शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जलयुक्त शिवार अभियानातून मोठी जलक्रांती शक्य

By admin | Updated: May 22, 2015 01:44 IST

जलपुरूष राजेंद्रसिंह यांचे प्रतिपादन, आकोट येथे जलसभा.

आकोट: जल व जनशक्तीला जोडणारे हे जलयुक्त शिवार अभियान आहे. या अभियानामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्यास मोठय़ा प्रमाणात जलक्रांती घडू शकते, असा आशावाद मॅगसेसे पुरस्कारप्राप्त जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत महसूल विभागाच्यावतीने २१ मे रोजी स्थानिक श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात सरपंच, पोलीस पाटील, जि. प., पं. स., ग्रा. पं. सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, जलयुक्त शिवार अभियानातील कार्यकर्ते, शेतकर्‍यांकरिता जलसभा पार पडली. या जलसभेला मॅगसेसे पुरस्कार प्राप्त राजेंद्रसिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अरुण शिंदे तर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार प्रदीप पाटील, सचिन पाटील, डॉ. नीलेश हेडा, कृषी व जलतज्ज्ञ डॉ. सुभाष टाले, पं. स. सभापती अंजली तायडे, गटविकास अधिकारी कालीदास तापी, तालुका कृषी अधिकारी मंगेश ठाकरे, रामराजे घोडवे, केशवराव मेतकर, गजेंद्र वानखडे, हरिभाऊ वाघोडे, गोपाल कोल्हे, तेल्हाराचे मुख्याधिकारी कृष्णा निपाणे यांची उपस्थित होती. यावेळी जलशिवार योजनेंतर्गत उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या आकोट व तेल्हारा तालुक्यातील ग्रामपंचायती तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांचा प्रशस्तिपत्र व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला. आकोट विभागातील कामाचा प्रभाव पाहून जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी एसडीओ शैलेश हिंगे तसेच जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी जलतज्ज्ञ डॉ. सुभाष टाले यांनी हा बझाडा झोन परिसर असल्याने पावसाळ्यातील ४२ टक्के पाणी समुद्रात जाऊन मिसळते. नदी, सरोवर, जमिनीतील ओलावा व नैसर्गिक ओलावा पाण्याचे स्रोत आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने घरात व शेतात जलव्यवस्थापन करावे, असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांनी, शेतकर्‍यांनी व नागरिकांनी जलचळवळ उभी केल्यानं लोकसहभागातून मोठे काम या भागात झाले.