शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
3
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
4
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
5
एक एक गोष्ट बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
6
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
7
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
8
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
9
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
10
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
11
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
12
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
13
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
14
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
15
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
16
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
17
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
18
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
19
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
20
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी

Lok Sabha Election 2019 : राज्यातील २५ मतदारसंघात गाजणार शेतकरी समस्यांचे मुद्दे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 2:25 PM

अकोला: लोकसभा निवडणुकीत राज्यातील दुष्काळग्रस्त २५ मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे मुद्दे गाजणार आहेत, असे मत कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

- संतोष येलकर

अकोला: लोकसभा निवडणुकीत राज्यातील दुष्काळग्रस्त २५ मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे मुद्दे गाजणार आहेत, असे मत कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.राज्यातील दुष्काळग्रस्त किमान २५ लोकसभा मतदारसंघात सध्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भिष्य असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांसाठी छावण्या आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे थंड बस्त्यात असून, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. त्यानुषंगाने दुष्काळी परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस, सोयाबीन व डाळींच्या कमी झालेल्या किमतीचा परिणाम शेतकऱ्यांच्या नाराजीतून लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो, असा अंदाज तिवारी यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत राज्यातील दुष्काळग्रस्त २५ मतदारसंघात कर्जमाफी, शेतीमालाचे भाव, दुष्काळी मदत यासह शेतकºयांच्या विविध समस्यांचे मुद्दे गाजणार असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले.शेतकरी-शेतमजुरांचे स्थलांतर; मतदानात होणार घट?दुष्काळी परिस्थितीत राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांचे शहरांमध्ये स्थलांतर होत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी व शेतमजुरांच्या मतदानाच्या टक्केवारीत घट होण्याची शक्यता आहे, असेही किशोर तिवारी यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीत राज्यातील दुष्काळी परिस्थिती असलेल्या किमान २५ मतदारसंघात शेतमालाचे हमी भाव, कर्जमाफी, दुष्काळी मदत व इतर शेतकºयांच्या समस्यांचे मुद्दे गाजणार आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या समस्या राज्यकर्त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे.-किशोर तिवारीअध्यक्ष, कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन

 

टॅग्स :akola-pcअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणKishor Tiwariकिशोर तिवारीAkolaअकोलाFarmerशेतकरी