यक होते. आता विभागीय कृषी सहसंचालकांच्या आदेशानुसार गावपातळीवर जाऊन शेतकर्‍यांना बियाणे वाटपाची चौकशी होणार आहे. त्यासाठी बियाणे वितरक, कृषी केंद्र संचालकांकडून प्राप्त केलेल्या व महाबीजने प्रमाणित केलेल्या याद्या अद्यापही तालुका कृषी अधिकार्‍यांना देण्यात आलेल्या नाहीत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने २७ डिसेंबर रोजी महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक बोबडे यांना पत्र देऊन याद्या मागविल्या आहेत. तेरा दिवसांचा कालावधी उलटला तरीही त्या शासनाच्या कृषी विभागाला देण्यात आलेल्या नाहीत. हा प्रकार म्हणजे, शासनाचे अनुदान देणार्‍या यंत्रणेलाच झुलवत ठेवण्यासारखा आहे. महाबीजच्या एमडींना देणार स्मरणपत्रहरभरा बियाणे घोटाळ्य़ात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानेही काही वितरक, कृषी केंद्रावर कारवाई केली. त्यांनी बियाणे वाटप केलेल्या लाभार्थी शेतकर्‍यांची यादी महाबीजकडे नाही, असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे; मात्र चौकशीसाठी कृषी विभागाच्या पथकाकडे देण्यास जिल्हा व्यवस्थापक बोबडे यांनी टाळाटाळ केल्याचे स्पष्ट होत आहे. आता महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकांनाच थेट स्मरणपत्र देण्याची तयारी अधीक्षक कृषी अधिकार्‍यांनी केली आहे. त्यामध्ये तातडीने याद्या न दिल्यास शासनाचे अनुदान दिले जाणार नाही, असा इशाराही दिला जाणार आहे.