शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

आतातरी गावचा रस्ता तयार करून देता काहाे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:14 IST

पांढुर्णा : निवडणूक जवळ आली की, पुढारी माेठमाेठी आश्वासने देतात. निवडणुकीनंतर मात्र समस्या तर साेडाच, आश्वासनेही पूर्ण केली जात ...

पांढुर्णा : निवडणूक जवळ आली की, पुढारी माेठमाेठी आश्वासने देतात. निवडणुकीनंतर मात्र समस्या तर साेडाच, आश्वासनेही पूर्ण केली जात नाहीत. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पातूर तालुक्यातील साेनुना येथील गावकऱ्यांना रस्त्याची आस लागली आहे. आतातरी गावचा रस्ता तयार करून देता काहाे, असा टाहाेच साेनुनावासीयांनी फाेडला आहे. मात्र, त्यांच्या या मागणीकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष हाेताना दिसून येत आहे.

बुलडाणा, वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अकाेला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील साेनुना गावाचा रस्त्याविना विकासच थांबला आहे. दुर्गम भागातील हे आदिवासींचे गाव असल्याने गावच्या विकासाकडे दुर्लक्ष हाेत आहे. २५० ते ३०० लोकसंख्या असलेल्या गावात समस्यांचा डाेंगरच उभा आहे. गावकरी अनेक समस्यांना ताेंड देत जगत आहेत. स्वातंत्र्यापासून गावाला रस्ताही नसल्याने गाव विकासापासून काेसाे दूर गेले आहे. शासनाच्या याेजनाही गावात पाेहाेचत नाहीत. डिजिटल नेटवर्कच्या जमान्यात हे गाव संपर्क क्षेत्राबाहेर गेले आहे. गावामध्ये आरोग्य सेवेअभावी अनेक महिलांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला आहे. अनेकांचा सर्पदंशामुळे तर वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यातही मृत्यू झाला आहे. याची शासनाकडे कोणत्याही प्रकारची नोंद नाही. काेराेनाच्या काळातही या गावात साेयीसुविधांचा अभाव दिसून आला. आराेग्य विभागाचे या गावाकडे दुर्लक्ष हाेत आहे. तालुक्याच्या ठिकाणी पोहोचायचे म्हणजे त्यांना चक्क मेहकर तालुक्यातील ३० ते ४० किलोमीटर प्रवास करून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. पांढुर्णा ते सोनुना हा चार किलोमीटर रस्ता पूर्ण जंगलातून असल्यामुळे आणि पूर्णत: खराब असल्यामुळे त्यांना आजही पायी प्रवास करावा लागतो. एखाद्या व्यक्तीला तत्काळ काही कारणामुळे दवाखान्यामध्ये न्यायचे असल्यास चार किलोमीटर त्यांना चक्क बैलगाडीने आणावे लागते. नंतर त्यांना वाहन करून दवाखान्यात न्यावे लागते. सोनुना गावामध्ये कोणतेही मतदान केंद्र नाही. त्यांना मतदान करण्याकरिता गट ग्रामपंचायत पांढुर्णा येथे जावे लागते. मुलाच्या भविष्याकरिता गावातील लोकांनी आपली शाळा डिजिटल बनवली आहे. शाळेतील पटसंख्या १ ते चार ३६ आहे. शिक्षकांची संख्या दोन आहे. डिजिटल बनवून आपल्या मुलांना शिकविण्याचा प्रयत्न करतात. गावातील आजही आदिवासी लोक विकासापासून कोसो दूर आहेत. गावाला रस्ता नाही. आजही लोकांना आशा आहे की, आपल्या गावाला रस्ता मिळेल, आरोग्य सेवा मिळतील, आपली मुले जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जातील. मात्र, सरकारने लक्ष दिले तरच हे शक्य आहे.