शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

Lok Sabha Election 2019 : युतीचे सूर बिघडलेलेच; आघाडीची अस्तित्वासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 14:46 IST

महापालिकेच्या निवडणुकीपासून या मतदारसंघात भाजप व शिवसेनेतील सूर बिघडले असून, काँग्रेस-राष्ट्रवादीची अस्तित्वासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र आहे.

- आशिष गावंडे

अकोला: भाजपचे वर्चस्व असलेल्या अकोला पश्चिम मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग असून, त्याने वेळोवेळी हिंदुत्वाच्या अजेंड्यानुसार भाजपच्या पारड्यात मतांचे दान टाकल्याचे चित्र दिसून येते.मात्र महापालिकेच्या निवडणुकीपासून या मतदारसंघात भाजप व शिवसेनेतील सूर बिघडले असून, काँग्रेस-राष्ट्रवादीची अस्तित्वासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र आहे. एकूणच परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीत मताधिक्य टिकवण्याचे भाजपसमोर आव्हान आहे.लोकसभा मतदारसंघातील अकोला पश्चिम हा भाजपसाठी महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. २५ वर्षांचा इतिहास पाहता या विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचे निर्विवाद वर्चस्व दिसून येते. गोवर्धन शर्मा या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून २०१४ मधील विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती नसली तरी त्यांना मिळालेले मताधिक्य पाहता भाजपची तटबंदी फार मजबूत असल्याचे लक्षात येते. शिवसेनेचीसुद्धा या मतदारसंघात खोलवर पाळेमुळे रुजल्याची परिस्थिती आहे. शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग पश्चिम मतदारसंघात दिसून येतो. २०१४ मधील निवडणुकीचा अपवाद वगळता या मतदारसंघातून भाजप-सेना युतीचे उमेदवार म्हणूनच आ. गोवर्धन शर्मा निवडणुकीला सामोरे गेले आहेत. त्यामुळे साहजिकच सेनेच्या मतदाराने भाजपच्या पारड्यात मत टाकले. यंदा लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची पुन्हा युती झाली असली तरी २०१७ मधील मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीपासून भाजप-सेनेचे सूर जुळत नसल्याचे दिसून येते. भाजपकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जातो. लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर शिवसेनेची ही नाराजी दूर करून मताधिक्य टिकवण्याचे भाजपसमोर आव्हान आहे.शिवसेनेला संपविण्याची खेळी!मनपाच्या निवडणुकीत पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेला संपविण्याची खेळी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून खेळण्यात आल्याचा सेनेच्या गोटातून आरोप होतो. त्यामध्ये तथ्यही असल्याचे दिसून येते. शिवसेनेच्या विरोधात तगडे उमेदवार देणे, त्यांना सर्व प्रकारची रसद पुरवणे, निधी वाटपातून वेळोवेळी डच्चू देणे, सेना नगरसेवकांच्या वाटेला गेलेल्या विकास कामांना खोडा घातल्या जात असल्याचा आरोप सेनेकडून होतो.

आघाडीसमोर अस्तिवाची लढाईअकोला पश्चिम मतदारसंघात २०१४ मधील निवडणुकीचा अपवाद वगळल्यास काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणे पसंत केले. या दोन्ही पक्षांची वेळोवेळी आघाडी होत असली, तरी त्याला सुरुंग लावण्याचे काम आजवर भारिप-बहुजन महासंघाने केल्याचे दिसून येते. या मतदारसंघात भारिपच्या स्वतंत्र भूमिकेमुळे भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा होत असल्याचे चित्र आहे. यंदा काँग्रेस-राकाँची आघाडी झाल्यास भाजप-शिवसेना युतीसमोर त्यांची अस्तित्वाची लढाई पाहावयास मिळू शकते. 

असे रंगले होते राजकारण२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढले. या लढतीत आ. गोवर्धन शर्मा यांना ६६ हजार ९३४ मते मिळाली, तर सेनेच्या गुलाबराव गावंडे यांना १० हजार ८०० मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार विजयराव देशमुख यांनी मुसंडी मारत २६ हजार ९८१ मते मिळविली. त्या तुलनेत काँग्रेसच्या उमेदवार उषा विरक यांना १० हजारांपेक्षा अधिक मते मिळाली होती. भारिप-बमसंचे उमेदवार आसिफ खान यांना २३ हजार ९२७ मते मिळाली होती. 

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा