शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण शिक्षणाला बळकटी देण्यासाठी घरातून शिक्षणाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:13 IST

मागील दीड वर्षापासून ग्रामीण भागात शिक्षणाची प्रचंड वाताहत होत आहे. कोरोनाचा उद्रेक अद्यापही थांबण्याची चिन्हे दिसत नाही. त्यामुळे सारकिन्ही ...

मागील दीड वर्षापासून ग्रामीण भागात शिक्षणाची प्रचंड वाताहत होत आहे. कोरोनाचा उद्रेक अद्यापही थांबण्याची चिन्हे दिसत नाही. त्यामुळे सारकिन्ही येथील शाळेचे मुख्याध्यापक ब्रह्मसिंग राठोड यांनी शैक्षणिक सत्र २०२१-२२ ची सुरुवात घरातूनच करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांच्या सहकारी शिक्षकाने त्यांना साथ दिली. मंगळवारी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शिक्षणाला पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि घर यांना एकत्रितपणे जोडले आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे शिक्षण प्रभावित होणार नाही. यावेळी विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यास किट देण्यात आल्या. यामुळे घराबाहेर न पडता, घरातच मुलांचा अभ्यास सातत्याने चालूच राहणार आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाला आळा बसणार आहे. येथे प्रत्येक घरात मुले अभ्यास किट सोबत खेळताना दिसत आहे. याप्रसंगी शिक्षकांनी १६० घरात साहित्य वितरित केले. यावेळी केंद्रप्रमुख जानोरकर, स.अ. सराफ, मानकर, पुपलवार, टाकसाळे, नालिंदे, नाईक, लहाने, बनसोड, ठाकरे, सोपान काळे उपस्थित होते.

शहर व ग्रामीण शिक्षणातील दरी भरून काढणारा उपक्रम

साधनांचा वापर करून ऑनलाइनद्वारे पुढे जाणारे शहरी शिक्षण व साधनांच्या अपुरेपणामुळे मागे पडलेले ग्रामीण भागातील शिक्षण यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी हा महत्त्वाकांशी उपक्रम असल्याचे समितीचे अध्यक्ष रामेश्वर आंबेकर यांनी सांगितले.

साधनाच्या अपुरेपणावर मात करून घरातूनच शिक्षणाला शुभारंभ करणारी ही शाळा भविष्यात आपला ठसा उमटवेल. उत्साही मुले आणि ग्रामीण शिक्षणाला बळकटी देणाऱ्या घराघरातल्या १६० शाळा स्तुत्य उपक्रम आहे.

- डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

ऑनलाइनच्या समस्येवर उपाययोजना व कोरोनाला आळा घालण्यासाठी घरातूनच शिक्षणाला शुभारंभ करीत आहोत.

- ब्रह्मसिंग राठोड, मुख्याध्यापक, सारकिन्ही