शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अकोला शहर विभागात विजेची सर्वाधिक वितरण हानी

By atul.jaiswal | Updated: February 10, 2018 17:14 IST

अकोला : राज्यात सर्वत्रच वीज वितरण हानी होत असली, तरी अकोला परिमंडळाअंतर्गत येत असलेल्या अकोला शहर विभागात वीज हानीचे प्रमाण हे सर्वाधिक आहे.

ठळक मुद्देविविध प्रयत्न व उपाययोजना केल्यानंतरही गळती रोखण्यात महावितरणला अपयश.वर्षभरात ३२ टक्क्यांवरची वीज वितरण हानी गेली ३४ टक्क्यांवर.अकोला शहर विभागाची फ्रॅन्चायझी खासगी कंपन्यांना देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

- अतुल जयस्वाल

अकोला : राज्यात सर्वत्रच वीज वितरण हानी होत असली, तरी अकोला परिमंडळाअंतर्गत येत असलेल्या अकोला शहर विभागात वीज हानीचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. संपूर्ण राज्यातील वीज गळतीचे प्रमाणे १४ ते १५ टक्के असताना, अकोला परिमंडळातील अकोला शहर विभागात हे प्रमाण तब्बल ३४.१५ टक्के एवढे आहे. ही हानी व गळती कमी करण्यासाठी सातत्त्याने विविध प्रयत्न व उपाययोजना केल्यानंतरही महावितरणला अपयश आल्याने अखेर अकोला शहर विभाग खासगी कंपनीला चालविण्यासाठी देण्याचा अर्थात ‘फ्रॅन्चायझी’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महावितरणच्या मुख्य कार्यालयाने अकोला शहर विभाग येथे फ्रेंचायजी नियुक्तीसाठी २० फेब्रुवारी २०१८ पर्यंत प्रस्ताव मागविले आहेत.महावितरणने वीज गळती व चोरीचे प्रमाण अधिक असलेल्या ठाणे परिमंडळातील शीळ, मुंब्रा, कळवा हे तीन उपविभाग, नाशिक परिमंडळातील मालेगाव शहरातील तीन उपविभाग व अकोला परिमंडळातील अकोला शहर विभागाची फ्रॅन्चायझी खासगी कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रेंचायजी नियुक्तीसाठी प्रस्ताव मागितलेल्या अकोला शहरविभागामध्ये एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत वितरण हानी ३२.३३ टक्के होती. तर त्यानंतर एप्रिल २०१७ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत ही वितरण हानी वाढून ३४.१५ टक्क्यांवर आली आहे.अकोला शहर विभागातील वीज देयक वसुलीचे प्रमाण कमी असून, वीज देयकांबाबतच्या तक्रारी व वीज चोरीचे प्रमाणही मोठे आहे. वीज गळतीचे प्रमाण रोखण्यात अपयश येत असल्यामुळे फ्रॅन्चायझी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.काय आहे फ्रॅन्चायझी?फ्रॅन्चायझी नेमणे म्हणजे खाजगीकरण नव्हे तर फ्रॅन्चायझी ही महावितरणचे प्रतिनिधी म्हणूनच काम करते. विजेची गळती कमी तसेच वीज बिल वसुली वाढल्यास भाविष्यात भारनियमनाचा प्रश्नच राहणार नाही,परिणामी ग्राहकांना लाभ होईल. यापूर्वी फ्रॅन्चायझी दिलेल्या ठिकाणी वितरण व वाणिज्य हानी घटून ग्राहकांना लाभ झाल्याचे भिवंडी येथील उदाहरण आहे. महावितरण प्रमाणेच फ्रॅन्चायझी मध्ये ग्राहकांचे हक्क अबाधित राहतील.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरmahavitaranमहावितरणAkola Vidhyut Bhavanअकोला विद्युत भवन