शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लॉकडाउन : साठ परप्रांतीय मनपाच्या निवाऱ्यात आश्रयाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 11:01 IST

निवारा केंद्रांमध्ये परराज्यातील नागरिकांचा मुक्काम वाढला असून, त्यांना घरी जाण्याची ओढ लागली असल्याची भावना मध्य प्रदेशातील व्यक्तीने बोलून दाखविली.

- आशिष गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाउन’ घोषित केला होता. आता हा कालावधी ३ मेपर्यंत वाढविण्यात आला. यामुळे मनपाने उघडलेल्या दोन निवारा केंद्रांमध्ये परराज्यातील नागरिकांचा मुक्काम वाढला असून, त्यांना घरी जाण्याची ओढ लागली असल्याची भावना मध्य प्रदेशातील व्यक्तीने बोलून दाखविली.कोरोना विषाणूचा संसर्ग देशभरात पसरत असल्याचे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च रोजी देशात १४ एप्रिलपर्यंत टाळेबंदीची घोषणा केली होती. या निर्णयामुळे उद्योग-व्यवसाय बंद पडल्याने हातावर पोट असणाºया मजूर वर्गाने आपापल्या गावी परत जाण्याची भूमिका घेतली. प्रवासाकरिता वाहनांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अशा मजूर वर्गाने चक्क पायी चालत त्यांची गावे गाठण्याचा निर्णय घेतला; परंतु कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्यामुळे त्याचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता अशा नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने तसेच महापालिका, नगरपालिका, नगर परिषद यांनी त्यांच्या स्तरावर निवारा केंद्र उघडण्याचे निर्देश शासनाने दिले. त्या पृष्ठभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरात दोन ठिकाणी निवारा केंदे्र उघडली आहेत.यामध्ये अकोट फैलस्थित मनपा शाळा क्रमांक ६ च्या आवारात व रामदासपेठमधील मनपा शाळा क्रमांक ७ मध्ये निवारा केंद्र उघडण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणी उघडण्यात आलेल्या निवारा केंद्रांमध्ये २८० पेक्षा जास्त नागरिक मुक्कामी आहेत. या नागरिकांच्या जेवणाची, झोपण्याची तसेच आरोग्य तपासणीची सुविधा मनपा प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे.

दर चार दिवसांआड आरोग्य तपासणीमहापालिकेच्या निवारा केंद्रात मुक्कामी असणाºया महिला, पुरुष व लहान मुलांच्या आरोग्याची दर चार दिवसांनी आरोग्य तपासणी केली जाते. आंघोळीसाठी टॉवेल, साबण आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आल्याने काही व्यक्तींनी हा मुक्काम वाढावा, अशी भावना व्यक्त केली.मनपाकडून सुरक्षारक्षक तैनातमहापालिकेने निवारा केंद्राच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास त्याची माहिती प्रशासनाला तातडीने व्हावी, याकरिता सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे.

इथे सुविधा आहेत; पण घरी जाण्याची चिंता आहे!महापालिकेने जिल्हा न्यायालयासमोरील मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक सातमध्ये शहरातील बेघर तसेच बाहेरगावच्या नागरिकांसाठी निवारा केंद्र उघडले. या ठिकाणी १९८ नागरिक मुक्कामी आहेत. यापैकी सात व्यक्ती परराज्यातील असून, निवारा केंद्रामध्ये सर्व सुविधा असल्या तरी घरी जाण्याची चिंता सतावत असल्याची भावना मध्य प्रदेशातील हातमजुरी करणाºया तीन कुटुंबीयांनी बोलताना व्यक्त केली.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या