शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउन : साठ परप्रांतीय मनपाच्या निवाऱ्यात आश्रयाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 11:01 IST

निवारा केंद्रांमध्ये परराज्यातील नागरिकांचा मुक्काम वाढला असून, त्यांना घरी जाण्याची ओढ लागली असल्याची भावना मध्य प्रदेशातील व्यक्तीने बोलून दाखविली.

- आशिष गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाउन’ घोषित केला होता. आता हा कालावधी ३ मेपर्यंत वाढविण्यात आला. यामुळे मनपाने उघडलेल्या दोन निवारा केंद्रांमध्ये परराज्यातील नागरिकांचा मुक्काम वाढला असून, त्यांना घरी जाण्याची ओढ लागली असल्याची भावना मध्य प्रदेशातील व्यक्तीने बोलून दाखविली.कोरोना विषाणूचा संसर्ग देशभरात पसरत असल्याचे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च रोजी देशात १४ एप्रिलपर्यंत टाळेबंदीची घोषणा केली होती. या निर्णयामुळे उद्योग-व्यवसाय बंद पडल्याने हातावर पोट असणाºया मजूर वर्गाने आपापल्या गावी परत जाण्याची भूमिका घेतली. प्रवासाकरिता वाहनांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अशा मजूर वर्गाने चक्क पायी चालत त्यांची गावे गाठण्याचा निर्णय घेतला; परंतु कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्यामुळे त्याचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता अशा नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने तसेच महापालिका, नगरपालिका, नगर परिषद यांनी त्यांच्या स्तरावर निवारा केंद्र उघडण्याचे निर्देश शासनाने दिले. त्या पृष्ठभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरात दोन ठिकाणी निवारा केंदे्र उघडली आहेत.यामध्ये अकोट फैलस्थित मनपा शाळा क्रमांक ६ च्या आवारात व रामदासपेठमधील मनपा शाळा क्रमांक ७ मध्ये निवारा केंद्र उघडण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणी उघडण्यात आलेल्या निवारा केंद्रांमध्ये २८० पेक्षा जास्त नागरिक मुक्कामी आहेत. या नागरिकांच्या जेवणाची, झोपण्याची तसेच आरोग्य तपासणीची सुविधा मनपा प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे.

दर चार दिवसांआड आरोग्य तपासणीमहापालिकेच्या निवारा केंद्रात मुक्कामी असणाºया महिला, पुरुष व लहान मुलांच्या आरोग्याची दर चार दिवसांनी आरोग्य तपासणी केली जाते. आंघोळीसाठी टॉवेल, साबण आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आल्याने काही व्यक्तींनी हा मुक्काम वाढावा, अशी भावना व्यक्त केली.मनपाकडून सुरक्षारक्षक तैनातमहापालिकेने निवारा केंद्राच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास त्याची माहिती प्रशासनाला तातडीने व्हावी, याकरिता सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे.

इथे सुविधा आहेत; पण घरी जाण्याची चिंता आहे!महापालिकेने जिल्हा न्यायालयासमोरील मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक सातमध्ये शहरातील बेघर तसेच बाहेरगावच्या नागरिकांसाठी निवारा केंद्र उघडले. या ठिकाणी १९८ नागरिक मुक्कामी आहेत. यापैकी सात व्यक्ती परराज्यातील असून, निवारा केंद्रामध्ये सर्व सुविधा असल्या तरी घरी जाण्याची चिंता सतावत असल्याची भावना मध्य प्रदेशातील हातमजुरी करणाºया तीन कुटुंबीयांनी बोलताना व्यक्त केली.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या