शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

Lok Sabha Election 2019 : मतदारांची नावे गहाळ, ‘ईव्हीएम’ पडल्या बंद, घोळ काही थांबेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 15:07 IST

ईव्हीएम मशीन बंद पडल्यानंतर दोन-दोन तास पर्यायी व्यवस्था करू न शकणारे निवडणूक विभागाचे कामकाज संशयाच्या भोवºयात सापडले आहे.

अकोला: मतदारांची नावे यादीतून गहाळ होणे, जिवंत मतदारांना चक्क मयत दाखविणे, मयत उमेदवाराचे नाव बाद न करता त्यांच्या कुटुंबातील इतर मतदारांचे नाव बाद करणे, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा दुरुस्तीसाठी सादर केलेल्या अर्जाशिवाय असंख्य मतदारांवर ‘डिलिट’चा शिक्का मारून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाने इमानेइतबारे पार पाडले. हा घोळ कमी म्हणून की काय, ईव्हीएम मशीन बंद पडल्यानंतर दोन-दोन तास पर्यायी व्यवस्था करू न शकणारे निवडणूक विभागाचे कामकाज संशयाच्या भोवºयात सापडले आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य मतदारांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागल्याचे चित्र गुरुवारी मतदानाच्या दिवशी दिसून आले.लोकसभेच्या दुसºया टप्प्यात होऊ घातलेल्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया कोणत्याही अडचणींशिवाय पार पडेल, असा आशावाद जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केला होता. ज्या पद्धतीने निवडणूक विभागाने तयारीचा गाजावाजा केला होता, ती पाहता लोकसभा निवडणुकीचा हा उत्सव यशस्वी होईल, अशी अपेक्षा होती. झाले नेमके उलटेच. ऐन मतदानाच्या दिवशी शहरातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील असंख्य मतदारांना निवडणूक विभागाच्या हलगर्जीपणामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असून, अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याचे चित्र समोर आले. ऐन मतदानाच्या दिवशी सर्वत्र उडालेला गोंधळ व घोळ पाहता निवडणूक विभागाचे कामकाज संशयाच्या भोवºयात सापडले आहे.मतदारांच्या मस्तकी ‘डिलिट’चा शिक्कामतदारांनी मतदान केंद्र गाठल्यावर मतदार यादीमध्ये त्यांच्या छायाचित्रावर ‘डिलिट’चा शिक्का मारला असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. मतदार जनजागृती मोहिमेत नवीन मतदारांचा समावेश करणे, मयत मतदारांची नावे बाद करणे तसेच पत्ता बदलण्यासाठी नागरिकांनी अर्ज सादर केल्यावरच ‘बीएलओं’नी दुरुस्त्या करणे क्रमप्राप्त होते. या ठिकाणी मतदारांनी कोणत्याही दुरुस्त्यांचे अर्ज सादर न करताही निवडणूक विभागाने परस्पर घोळ घातल्याचे समोर आले.

पळसो बढे येथील श्रीकृष्ण सिदाजी बढे (८८) मतदान कार्ड, आधार कार्ड घेऊन मतदान केंद्रावर गेले असता, यादीमध्ये ते मयत असल्याचे सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी बढे यांचा मतदानाचा अधिकार नाकारला. हा सर्व प्रकार खा. अ‍ॅड. संजय धोत्रे यांच्यासमक्ष घडला. श्रीकृष्ण बढे जिवंत असताना यादीत त्यांना मयत दाखविण्याचा प्रताप निवडणूक विभागाने केला कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोलाAkolaअकोला