शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

लॉकडाउन नावालाच; जिल्ह्यात येणाºयांचा ओघ सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 11:20 IST

१ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात १८४३० प्रवासी ग्रामीण भागात परत आले आहेत.

ठळक मुद्देसीमा सील; जिल्ह्यातील गावांमध्ये येणारांचा ओघ मात्र सुरूचबुधवारी ८०० प्रवासी दाखल : रात्रीची गस्त वाढविण्याची गरज

अकोला : जिल्ह्याच्या सीमा सील करून संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी कामानिमित्त देशासह, राज्यातील विविध शहरांमध्ये गेलेले लोक आता लॉकडाउनच्या काळात परत येत आहेत. १ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात १८४३० प्रवासी ग्रामीण भागात परत आले आहेत. १ एप्रिल रोजी तब्बल ८०० प्रवासी अकोल्यातील विविध भागात दाखल झाले असल्याने सीमा सील करण्याच्या उद्देशाला हरताळ फासल्याचे समोर आले आहे.अकोल्यात १ एप्रिल रोजी दाखल झालेल्यांपैकी सर्वांची आरोग्य तपासणी झाली असून, १९३ जणांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी सांगितले.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन झाले. राज्यात संचारबंदीही लागू झाली. या परिस्थितीत आहे त्या ठिकाणी न राहता हजारो लोकांनी जिल्ह्यातील मूळ गावाकडे धाव घेतली. त्यातून कोरोना प्रसाराचा धोका आणखीच वाढत आहे.दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी गावांच्या सीमा सील करण्याचा आदेश देतानाच त्यांची तपासणी अनिवार्य केली आहे. जिल्ह्यात परत येणाऱ्यांच्या जत्थ्यांनी आरोग्य यंत्रणेचा ताण कमालीचा वाढवला आहे. रात्री केला जातो दुचाकींचा वापरलॉकडाउनच्या काळात दिवसा पोलिसांची गस्त व बंदोबस्त असल्याने जिल्हा सीमा ओलांडण्याची हिंमत कोणी करत नाही; मात्र रात्री काही प्रमाणात बंदोबस्त सुस्तावल्यावर बाहेरगावी जाणाºयांचे प्रमाण वाढल्याची माहिती आहे. राष्टÑीय महामार्गावर बुधवारी रात्री पाहणी केली असता, मोठया प्रमाणात मोटारसायकलवरून युवक जाताना दिसले. काही युवकांनी महामार्गाच्या लगतचा कच्चा रस्ता यासाठी वापरल्याचीही माहिती आहे. नागपूर, अमरावतीमधूनही येत आहेत युवकनागपूर, अमरावती या मोठ्या शहरांमध्ये वास्तव्यास असलेल्या ग्रामीण भागातील युवकांना सध्या गावाकडे परतण्याचे वेध लागले आहे. वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद असल्यामुळे हे तरूण मालवाहतुकीस परवानगी असलेल्या काही वाहनांची मदत घेताना दिसतात तर काही युवकांनी चक्क मोटारसायकलीवरूनच आपले गाव गाठण्याची धडपड सुरू केली आहे. शेजारी व ग्रामस्थांनी राहावे सजगशहरात दाखल होणाºया अशा प्रवाशांची माहिती त्यांच्या शेजाºयांनी तर गावात दाखल होणाºया अशा प्रवाशांची माहिती ग्रामस्थ, सरपंच व सजग ग्रामस्थांनी प्रशासनाला देणे गरजेचे आहे. या प्रवाशांची तपासणी झाली नाही अन् ते कोरोना विषाणूचे वाहक निघाले तर तो त्या परिवारासोबतच सर्वांसाठी धोका ठरणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस