शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

आतातरी गावचा रस्ता तयार करून देता काहाे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:14 IST

पांढुर्णा : निवडणूक जवळ आली की, पुढारी माेठमाेठी आश्वासने देतात. निवडणुकीनंतर मात्र समस्या तर साेडाच, आश्वासनेही पूर्ण केली जात ...

पांढुर्णा : निवडणूक जवळ आली की, पुढारी माेठमाेठी आश्वासने देतात. निवडणुकीनंतर मात्र समस्या तर साेडाच, आश्वासनेही पूर्ण केली जात नाहीत. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पातूर तालुक्यातील साेनुना येथील गावकऱ्यांना रस्त्याची आस लागली आहे. आतातरी गावचा रस्ता तयार करून देता काहाे, असा टाहाेच साेनुनावासीयांनी फाेडला आहे. मात्र, त्यांच्या या मागणीकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष हाेताना दिसून येत आहे.

बुलडाणा, वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अकाेला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील साेनुना गावाचा रस्त्याविना विकासच थांबला आहे. दुर्गम भागातील हे आदिवासींचे गाव असल्याने गावच्या विकासाकडे दुर्लक्ष हाेत आहे. २५० ते ३०० लोकसंख्या असलेल्या गावात समस्यांचा डाेंगरच उभा आहे. गावकरी अनेक समस्यांना ताेंड देत जगत आहेत. स्वातंत्र्यापासून गावाला रस्ताही नसल्याने गाव विकासापासून काेसाे दूर गेले आहे. शासनाच्या याेजनाही गावात पाेहाेचत नाहीत. डिजिटल नेटवर्कच्या जमान्यात हे गाव संपर्क क्षेत्राबाहेर गेले आहे. गावामध्ये आरोग्य सेवेअभावी अनेक महिलांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला आहे. अनेकांचा सर्पदंशामुळे तर वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यातही मृत्यू झाला आहे. याची शासनाकडे कोणत्याही प्रकारची नोंद नाही. काेराेनाच्या काळातही या गावात साेयीसुविधांचा अभाव दिसून आला. आराेग्य विभागाचे या गावाकडे दुर्लक्ष हाेत आहे. तालुक्याच्या ठिकाणी पोहोचायचे म्हणजे त्यांना चक्क मेहकर तालुक्यातील ३० ते ४० किलोमीटर प्रवास करून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. पांढुर्णा ते सोनुना हा चार किलोमीटर रस्ता पूर्ण जंगलातून असल्यामुळे आणि पूर्णत: खराब असल्यामुळे त्यांना आजही पायी प्रवास करावा लागतो. एखाद्या व्यक्तीला तत्काळ काही कारणामुळे दवाखान्यामध्ये न्यायचे असल्यास चार किलोमीटर त्यांना चक्क बैलगाडीने आणावे लागते. नंतर त्यांना वाहन करून दवाखान्यात न्यावे लागते. सोनुना गावामध्ये कोणतेही मतदान केंद्र नाही. त्यांना मतदान करण्याकरिता गट ग्रामपंचायत पांढुर्णा येथे जावे लागते. मुलाच्या भविष्याकरिता गावातील लोकांनी आपली शाळा डिजिटल बनवली आहे. शाळेतील पटसंख्या १ ते चार ३६ आहे. शिक्षकांची संख्या दोन आहे. डिजिटल बनवून आपल्या मुलांना शिकविण्याचा प्रयत्न करतात. गावातील आजही आदिवासी लोक विकासापासून कोसो दूर आहेत. गावाला रस्ता नाही. आजही लोकांना आशा आहे की, आपल्या गावाला रस्ता मिळेल, आरोग्य सेवा मिळतील, आपली मुले जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जातील. मात्र, सरकारने लक्ष दिले तरच हे शक्य आहे.