शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

आतातरी गावचा रस्ता तयार करून देता काहाे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:14 IST

पांढुर्णा : निवडणूक जवळ आली की, पुढारी माेठमाेठी आश्वासने देतात. निवडणुकीनंतर मात्र समस्या तर साेडाच, आश्वासनेही पूर्ण केली जात ...

पांढुर्णा : निवडणूक जवळ आली की, पुढारी माेठमाेठी आश्वासने देतात. निवडणुकीनंतर मात्र समस्या तर साेडाच, आश्वासनेही पूर्ण केली जात नाहीत. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पातूर तालुक्यातील साेनुना येथील गावकऱ्यांना रस्त्याची आस लागली आहे. आतातरी गावचा रस्ता तयार करून देता काहाे, असा टाहाेच साेनुनावासीयांनी फाेडला आहे. मात्र, त्यांच्या या मागणीकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष हाेताना दिसून येत आहे.

बुलडाणा, वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अकाेला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील साेनुना गावाचा रस्त्याविना विकासच थांबला आहे. दुर्गम भागातील हे आदिवासींचे गाव असल्याने गावच्या विकासाकडे दुर्लक्ष हाेत आहे. २५० ते ३०० लोकसंख्या असलेल्या गावात समस्यांचा डाेंगरच उभा आहे. गावकरी अनेक समस्यांना ताेंड देत जगत आहेत. स्वातंत्र्यापासून गावाला रस्ताही नसल्याने गाव विकासापासून काेसाे दूर गेले आहे. शासनाच्या याेजनाही गावात पाेहाेचत नाहीत. डिजिटल नेटवर्कच्या जमान्यात हे गाव संपर्क क्षेत्राबाहेर गेले आहे. गावामध्ये आरोग्य सेवेअभावी अनेक महिलांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला आहे. अनेकांचा सर्पदंशामुळे तर वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यातही मृत्यू झाला आहे. याची शासनाकडे कोणत्याही प्रकारची नोंद नाही. काेराेनाच्या काळातही या गावात साेयीसुविधांचा अभाव दिसून आला. आराेग्य विभागाचे या गावाकडे दुर्लक्ष हाेत आहे. तालुक्याच्या ठिकाणी पोहोचायचे म्हणजे त्यांना चक्क मेहकर तालुक्यातील ३० ते ४० किलोमीटर प्रवास करून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. पांढुर्णा ते सोनुना हा चार किलोमीटर रस्ता पूर्ण जंगलातून असल्यामुळे आणि पूर्णत: खराब असल्यामुळे त्यांना आजही पायी प्रवास करावा लागतो. एखाद्या व्यक्तीला तत्काळ काही कारणामुळे दवाखान्यामध्ये न्यायचे असल्यास चार किलोमीटर त्यांना चक्क बैलगाडीने आणावे लागते. नंतर त्यांना वाहन करून दवाखान्यात न्यावे लागते. सोनुना गावामध्ये कोणतेही मतदान केंद्र नाही. त्यांना मतदान करण्याकरिता गट ग्रामपंचायत पांढुर्णा येथे जावे लागते. मुलाच्या भविष्याकरिता गावातील लोकांनी आपली शाळा डिजिटल बनवली आहे. शाळेतील पटसंख्या १ ते चार ३६ आहे. शिक्षकांची संख्या दोन आहे. डिजिटल बनवून आपल्या मुलांना शिकविण्याचा प्रयत्न करतात. गावातील आजही आदिवासी लोक विकासापासून कोसो दूर आहेत. गावाला रस्ता नाही. आजही लोकांना आशा आहे की, आपल्या गावाला रस्ता मिळेल, आरोग्य सेवा मिळतील, आपली मुले जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जातील. मात्र, सरकारने लक्ष दिले तरच हे शक्य आहे.