शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

आयुर्वेदिक, युनानी औषधांच्या परवान्यांची हाेणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 17:07 IST

Akola News राज्य शासनाने चारसदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

अकाेला : राज्यात आयुर्वेदिक, युनानी व सिद्ध औषधांचे उत्पादन केल्यानंतर बाजारात विक्रीचा परवाना देण्यापूर्वी त्याच्या नूतनीकरणाची तपासणी केली जाणार आहे. तसेच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने चारसदस्यीय तज्ज्ञ समिती ्स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला आहे.

देशभरासह राज्यात मागील काही दिवसांपासून आयुर्वेदिक औषधांच्या मागणीत वाढ झाली आहे. यामध्ये युनानी औषधींचाही समावेश आहे. आयुर्वेदिक, युनानी व सिद्ध औषधींचे उत्पादन करण्यासाठी अनेक कंपन्या कार्यरत आहेत. आयुर्वेदिक औषधीच्या मागणीत वाढ झाल्याने त्यांचे पेटंट मिळविण्याकडे ओढा वाढत चालला आहे. पेटंट मिळविलेल्या औषधींचे उत्पादन करणे व त्यांची बाजारात विक्री करण्यासाठी परवाना देणे किंवा परवान्यांच्या नूतनीकरणीकरणासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली हाेती. या समितीमध्ये नव्याने फेररचना करण्यासाठी राज्य शासनाच्या स्तरावर हालचाली सुरू हाेत्या. परवाना देणे, त्याचे नूतणीकरण तपासणे व या संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने चारसदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आयुष संचालनालयाचे संचालक अध्यक्षस्थानी असून इतर तीन तज्ज्ञांचा सदस्यपदी समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :Akolaअकोलाmedicinesऔषधं