शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

जीवन जगण्याची जडीबुटी ग्रामगीता- संतोष मोरे

By admin | Updated: February 23, 2015 01:56 IST

युवा संमेलन व मौन श्रद्धांजलीने राष्ट्रसंत पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप.

अकोला- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या युवकांना खरी गरज आहे. ग्रामगीतेतून राष्ट्रसंतांनी दिलेले विचार ही जीवन जगण्याची जडीबुटी असल्याचे प्रतिपादन अँड. संतोष मोरे यांनी रविवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी आयोजित युवक संमेलनामध्ये केले. तुकडोजी महाराज सेवा समितीतर्फे मोठय़ा उमरीत आयोजित दोन दिवसीय संमेलनाचा समारोप राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली वाहून करण्यात आला. सकाळच्या सत्रात गुरुदेव भजन मंडळ राऊतवाडी, ढोलाचे भजन मंडळ, वारकरी भजन मंडळ, महिला भजन मंडळ, खंजिरी भजन मंडळ तसेच बालिका भजन मंडळ खडकी यांनी भजने सादर केली. हभप प्रभुदास महाराज यांचे ग्रामगीतेवर प्रवचन झाले. तसेच स्वर गुंज इंद्रधनुष्य यांचा बहारदार कार्यक्रम झाला. दुपारच्या सत्रात आचार्य हरिभाऊ वेरूळकर यांचे ग्रामगीतेवर प्रवचन झाले. युवक संमेलनात संतोष मोरे यांच्यासह प्रशांत बुले, सुमित जोशी, कृष्णा पखाले, अँड. संतोष गावंडे यांनी सहभाग घेतला. प्रमुख उपस्थितांमध्ये संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष पंकज जायले, रणजित काळे, सतीश मानकर, दीपक पाटील आदींची उपस्थिती होती. संचालन अमोल नावकार यांनी केले तर आभार माणिक शेळके यांनी मानले. ह्यराष्ट्रसंतांची आदर्श ग्रामविकास संकल्पनाह्ण या विषयावर रामेश्‍वर बरगट यांचे व्याख्यान झाले. गुरुदेव सेवा बाल भजन मंडळ गोरेगाव यांनी भजन सादर केले. सुगम संगीतावर प्रा. निरंजन लांडे यांचा कार्यक्रम झाला. राजेश सोनोने यांचा भजनसंध्या कार्यक्रम आयोजित केला होता. सायंकाळी ६.३0 वाजता मौन श्रद्धांजली व सर्वधर्मीय प्रार्थना झाली. संदीपपाल महाराज यांच्या समाजप्रबोधनपर कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली.