शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कमळ पक्ष्यांना आसरा मिळेना: गोड्या पाण्याचे जलसाठे संपण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 18:01 IST

महाराष्ट्रातील गोड्या पाण्याचे तलाव यांचा आवडीचा अधिवास आहे; मात्र आता तलावच कोरडे पडल्याने अशा तलावांच्या आसºयाने राहणारे मनमोहक पाणपक्षीदेखील संकटात सापडले आहे.

- राजेश शेगोकार

अकोला: मान्सूनच्या लहरी पणाचा मानवासोबतच पशुपक्ष्यांनाही फटका बसला आहे. पावसाने दिलेला खंड व खालावलेली जलपातळी यामुळे अनेक गाव तलाव कोरडे पडले असून, काही तलावच गाळामुळे नामशेष होत आहेत. त्यामुळे गोड्या पाण्याच्या काठी अधिवास कारणाºया पाण मयूर हे पक्षी सध्या आसºयासाठी कासावीस होत असल्याचे चित्र आहे. पाणपिपुली, पीयू, पीयूष, जलमयूर, पाणमयूर किंवा कमळपक्षी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाºया या सुंदर पक्ष्याचे जलीय परिसंस्थेशी अतूट नाते आहे. महाराष्ट्रातील गोड्या पाण्याचे तलाव यांचा आवडीचा अधिवास आहे; मात्र आता तलावच कोरडे पडल्याने अशा तलावांच्या आसºयाने राहणारे मनमोहक पाणपक्षीदेखील संकटात सापडले आहे.मालगुजारी तलाव व इंग्रजांच्या दूरदृष्टीमुळे अनेक शहरे व गावालगत तलावाची निर्मिती केली. अनेक परदेशी स्थलांतरित पक्ष्यांसह स्वदेशी पक्ष्यांचेदेखील हे तलाव माहेरघर बनले. आता मात्र लोकसंख्या वाढीच्या भस्मासुराने व वाढत्या शहरीकरणामुळे तलावाच्या सौंदर्याला घरघर लागली. अमरावती जिल्ह्यातील छत्री, वडाळी तलाव, नागपूर जिल्ह्यातील फुटाळा, सोनेगाव, अंबाझरी तर वाशिम जिल्ह्यातील ऋषी तलाव हे उत्तम उदाहरण आहेत. अमरावती शहरालगतचा छत्री व वडाळी तलाव पूर्वी लाल व पांढºयाशुभ्र कमळ फुलांनी बहरून जायचा. येथील शेकडो कमळ पक्ष्यांसाठी नंदनवन म्हणून हा तलाव ओळखला जायचा. छत्री तलाव येथे झालेल्या विकासाकामुळे येथील कमळ पक्ष्यांची संख्या नाहीशी झाली आहे. विशेष म्हणजे जिथे पाणी आहे त्या तलावांमधील कमळ व इतर पाणपुष्प वनस्पतींचा नाश होत आहे. त्यांची जागा आता जलपर्णीसारख्या इतर विषारी प्रदूषणसूचक वनस्पतीने घेतली आहे. त्यामुळे जलप्रदूषणाने गुदमरत असलेल्या इतर जलाशयात कमळ पक्ष्यांचे दर्शन आता दुर्मीळ झाले आहे. कमळ पक्ष्यांच्या वसाहती मानवी अतिक्रमणामुळे धोक्यात आल्या आहेत. अनेक तलावातील कमळ नष्ट झाल्याने कमळ पक्ष्यांची संख्या प्रचंड घटली आहे. म्हणून स्थानिक तलावातील विकासकामे कमळपुष्प आणि कमळ पक्ष्यांच्या जीवावर बेतणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पुन्हा नव्याने तलावातील गाळ काढून, प्रदूषण कमी करून नैसर्गिकरीत्या कमळ वनस्पती वाढवली तर कमळ पक्ष्यांना अधिवास मिळेल.-@ यादव तरटे पाटीलवन्यजीव अभ्यासक,

 

टॅग्स :AkolaअकोलाNatureनिसर्ग