शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

पाणीटंचाईग्रस्त महिलांनी ठोकले ग्रामपंचायतला कुलूप

By admin | Updated: May 26, 2017 02:19 IST

वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेले वाडेगाव येथे एप्रिल महिन्यापसून पूर्ण गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाडेगाव : बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेले वाडेगाव येथे एप्रिल महिन्यापसून पूर्ण गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईने त्रस्त महिलांनी गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. निवेदन घेण्यासाठी कुणीही नसल्याने महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले, तसेच निवेदन दरवाजावर चिकटून दिले. वाडेगाव गावाची लोकसंख्या २२ हजारांच्या जवळपास आहे. ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या महिलांनी गुरुवारी सायंकाळी ६ वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. निवेदन देण्यासाठी कार्यालयात गेले असता तेथे कुणीही हजर नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतच्या कार्यालयाला कुलूप लावले, तसेच निवेदन दरवाजावर चिकटून दिले. या निवेदनावर वंदना काकड, अनिताबाई काकड, लांडे, सरस्वती लांडे आदींची स्वाक्षरी आहे.