शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

कर्जमाफीचे अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 1:39 AM

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत २१ सप्टेंबरपर्यंंत जिल्हय़ात १ लाख ३८ हजार ४२ शेतकर्‍यांनी कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरले असून, कर्जमाफीचे अर्ज भरण्याची मुदत २२ सप्टेंबरपर्यंंत असल्याने, कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शुक्रवार अखेरचा दिवस आहे. 

ठळक मुद्देजिल्हय़ात १ लाख ३६ हजार शेतकर्‍यांनी भरले ‘ऑनलाइन’ अर्जअर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांचे होणार चावडी वाचन!२ लाख ४४ हजार शेतकर्‍यांच्या अर्जांंची नोंदणी!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत २१ सप्टेंबरपर्यंंत जिल्हय़ात १ लाख ३८ हजार ४२ शेतकर्‍यांनी कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरले असून, कर्जमाफीचे अर्ज भरण्याची मुदत २२ सप्टेंबरपर्यंंत असल्याने, कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शुक्रवार अखेरचा दिवस आहे.  सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंंत राज्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यंंंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने थकबाकीदार शेतकर्‍यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरून घेण्याचे काम गत २४ जुलैपासून जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) व आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर सुरू आहे. २१ सप्टेंबरपर्यंंंत जिल्हय़ात १ लाख ३६ हजार ४२ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे अर्ज भरण्यात आले. कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शासनामार्फत यापूर्वी १५ सप्टेंबरपर्यंंंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर कर्जमाफीचे अर्ज भरण्यास शासनाकडून सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानुषंगाने कर्जमाफीचे अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस शुक्रवार, २२ सप्टेंबर आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी जिल्हय़ातील सेतू केंद्रांवर कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांचे होणार चावडी वाचन!कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर, कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या गावनिहाय याद्या तयार करण्यात येणार आहेत. या शेतकरी याद्यांचे गावनिहाय चावडी वाचन करण्यात येणार आहे, असे अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सांगितले.

२ लाख ४४ हजार शेतकर्‍यांच्या अर्जांंंची नोंदणी!कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील सेतू केंद्रांवर गत २४ जुलै ते २१ सप्टेंबर या कालावधीत २ लाख ४४ हजार ८३0 शेतकर्‍यांच्या अर्जांंंची नोंदणी करण्यात आली असून, १ लाख ३६ हजार ४२ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले.