शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

लॉकडाउन : साठ परप्रांतीय मनपाच्या निवाऱ्यात आश्रयाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 11:01 IST

निवारा केंद्रांमध्ये परराज्यातील नागरिकांचा मुक्काम वाढला असून, त्यांना घरी जाण्याची ओढ लागली असल्याची भावना मध्य प्रदेशातील व्यक्तीने बोलून दाखविली.

- आशिष गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाउन’ घोषित केला होता. आता हा कालावधी ३ मेपर्यंत वाढविण्यात आला. यामुळे मनपाने उघडलेल्या दोन निवारा केंद्रांमध्ये परराज्यातील नागरिकांचा मुक्काम वाढला असून, त्यांना घरी जाण्याची ओढ लागली असल्याची भावना मध्य प्रदेशातील व्यक्तीने बोलून दाखविली.कोरोना विषाणूचा संसर्ग देशभरात पसरत असल्याचे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च रोजी देशात १४ एप्रिलपर्यंत टाळेबंदीची घोषणा केली होती. या निर्णयामुळे उद्योग-व्यवसाय बंद पडल्याने हातावर पोट असणाºया मजूर वर्गाने आपापल्या गावी परत जाण्याची भूमिका घेतली. प्रवासाकरिता वाहनांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अशा मजूर वर्गाने चक्क पायी चालत त्यांची गावे गाठण्याचा निर्णय घेतला; परंतु कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्यामुळे त्याचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता अशा नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने तसेच महापालिका, नगरपालिका, नगर परिषद यांनी त्यांच्या स्तरावर निवारा केंद्र उघडण्याचे निर्देश शासनाने दिले. त्या पृष्ठभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरात दोन ठिकाणी निवारा केंदे्र उघडली आहेत.यामध्ये अकोट फैलस्थित मनपा शाळा क्रमांक ६ च्या आवारात व रामदासपेठमधील मनपा शाळा क्रमांक ७ मध्ये निवारा केंद्र उघडण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणी उघडण्यात आलेल्या निवारा केंद्रांमध्ये २८० पेक्षा जास्त नागरिक मुक्कामी आहेत. या नागरिकांच्या जेवणाची, झोपण्याची तसेच आरोग्य तपासणीची सुविधा मनपा प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे.

दर चार दिवसांआड आरोग्य तपासणीमहापालिकेच्या निवारा केंद्रात मुक्कामी असणाºया महिला, पुरुष व लहान मुलांच्या आरोग्याची दर चार दिवसांनी आरोग्य तपासणी केली जाते. आंघोळीसाठी टॉवेल, साबण आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आल्याने काही व्यक्तींनी हा मुक्काम वाढावा, अशी भावना व्यक्त केली.मनपाकडून सुरक्षारक्षक तैनातमहापालिकेने निवारा केंद्राच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास त्याची माहिती प्रशासनाला तातडीने व्हावी, याकरिता सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे.

इथे सुविधा आहेत; पण घरी जाण्याची चिंता आहे!महापालिकेने जिल्हा न्यायालयासमोरील मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक सातमध्ये शहरातील बेघर तसेच बाहेरगावच्या नागरिकांसाठी निवारा केंद्र उघडले. या ठिकाणी १९८ नागरिक मुक्कामी आहेत. यापैकी सात व्यक्ती परराज्यातील असून, निवारा केंद्रामध्ये सर्व सुविधा असल्या तरी घरी जाण्याची चिंता सतावत असल्याची भावना मध्य प्रदेशातील हातमजुरी करणाºया तीन कुटुंबीयांनी बोलताना व्यक्त केली.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या