शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

बोगस बियाणे, खतांची विक्री करणाऱ्यांना १० वर्षांच्या शिक्षेचा कायदा करणार - अब्दुल सत्तार 

By आशीष गावंडे | Updated: June 10, 2023 19:50 IST

‘लोकमत’चे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष तसेच ‘लोकमत’ अकोला आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

अकोला: राज्याच्या कृषि विभागाने अकोला जिल्ह्यासह राज्यात ८७ ठिकाणी बनावट व निकृष्ट दर्जाची औषधी, बियाणे व खतांची विक्री करणाऱ्यांविरोधात धाडसत्र राबवले असता, ६८ ठिकाणी अनियमितता आढळून आली. व्यावसायिकांनी पेरणीपूर्वी बनावट बियाणे, खते व औषधींचा साठा नष्ट करावा, अन्यथा राज्यपालांकडे तक्रार करण्यासोबतच अशा व्यावसायिकांना किमान १० वर्षांची शिक्षा व्हावी, असा कठोर कायदा येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करणार असल्याचे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

लोकमत’चे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष तसेच ‘लोकमत’ अकोला आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून राज्यपाल रमेश बैस,  प्रमुख उपस्थिती म्हणून लोकमत समुहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, अध्यक्षस्थानी लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा तसेच समूह संपादक विजय बाविस्कर उपस्थित होते. 

बनावट व निकृष्ट दर्जाची औषधी व बियाण्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर राज्यात ८७ ठिकाणी धाडसत्र राबवले. यामध्ये ६८ ठिकाणी अनियमितता आढळून आली. या धाडसत्रानंतर अधिकाऱ्यांवर आरोप झाले. व्यावसायिकांनी आरोप करण्यापेक्षा पोलिसांत तसेच लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रारी कराव्यात. त्याची शहानिशा केली जाइल. परंतु शेतकऱ्यांसाठी अशा आरोपांची पर्वा करणार नसल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी ठणकावून सांगितले.

जवाहरलालजी चालते बोलते विद्यापीठ होते!ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांनी विद्यार्थी दशेपासून देशसेवा, समाजसेवेचा वसा घेतला होता. बाबूजी आमच्यासाठी चालते बोलते विद्यापीठ होते. ‘लोकमत’ शेतकरी, सर्वसामान्य माणसांचा आवाज आहे. राज्य व देशाच्या विकासाला हातभार लावण्यात ‘लोकमत’चा सिंहाचा वाटा असल्याचे गौरवोद्गार कृषिमंत्री सत्तार यांनी काढले.

राज्यभरात धाडसत्र राबविण्याचा प्रस्तावशेतकऱ्यांच्या भविष्याची पर्वा न करता काही व्यावसायिक बनावट खते, बियाणांची विक्री करुन या व्यवसायाला बदनाम करत आहेत. मी राज्यपाल तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पोलिस, महसूल व कृषि विभागामार्फत संयुक्त धाडसत्र सुरु करण्याचा प्रस्ताव देणार असल्याचे कृषिमंत्री सत्तार यांनी सांगितले. 

राज्यपालांचा साधेपणा दिसून आला!राज्यपाल रमेश बैस तब्बल सात वेळा खासदार होते. त्यामुळे त्यांना सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाणीव आहे. ‘लोकमत’च्या कार्यक्रमाला ते पुण्यावरुन ट्रेनद्वारे आले, यावरुन त्यांच्या साधेपणाची प्रचिती आल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांप्रती राज्यपालांच्या मनात तळमळ असल्याचे ते यावेळी म्हणाले.

सरकार कोणाचेही असो मी सत्तेत आहोच!राज्यात सरकार कोणाचेही असो, मी सत्तेत आहोच. माझ्या नावातच ‘सत्ता’ आहे. मी चारवेळा निवडून आलो आणि प्रत्येकवेळी मंत्री झाल्याचे सांगत कृषिमंत्र्यांनी चौफेर फटकेबाजी केली. पक्ष कोणताही असो मी हमखास जिंकतो. डोक्यावरील टोपीत कला असल्याचे कृषिमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारLokmatलोकमत