शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

व-हाडातील धरणांमध्ये अल्प जलसाठा!

By admin | Updated: November 8, 2014 23:25 IST

सिंचनाला पाणी मिळणे कठीणच.

अकोला: वर्‍हाडातील बहुतांश धरणांमध्ये यावर्षी अल्प जलसाठा असून, ५0 टक्कय़ांच्या आत जलसाठा असलेल्या धरणांमधील पाणी यावर्षी सिंचनासाठी सोडण्यात येणार नसल्याचे वृत्त असल्याने, यावर्षी रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.वर्‍हाडातील अमरावती वगळता अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या उर्वरित चार जिल्हय़ांमध्ये यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, चारही जिल्हय़ांमधील धरणांच्या पातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. त्यातही अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांमध्ये तर फार कमी पाऊस झाला. त्यामुळे यावर्षी सर्वप्रथम पिण्याच्या पाण्यास प्राधान्य दिल्या जाणार आहे. अकोला जिल्हय़ातील मोठय़ा, मध्यम व इतर लघू प्रकल्पांची सिंचन क्षमता ३१ हजार हेक्टर एवढी आहे. काटेपूर्णा या मोठय़ा धरणांतर्गत जिल्हय़ातील सर्वाधिक ८,३२५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे; परंतु या धरणात आजमितीस केवळ ३६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या जिल्हय़ात जलसंपदा विभागाने यंदा केवळ तीन हजार हेक्टरचे नियोजन केले आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा या मोठय़ा धरणात ५८ टक्के जलसाठा आहे. त्या धरणातील पाणी सिंचनासाठी द्यायचे की नाही, हा निर्णय जिल्हा प्रशासन घेणार आहे. वाशिम जिल्हय़ातील प्रकल्प छोटे आहेत. त्या जिल्ह्यातील धरणांमध्ये ५0 टक्क्यांपेक्षा थोडा अधिक जलसाठा असला तरी, छोट्या धरणांमधील पाणी अग्रक्रमाने पिण्यासाठी राखून ठेवल्या जाणार आहे. पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य असल्याने, धरणांमधील साठा व जिल्हय़ातील पिण्याच्या पाण्याचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासन निर्णय घेईल, असे पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता रा. वि. जलतार यांनी स्पष्ट केले. * मंगळवारी ठरणार पाण्याचे आरक्षण अकोला जिल्हय़ातील धरणांच्या जलपातळीचा आढावा व आरक्षणासंदर्भात, ११नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली आहे. त्या सभेत शिल्लक जलसाठय़ाचा आढावा घेऊन, सिंचनाचा निर्णय घेतला जाणार आहे.