शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

महापालिकेतील भाजपची सत्ता उलथवून टाकू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST

२०१४ मध्ये भाजपची गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता हाेती. यादरम्यान, भाजपने विकास कामांच्या माेठमाेठ्या गप्पा केल्या. प्रत्यक्षात शहरात झालेली विकास ...

२०१४ मध्ये भाजपची गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता हाेती. यादरम्यान, भाजपने विकास कामांच्या माेठमाेठ्या गप्पा केल्या. प्रत्यक्षात शहरात झालेली विकास कामे अतिशय दर्जाहीन व तकलादू ठरली असून, शहराचे वाटाेळे करण्यात भाजपच्या नेतृत्वाने काेणतीही कसर साेडली नसल्याची खरमरीत टीका महानगराध्यक्ष विजय देशमुख यांनी केली. मागील सात वर्षांच्या कालावधीत महापालिकेच्या माध्यमातून भाजपने अनेक घाेटाळे केले असून याेजनांमधील अनियमितता चव्हाट्यावर आली आहे. हा सर्व हिशेब भाजपला मनपाच्या निवडणुकीत चुकता करावा लागेल, असे सांगत, त्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे देशमुख यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीची जम्बाे शहर कार्यकारिणी घाेषित केली. यामध्ये ९६ जणांचा समावेश आहे.

पत्रकार परिषदेला प्रा. विश्वनाथ कांबळे, शाम बाबू अवस्थी, मंदा देशमुख, रफिक सिद्दीकी, उषा विरक, मनाेज गायकवाड उपस्थित हाेते.

भाजप गवगवा करण्यात पटाइत!

सभागृहात भाजपच्या संख्याबळाच्या तुलनेत आमचे संख्याबळ नगण्य असले तरीही, नियमबाह्य कामांच्यासंदर्भात भाजपला कधीच सहकार्य केले नसल्याचे देशमुख यांनी सांगितले. काेराेना काळात राष्ट्रवादीने शहरात अनेक गरजूंना मदत केली. आम्हाला दिंडाेरा वाजवण्यापेक्षा समाजकारणात रस आहे. त्याउलट भाजपची स्थिती असून ते गवगवा करण्यात पटाईत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

निवडणुकीत महाविकास आघाडी शक्य

राज्यात सर्वसामान्य जनतेच्या भावना लक्षात घेऊनच महाविकास आघाडी जन्माला आली. त्यामुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये हाेऊ घातलेल्या मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना व काॅंग्रेसला साेबत घेऊन महाविकास आघाडीचा प्रयाेग केला जाईल. त्यासाठी इतर पक्षांतील नेत्यांसाेबत संवाद साधण्यात येईल, असे सांगत विजय देशमुख यांनी आघाडीचे संकेत दिले.