शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अकोल्यात  ‘ईईएसएल’मुळे नगरसेवकांची गोची; प्रस्ताव बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 14:00 IST

अकोला :एलईडीची कामे ‘ईईएसएल’ कंपनीमार्फत करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश असल्यामुळे नगरसेवकांनी सुचविलेली प्रभागातील एलईडीची कामे रद्द करावी लागणार असल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांची गोची झाली आहे.

ठळक मुद्दे‘ईईएसएल’ कंपनीवर शिक्कामोर्तब केल्यामुळे मनपा प्रशासनाने व नगरसेवकांनी तयार केलेल्या विकास कामांच्या प्रस्तावात फेरबदल केला जात आहे. प्रभागातील एलईडीची कामे रद्द करावी लागणार असल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांची गोची झाली आहे. नऊ कोटींच्या विकास कामांच्या अद्यापही निविदा मंजूर न झाल्यामुळे एलईडीची कामे रद्द करणे प्रशासनाला बंधनकारक आहे.

अकोला : महापालिका क्षेत्रात एलईडी पथदिव्यांसाठी शासनाने ‘ईईएसएल’ कंपनीवर शिक्कामोर्तब केल्यामुळे मनपा प्रशासनाने व नगरसेवकांनी तयार केलेल्या विकास कामांच्या प्रस्तावात फेरबदल केला जात आहे. यापुढे एलईडीची कामे ‘ईईएसएल’ कंपनीमार्फत करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश असल्यामुळे नगरसेवकांनी सुचविलेली प्रभागातील एलईडीची कामे रद्द करावी लागणार असल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांची गोची झाली आहे. त्यामुळे या विषयावर १७ फेब्रुवारी रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.‘सीएफएल’ पथदिव्यांमुळे विजेची बचत होण्याचा दावा करीत महापालिका प्रशासनाने संपूर्ण शहरात सीएफएलचे पथदिवे लावले. कालांतराने नागरिकांना सीएफएलच्या अंधुक उजेडाचा सामना करण्याची वेळ आली. यावर उपाय म्हणून लख्खं प्रकाश देणाºया एलईडीचा वापर करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. एलईडीचा प्रकाश व विजेची बचत ध्यानात घेता महापालिका स्तरावर एलईडी पथदिवे लावण्यासाठी नगर विकास विभागाने ‘ईईएसएल’ कंपनीची निवड केली. या कंपनीच्या माध्यमातून पथदिवे उभारण्याचे स्पष्ट निर्देश मनपा प्रशासनाला दिले. तत्पूर्वी सुवर्ण जयंती नगरोत्थान व दलितेतर निधीतून होणाºया नऊ कोटींच्या विकास कामांमध्ये प्रशासनासह नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात एलईडी पथदिव्यांच्या कामांचा समावेश केला. एलईडीसंदर्भात शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीचा मुद्दा समोर येताच प्रशासनासह नगरसेवकांची गोची झाली आहे. नऊ कोटींच्या विकास कामांच्या अद्यापही निविदा मंजूर न झाल्यामुळे एलईडीची कामे रद्द करणे प्रशासनाला बंधनकारक आहे. यामुळे प्रभागात एलईडी लावण्यासाठी इच्छुक असणाºया सर्वपक्षीय नगरसेवकांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे दिसत आहे.२० कोटींच्या कामाला अडथळा नाही!शासनाने ‘ईईएसएल’ कंपनीची नियुक्ती करण्यापूर्वी मनपा प्रशासनाने २० कोटी रुपयांतून शहरातील प्रमुख रस्ते, प्रमुख चौकांमध्ये एलईडी पथदिवे उभारण्याचा कंत्राट दिला आहे. शासन निर्णयाचा २० कोटींच्या कामाला अडथळा नसून, यापुढे एलईडी लावण्यासाठी केवळ ईईएसएल कंपनीची मदत घ्यावी लागणार आहे.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका