शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

व-हाडातील धरणांमध्ये अल्प जलसाठा!

By admin | Updated: November 8, 2014 23:25 IST

सिंचनाला पाणी मिळणे कठीणच.

अकोला: वर्‍हाडातील बहुतांश धरणांमध्ये यावर्षी अल्प जलसाठा असून, ५0 टक्कय़ांच्या आत जलसाठा असलेल्या धरणांमधील पाणी यावर्षी सिंचनासाठी सोडण्यात येणार नसल्याचे वृत्त असल्याने, यावर्षी रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.वर्‍हाडातील अमरावती वगळता अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या उर्वरित चार जिल्हय़ांमध्ये यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, चारही जिल्हय़ांमधील धरणांच्या पातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. त्यातही अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांमध्ये तर फार कमी पाऊस झाला. त्यामुळे यावर्षी सर्वप्रथम पिण्याच्या पाण्यास प्राधान्य दिल्या जाणार आहे. अकोला जिल्हय़ातील मोठय़ा, मध्यम व इतर लघू प्रकल्पांची सिंचन क्षमता ३१ हजार हेक्टर एवढी आहे. काटेपूर्णा या मोठय़ा धरणांतर्गत जिल्हय़ातील सर्वाधिक ८,३२५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे; परंतु या धरणात आजमितीस केवळ ३६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या जिल्हय़ात जलसंपदा विभागाने यंदा केवळ तीन हजार हेक्टरचे नियोजन केले आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा या मोठय़ा धरणात ५८ टक्के जलसाठा आहे. त्या धरणातील पाणी सिंचनासाठी द्यायचे की नाही, हा निर्णय जिल्हा प्रशासन घेणार आहे. वाशिम जिल्हय़ातील प्रकल्प छोटे आहेत. त्या जिल्ह्यातील धरणांमध्ये ५0 टक्क्यांपेक्षा थोडा अधिक जलसाठा असला तरी, छोट्या धरणांमधील पाणी अग्रक्रमाने पिण्यासाठी राखून ठेवल्या जाणार आहे. पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य असल्याने, धरणांमधील साठा व जिल्हय़ातील पिण्याच्या पाण्याचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासन निर्णय घेईल, असे पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता रा. वि. जलतार यांनी स्पष्ट केले. * मंगळवारी ठरणार पाण्याचे आरक्षण अकोला जिल्हय़ातील धरणांच्या जलपातळीचा आढावा व आरक्षणासंदर्भात, ११नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली आहे. त्या सभेत शिल्लक जलसाठय़ाचा आढावा घेऊन, सिंचनाचा निर्णय घेतला जाणार आहे.