शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

कमळ पक्ष्यांना आसरा मिळेना: गोड्या पाण्याचे जलसाठे संपण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 18:01 IST

महाराष्ट्रातील गोड्या पाण्याचे तलाव यांचा आवडीचा अधिवास आहे; मात्र आता तलावच कोरडे पडल्याने अशा तलावांच्या आसºयाने राहणारे मनमोहक पाणपक्षीदेखील संकटात सापडले आहे.

- राजेश शेगोकार

अकोला: मान्सूनच्या लहरी पणाचा मानवासोबतच पशुपक्ष्यांनाही फटका बसला आहे. पावसाने दिलेला खंड व खालावलेली जलपातळी यामुळे अनेक गाव तलाव कोरडे पडले असून, काही तलावच गाळामुळे नामशेष होत आहेत. त्यामुळे गोड्या पाण्याच्या काठी अधिवास कारणाºया पाण मयूर हे पक्षी सध्या आसºयासाठी कासावीस होत असल्याचे चित्र आहे. पाणपिपुली, पीयू, पीयूष, जलमयूर, पाणमयूर किंवा कमळपक्षी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाºया या सुंदर पक्ष्याचे जलीय परिसंस्थेशी अतूट नाते आहे. महाराष्ट्रातील गोड्या पाण्याचे तलाव यांचा आवडीचा अधिवास आहे; मात्र आता तलावच कोरडे पडल्याने अशा तलावांच्या आसºयाने राहणारे मनमोहक पाणपक्षीदेखील संकटात सापडले आहे.मालगुजारी तलाव व इंग्रजांच्या दूरदृष्टीमुळे अनेक शहरे व गावालगत तलावाची निर्मिती केली. अनेक परदेशी स्थलांतरित पक्ष्यांसह स्वदेशी पक्ष्यांचेदेखील हे तलाव माहेरघर बनले. आता मात्र लोकसंख्या वाढीच्या भस्मासुराने व वाढत्या शहरीकरणामुळे तलावाच्या सौंदर्याला घरघर लागली. अमरावती जिल्ह्यातील छत्री, वडाळी तलाव, नागपूर जिल्ह्यातील फुटाळा, सोनेगाव, अंबाझरी तर वाशिम जिल्ह्यातील ऋषी तलाव हे उत्तम उदाहरण आहेत. अमरावती शहरालगतचा छत्री व वडाळी तलाव पूर्वी लाल व पांढºयाशुभ्र कमळ फुलांनी बहरून जायचा. येथील शेकडो कमळ पक्ष्यांसाठी नंदनवन म्हणून हा तलाव ओळखला जायचा. छत्री तलाव येथे झालेल्या विकासाकामुळे येथील कमळ पक्ष्यांची संख्या नाहीशी झाली आहे. विशेष म्हणजे जिथे पाणी आहे त्या तलावांमधील कमळ व इतर पाणपुष्प वनस्पतींचा नाश होत आहे. त्यांची जागा आता जलपर्णीसारख्या इतर विषारी प्रदूषणसूचक वनस्पतीने घेतली आहे. त्यामुळे जलप्रदूषणाने गुदमरत असलेल्या इतर जलाशयात कमळ पक्ष्यांचे दर्शन आता दुर्मीळ झाले आहे. कमळ पक्ष्यांच्या वसाहती मानवी अतिक्रमणामुळे धोक्यात आल्या आहेत. अनेक तलावातील कमळ नष्ट झाल्याने कमळ पक्ष्यांची संख्या प्रचंड घटली आहे. म्हणून स्थानिक तलावातील विकासकामे कमळपुष्प आणि कमळ पक्ष्यांच्या जीवावर बेतणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पुन्हा नव्याने तलावातील गाळ काढून, प्रदूषण कमी करून नैसर्गिकरीत्या कमळ वनस्पती वाढवली तर कमळ पक्ष्यांना अधिवास मिळेल.-@ यादव तरटे पाटीलवन्यजीव अभ्यासक,

 

टॅग्स :AkolaअकोलाNatureनिसर्ग