शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Lockdown Efect : लाखो क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे पडून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 17:16 IST

खेडा खरेदी बंद झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

ठळक मुद्देशासनाने कापसाला पाच हजार पाचशे रुपये हमीदर जाहीर केले. सीसीआयने ८४ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली. शेतमाल विकता येत नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे.

अकोला: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात ‘लॉकडाउन’ घोषित करण्यात आले आहे. यामुळे उद्योगासह शेतमाल विक्रीकर यावर मोठा परिणाम झाला आहे. लाखो क्विंटल कापूस घरीच पडून आहे. खेडा खरेदी बंद झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. राज्यात कापसाचे क्षेत्र चाळीस लाख हेक्टरवर आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात जवळपास ४२ लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी कापूस पेरणी केली. सुरुवातीला पाऊस लांबल्याने पेरणीला विलंब झाला. जुलैमध्ये पाऊस पडल्यानंतर शेतकºयांनी पेरणी केली; परंतु पीक वाढीच्या अवस्थेत सतत पाऊस सुरू होता. त्याचा परिणाम काहीअंशी कापूस उत्पादनावर झाला. असे असले तरी काही भागात चांगले पीक आले. शासनाने कापसाला पाच हजार पाचशे रुपये हमीदर जाहीर केले. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ आणि भारतीय (सीसीआय) कापूस महामंडळाने राज्यात कमी दराने कापूस खरेदी सुरू केली. पणन महासंघाचे यावर्षी जवळपास ५२ लाख क्विंटल कापूस खरेदी केला. तसेच सीसीआयने ८४ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली. गतवर्षी पावसाळा लांबल्याने शेतकºयांनी उशिरापर्यंत म्हणजे मार्च महिन्यापर्यंत कापूस वेचणी केली. त्यामुळे शेतकºयांकडे आजमितीस ६५ ते ७० लाख क्विंटल कापूस पडून आहे. देशातील ‘लॉकडाउन’मुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर शेतमाल विकता येत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. दरवर्षी कापूस खरेदीसाठी व्यापारी गावा-गावांत जातात, याला खेडा खरेदी पद्धत म्हणतात. यावर्षी खेडा खरेदी शक्य नाही. त्यामुळे व्यापारी गावात जात नाहीत. त्याचाही परिणाम कापूस विक्रीवर झाला आहे.या अडचणीत सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने टप्प्या-टप्प्याने कापूस खरेदी करावी, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.राज्यात कापसाचे अर्धे क्षेत्र विदर्भात आहे. विदर्भात अल्पभूधारक शेतकºयांच्या प्रमाण हे ७० टक्­क्­यांच्यावर आहे. सुरुवातीला यातील काही शेतकºयांनी कापूस विकला असला तरी अनेक शेतकºयांकडे आणखी कापूस घरी आहे. येथे कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच या भागातील सर्व पिके पावसावर अवलंबून आहेत. म्हणूनच येथील शेतकरी कापूस सोयाबीनसारखी पिके घेतात; परंतु यावर्षी कोरोनामुळे खरेदी बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून, शासनाने तातडीने यांना मदत करावी, अशी मागणीही शेतकरी नेत्यांनी केली आहे.

 शेतकºयांकडे कापूस आहे; परंतु कोरोनामुळे खरेदी केंद्र बंद आहेत. १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाउन’ आहे. त्यामुळे शासन पुढे काय निर्णय घेणार, यावर अवलंबून आहे. ‘लॉकडाउन’ वाढविला तर शेतकºयांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी उपाययोजना महत्त्वाच्या ठरणार आहेत. याकडे आमचे लक्ष लागले आहे.- मनोज तायडे,शेतकरी नेते,अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूसFarmerशेतकरी