शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याचे ७५वे वर्ष जिल्ह्यात ‘सेवा वर्ष’ म्हणून साजरे करू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:25 IST

अकोला : भारतीय स्वातंत्र्याचे ७५वे वर्ष जिल्ह्यात ‘सेवा वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येणार असून, त्यामध्ये सामान्य माणसांचे ...

अकोला : भारतीय स्वातंत्र्याचे ७५वे वर्ष जिल्ह्यात ‘सेवा वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येणार असून, त्यामध्ये सामान्य माणसांचे प्रश्न अजेंड्यावर घेऊन प्राधान्याने सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असेल, अशी घोषणा पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी रविवार, १५ ऑगस्ट रोजी येथे केली.

स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्ह्याच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपवनसंरक्षक अर्जूना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री तसेच माजी आमदार तुकाराम बिरकड, जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष डाॅ. संतोष कोरपे, स्वातंत्र्य सैनिक, शहिदांचे कुटुंबीय, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पोलीस वाद्यवृंदाने वाजवलेल्या राष्ट्रगीताच्या धुनवर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी आपल्या संबोधनात सर्वप्रथम देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे स्वातंत्र्य सैनिक, देशाच्या संरक्षणासाठी प्राणांचे बलिदान देणारे सीमेवरील जवान व शहिदांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. कार्यक्रमाचे संचालन शेखर गाडगे यांनी केले.

संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला

करण्यासाठी प्रशासन सज्ज !

कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, सेवाभावी संस्थांनी चांगले काम केले. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगीतले. खरेतर ही तिसरी लाट येऊच नये अशी प्रार्थनाही आपण करू, असेही त्यांनी सांगितले.

बेघरांसाठी ‘गाडगेबाबा घरकूल

प्रकल्प कार्यान्वित करणार !

स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष हे जिल्ह्यात ‘सेवा वर्ष’, म्हणून साजरे करण्यात येणार असून, त्यामध्ये अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावतांनाच, बेघरांना हक्काचा निवारा देण्यासाठी ‘गाडगेबाबा घरकूल’ हा प्रकल्प कार्यान्वित करू. अनाथांनाही हक्काचे घर देण्यात येणार असून, सामान्य नागरिकांपर्यंत प्रशासनाच्या सेवा पोहोचविण्यासाठी ‘पालकमंत्र्यांची राहुटी आपल्या गावात’, हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.