शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

बोगस बियाणे, खतांची विक्री करणाऱ्यांना १० वर्षांच्या शिक्षेचा कायदा करणार - अब्दुल सत्तार 

By आशीष गावंडे | Updated: June 10, 2023 19:50 IST

‘लोकमत’चे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष तसेच ‘लोकमत’ अकोला आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

अकोला: राज्याच्या कृषि विभागाने अकोला जिल्ह्यासह राज्यात ८७ ठिकाणी बनावट व निकृष्ट दर्जाची औषधी, बियाणे व खतांची विक्री करणाऱ्यांविरोधात धाडसत्र राबवले असता, ६८ ठिकाणी अनियमितता आढळून आली. व्यावसायिकांनी पेरणीपूर्वी बनावट बियाणे, खते व औषधींचा साठा नष्ट करावा, अन्यथा राज्यपालांकडे तक्रार करण्यासोबतच अशा व्यावसायिकांना किमान १० वर्षांची शिक्षा व्हावी, असा कठोर कायदा येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करणार असल्याचे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

लोकमत’चे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष तसेच ‘लोकमत’ अकोला आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून राज्यपाल रमेश बैस,  प्रमुख उपस्थिती म्हणून लोकमत समुहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, अध्यक्षस्थानी लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा तसेच समूह संपादक विजय बाविस्कर उपस्थित होते. 

बनावट व निकृष्ट दर्जाची औषधी व बियाण्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर राज्यात ८७ ठिकाणी धाडसत्र राबवले. यामध्ये ६८ ठिकाणी अनियमितता आढळून आली. या धाडसत्रानंतर अधिकाऱ्यांवर आरोप झाले. व्यावसायिकांनी आरोप करण्यापेक्षा पोलिसांत तसेच लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रारी कराव्यात. त्याची शहानिशा केली जाइल. परंतु शेतकऱ्यांसाठी अशा आरोपांची पर्वा करणार नसल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी ठणकावून सांगितले.

जवाहरलालजी चालते बोलते विद्यापीठ होते!ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांनी विद्यार्थी दशेपासून देशसेवा, समाजसेवेचा वसा घेतला होता. बाबूजी आमच्यासाठी चालते बोलते विद्यापीठ होते. ‘लोकमत’ शेतकरी, सर्वसामान्य माणसांचा आवाज आहे. राज्य व देशाच्या विकासाला हातभार लावण्यात ‘लोकमत’चा सिंहाचा वाटा असल्याचे गौरवोद्गार कृषिमंत्री सत्तार यांनी काढले.

राज्यभरात धाडसत्र राबविण्याचा प्रस्तावशेतकऱ्यांच्या भविष्याची पर्वा न करता काही व्यावसायिक बनावट खते, बियाणांची विक्री करुन या व्यवसायाला बदनाम करत आहेत. मी राज्यपाल तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पोलिस, महसूल व कृषि विभागामार्फत संयुक्त धाडसत्र सुरु करण्याचा प्रस्ताव देणार असल्याचे कृषिमंत्री सत्तार यांनी सांगितले. 

राज्यपालांचा साधेपणा दिसून आला!राज्यपाल रमेश बैस तब्बल सात वेळा खासदार होते. त्यामुळे त्यांना सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाणीव आहे. ‘लोकमत’च्या कार्यक्रमाला ते पुण्यावरुन ट्रेनद्वारे आले, यावरुन त्यांच्या साधेपणाची प्रचिती आल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांप्रती राज्यपालांच्या मनात तळमळ असल्याचे ते यावेळी म्हणाले.

सरकार कोणाचेही असो मी सत्तेत आहोच!राज्यात सरकार कोणाचेही असो, मी सत्तेत आहोच. माझ्या नावातच ‘सत्ता’ आहे. मी चारवेळा निवडून आलो आणि प्रत्येकवेळी मंत्री झाल्याचे सांगत कृषिमंत्र्यांनी चौफेर फटकेबाजी केली. पक्ष कोणताही असो मी हमखास जिंकतो. डोक्यावरील टोपीत कला असल्याचे कृषिमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारLokmatलोकमत