शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउन नावालाच; जिल्ह्यात येणाºयांचा ओघ सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 11:20 IST

१ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात १८४३० प्रवासी ग्रामीण भागात परत आले आहेत.

ठळक मुद्देसीमा सील; जिल्ह्यातील गावांमध्ये येणारांचा ओघ मात्र सुरूचबुधवारी ८०० प्रवासी दाखल : रात्रीची गस्त वाढविण्याची गरज

अकोला : जिल्ह्याच्या सीमा सील करून संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी कामानिमित्त देशासह, राज्यातील विविध शहरांमध्ये गेलेले लोक आता लॉकडाउनच्या काळात परत येत आहेत. १ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात १८४३० प्रवासी ग्रामीण भागात परत आले आहेत. १ एप्रिल रोजी तब्बल ८०० प्रवासी अकोल्यातील विविध भागात दाखल झाले असल्याने सीमा सील करण्याच्या उद्देशाला हरताळ फासल्याचे समोर आले आहे.अकोल्यात १ एप्रिल रोजी दाखल झालेल्यांपैकी सर्वांची आरोग्य तपासणी झाली असून, १९३ जणांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी सांगितले.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन झाले. राज्यात संचारबंदीही लागू झाली. या परिस्थितीत आहे त्या ठिकाणी न राहता हजारो लोकांनी जिल्ह्यातील मूळ गावाकडे धाव घेतली. त्यातून कोरोना प्रसाराचा धोका आणखीच वाढत आहे.दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी गावांच्या सीमा सील करण्याचा आदेश देतानाच त्यांची तपासणी अनिवार्य केली आहे. जिल्ह्यात परत येणाऱ्यांच्या जत्थ्यांनी आरोग्य यंत्रणेचा ताण कमालीचा वाढवला आहे. रात्री केला जातो दुचाकींचा वापरलॉकडाउनच्या काळात दिवसा पोलिसांची गस्त व बंदोबस्त असल्याने जिल्हा सीमा ओलांडण्याची हिंमत कोणी करत नाही; मात्र रात्री काही प्रमाणात बंदोबस्त सुस्तावल्यावर बाहेरगावी जाणाºयांचे प्रमाण वाढल्याची माहिती आहे. राष्टÑीय महामार्गावर बुधवारी रात्री पाहणी केली असता, मोठया प्रमाणात मोटारसायकलवरून युवक जाताना दिसले. काही युवकांनी महामार्गाच्या लगतचा कच्चा रस्ता यासाठी वापरल्याचीही माहिती आहे. नागपूर, अमरावतीमधूनही येत आहेत युवकनागपूर, अमरावती या मोठ्या शहरांमध्ये वास्तव्यास असलेल्या ग्रामीण भागातील युवकांना सध्या गावाकडे परतण्याचे वेध लागले आहे. वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद असल्यामुळे हे तरूण मालवाहतुकीस परवानगी असलेल्या काही वाहनांची मदत घेताना दिसतात तर काही युवकांनी चक्क मोटारसायकलीवरूनच आपले गाव गाठण्याची धडपड सुरू केली आहे. शेजारी व ग्रामस्थांनी राहावे सजगशहरात दाखल होणाºया अशा प्रवाशांची माहिती त्यांच्या शेजाºयांनी तर गावात दाखल होणाºया अशा प्रवाशांची माहिती ग्रामस्थ, सरपंच व सजग ग्रामस्थांनी प्रशासनाला देणे गरजेचे आहे. या प्रवाशांची तपासणी झाली नाही अन् ते कोरोना विषाणूचे वाहक निघाले तर तो त्या परिवारासोबतच सर्वांसाठी धोका ठरणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस