शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

महाबीजला ७० कोटींचा नफा,  देशातील सर्वच बियाणे महामंडळाला टाकले मागे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 10:17 IST

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) बियाण्यात सदोषता आढळत असल्याचा काही शेतक-यांनी आरोप केला आहे

राजरत्न सिरसाट

अकोला, दि. 20 : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) बियाण्यात सदोषता आढळत असल्याचा काही शेतक-यांनी आरोप केला आहे. परंतु हे महामंडळ राज्यातील शेतक-यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आल्यानेच महामंडळाची उत्तरोतर प्रगती होत असल्याचे महाबीजच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. महाबीजच्या विश्वासार्हतेमुळे संस्था नफ्यात असून, गतवर्षीसुध्दा ७० कोटी रुपये नफा झाला आहे. यावर्षीही ७२५ कोटी ३५ लाख रुपयांचा बियाणे विक्रीचा व्यवसाय केला आहे. देशातील सर्वच बियाणे महामंडळाला याबाबतीत महाबीजने मागे टाकले आहे. आता महाबीजची तुलना राष्ट्रीय बियाणे महामंडळासोबत केली जात आहे. शासनाच्या निर्देशानुसार अनुदानावर बियाणे वाटप करणाºया महाबीजने शेतकºयांना दिलासा दिला आहे. खासगी कंपन्यांच्या बियाणे दराच्या स्पर्धेत शेतकºयांना दिलासा देण्यासाठी नवे बियाणे संशोधन केले आहे.राज्यातील शेतकºयांना दर्जेदार व किफायतशीर बियाणे उपलब्ध होण्यासाठी २८ एप्रिल १९७६ रोजी महाबीजची स्थापना करण्यात आली आहे. खासगी कंपन्यांच्या वाढीव बियाणे दरावर यामुळे काही प्रमाणात अंकुश लागला आहे. राज्यातील शेतकºयांच्या गरजेनुसार हवामानातील बदलाला पुरक उच्च दर्जाचे संकरित व सुधारित संशोधित वाण विकसित करू न दिले आहे. याच उद्देशाने १९९२ मध्ये महामंडळाने संशोधन व विकास विभागाची स्थापना केली आहे. आतापर्यंत संकरित ज्वारी, सूर्यफूल, कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद व भाजीपाला या पिकांच्या संशोधनास प्राधान्य दिले असून, शेतकºयांना हे बियाणे उपलब्ध करू न दिले आहे. यामध्ये संकरित ज्वारी महाबीज -७, मूग- उत्कर्षा, संकरित बाजरी महाबीज - १००५, संकरित मका उदय हे वाण भारत सरकारने अधिसुचित केले आहेत. तसेच संकरित कपाशी वाणामध्ये बी.टी. जनूक टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. संकरित कपाशी पीकेव्ही हाय-२, बीजी-२ व एनएचएच-४४, बीजी-२ या वाणांना कृषी विभाग व भारत सरकारने मराठवाडा विभागाकरिता कोरडवाहू लागवडीस नुकतीच मान्यता दिली आहे. यातील पीकेव्ही हाय-२ व वरील इतर वाणांची संपूर्ण राज्यात लागवड करण्याकरिता कृषी विभाग व भारत सरकारकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.महाबीजने आंतरराष्टÑीय पीक उष्ण कटिबंधीय पीक संशोधन संस्थेसोबत (आयसीआरआयएसएटी) करार करू न ज्वारी, बाजरी या पिकांमध्ये नवीन संशोधित वाण निर्मितीचे काम सुरू आहे. मक्याचे उत्कृष्ट संकरित वाण देण्यासाठी महाबीजने आंतरराष्टÑीय मका आणि गहू विकास केंद्र हैदराबाद (सीआयएमएमवायटी) या संस्थेसोबत करार केला आहे. वाण निर्मितीचे काम येथे प्रगतीपथावर आहे. खासगी कंपन्यांसोबत सुद्धा याबाबतचे करार करण्यात आले आहेत.- उती संवर्धन दोन लाख केळी रोपांचे लक्ष्यांकसध्या जैवतंत्रज्ञानाचे युग असल्याने महाबीजने यावर भर दिला असून, राज्यातील शेतकºयांना फळवर्गीय पिकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विकसित उती संवर्धित केळी ग्रॅडनैन रोपांची निर्मिती केली आहे. ही रोपे २००३ पासून महाबीजकडे उपलब्ध आहेत. याकरिता विदर्भ वैधानिक विकास महामंडळाने अनुदान दिले आहे.भारत सरकारनेही प्रयोगशाळा बळकटीकरणासाठी निधी दिला आहे. यावर्षी या माध्यमातून १.५ ते २ लाख केळी रोपे उत्पादनाचे लक्ष्यांक आहे. त्यासाठीचे वितरण सुरू करण्यात आले आहे. भुसावळ येथे १० लाख रोपे उत्पादन क्षमता असलेली प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे. किफायतशीर दरात विषाणूरहीत रोपे पुरविण्याचे हे नियोजन आहे. तसेच २२ प्रकारच्या वृक्षाच्या प्रजातीचे रोपे या तंत्रज्ञानाद्वारे निर्मित करण्यात येत आहेत.

-गुणवत्ता कक्ष विभाग - बियाणे कायदा १९६६ नुसार बियाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी महामंडळाच्या अकोला व परभणी, श्रीरामपूर व जालना येथे अद्ययावत गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. २०१२ पासून बीज प्रामाणिकरण यंत्रणेने प्रमाणित केलेल्या संपूर्ण पायाभूत व प्रमाणित लॉटच्या सोयाबीन बियाण्यांची क्षेत्रीय उगवण चाचणी सुरू केली आहे. चाचणीमध्ये पात्र झालेले बियाणेच बीजोत्पादन व विपणनाकरिता उपलब्ध करू न देण्यात आले आहे.

- एक हजार क्ंिवटल बियाणे वापरले नाही!खरीप २०१७ च्या या हंगामात बीज प्रामाणिकरणामध्ये पात्र असूनही महाबीजच्या क्षेत्रीय चाचणीत अपात्र ठरलेले जवळपास एक हजार क्ंिवटल सोयबीन बियाणे बीजोत्पादन व विपणनाकरिता वापरली नाहीत.

राज्यात लागणा-या एकूण बियाण्यांपैकी महाबीजचे ४० टक्के बियाण्यांनाचा विक्रीत हिस्सा आहे. त्या अनुषंगाने लागणाºया बियाण्यांचा आढावा घेण्यात आला आहे. कृषी आयुक्तालय व महाबीजच्या संयुक्त सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. तो दरवर्षी घेण्यात येत असून, यावर्षी पुढील तीन वर्षात लागणाºया १२५ टक्के एवढा विविध पीक वाणाचा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येतो.

- महाबीज बियाण्यांचे वितरणमहाबीजच्या बियाण्यांची २०१२ मध्ये ६ लाख ९ हजार ६०३ क्ंिवटल विक्री झाली होती, २०१३ मध्ये ७ लाख ३३ हजार ५०० क्ंिवटल, २०१४ मध्ये २ लाख ५५ हजार ९२९ क्ंिवटल, २०१५ मध्ये ४ लाख ७४ हजार ५८७ क्ंिवटल, तर २०१६ मध्ये ५ लाख १५ हजार १९२ क्ंिवटल बियाण्यांची विक्री झाली आहे.

- महाबीजची वार्षिक उलाढाल!महाबाजची वार्षिक उलाढाल पावसावर अवलंबून असून, मागील पाच वर्षांतील आकडेवारीकडे बघितल्यास २०१२-१३ मध्ये ५१३.१३ कोटी वार्षिक उलाढाल झाली होती. तसेच २०१३-१४ मध्ये ५३२.५१ कोटी, २०१४-१५ ची उलाढाल ३४१.५० कोटी, २०१५-१६ मध्ये ४७२.१४ कोटी रुपये, २०१६-१७ मध्ये ६४४.६६ कोटी, तर चालू २०१७-१८ यावर्षी ७२५.३५ कोटी रुपयांची बियाणे विक्रीची उलढाल झाली आहे. प्रत्येकवर्षी महाबीजला नफा झाला आहे. मागील वर्षी हा नफा ७० कोटी एवढा होता.

- राजकीय हस्तक्षेप नाही!महाबीजचे कामकाज प्रशासकीय स्तरावर चालत असून, कृषीचे प्रधान सचिव महाबीजचे अध्यक्ष आहेत. सचिव कृषी आयुक्त, तर व्यवस्थापकीय संचालक म्हणून भारतीय प्रशासन सेवेतील सनदी अधिकारी (आयएएस) काम पाहतात. महामंडळाच्या कामकाजात थेट राजकीय हस्तक्षेप नसलेले देशातील हे पहिले महामंडळ आहे. संस्थेचे संपूर्ण राज्यात शेतकरी सभासद आहेत. नफ्यातूनच विकास करावा लागत असल्याने संस्थेवर सर्वांना बारकाईने नजर ठेवावी लागते, हे विशेष .- महाबीजची स्थापनाच राज्यातील शेतकºयांचे हित डोळ््यासमोर ठेवून करण्यात आली आहे. किफायतशीर व दर्जेदार बियाणे उपलब्ध करू न देण्याची जबाबदारी आमची आहे. म्हणूनच शेतकºयांचा विश्वास प्राप्त केला आहे. २०१६-१७ मध्ये ७० कोटींवर नफा मिळाला आहे. शेतकºयांना विविध पिकांचे भरघोस उत्पादन देणाºया वाणांची निर्मिती केली आहे.ओमप्रकाश देशमुख,व्यवस्थापकीय संचालक,महाबीज, अकोला.