अकोला : पावसाळ्याच्या सुरुवातीला धो धो बरसलेल्या पावसाने एक महिना दडी दिली. पावसाने दडी दिल्याने कृषिपंपांचा वाढलेला वापर, हवामानातील बदलामुळे वाढलेल्या उष्णतेमुळे केवळ १५ दिवसांत विजेच्या मागणीत सुमारे ३000 ते ३५00 मे. वॉ. ने वाढ झाली आहे. दुसरीकडे निर्मितीतही घट आली आहे. परिणामी मागणी व पुरवठय़ात तफावत निर्माण झाल्याने अकोला जिल्ह्यासह राज्यात अघोषित भारनियमन सुरू झाले आहे. त्याचा फटका शेतकर्यांना बसला आहे. पावसाअभावी पिके सुकू लागल्याने ओलिताकडे वळलेल्या शेतकर्यांना वीजपुरवठय़ाअभावी पिकांना पाणीही देता येत नसल्याने शेतकरी आणखीच अडचण आला आहे. मागील काही दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे कृषिपंपांचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे १५ दिवसांपूर्वी राज्याची असलेली १३५00 ते १४000 मे. वॉ. विजेची मागणी अचानक वाढून ती १६000 ते १६,५00 मे. वॉ. एवढी झाली आहे. त्यामुळे राज्यात काही तास अघोषित भारनियमन करण्यात येत आहे. परळी येथील सर्व संच पाण्याअभावी बंद आहेत. महानिर्मितीकडून ५५00 मे.वॉ. अपेक्षित असलेली वीज केवळ ३८00 मे. वॉ. पर्यंंंत उपलब्ध होत आहे. तसेच पवन ऊज्रेतूनही १८00 ते २२00 मे. वॉ. अपेक्षित असलेली वीज केवळ १000 मे.वॉ. पर्यंंंत मिळत आहे. तिरोडा येथील अदानी पॉवरचा संच क्रमांक ४ (६६0 मे. वॉ.) आणि अमरावती येथील रतन इंडिया प्रकल्पातून अपेक्षित वीज उपलब्ध झाली नसल्यामुळे राज्यात प्रथमत: सकाळी ९.४५ वाजतापासून भारनियमनमुक्त असलेल्या जी- १, जी- २ आणि जी-३ या गटात भारनियमन करण्यात आले. केंद्रीय ग्रीडमधून वीज घेऊनही फ्रिक्वेन्सीमध्ये तफावत येत असल्याने आज इतरही गटात भारनियमन करण्यात आले. हे भारनियमन आटोक्यात आणण्यासाठी पॉवर एक्स्चेंजमधून १ हजार ते १२00 मे. वॉ. वीज काही तासांसाठी विकत घेण्यात आली. तसेच कोयना येथील २५0 मे.वॉ. चाही संच सुरू झाल्यामुळे विजेची उपलब्धता वाढल्याने सायंकाळपर्यंत सर्वच गटातील भारनियमन यामुळे कमी करण्यात आले.
पावसाची प्रदीर्घ दडी, त्यात विजेचाही लपंडाव!
By admin | Updated: July 15, 2015 01:35 IST