शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कोजागरीला दुधाचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:54 IST

अकोला : दैनंदिन वापरापेक्षा उद्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त  जिल्ह्यात दुधाची मागणी प्रचंड वाढणार आहे. त्याचवेळी ही  गरज भागवण्यास शासकीय दुध योजना असर्मथ ठरत आहे.  बुधवारी दिवसभर इतर जिल्हा दुध संस्थांशी संपर्क साधल्यानं तरही तेथून पुरवठा होण्याची शक्यता मावळली. त्यामुळे संपूर्ण  जिल्ह्यात खासगी दुध उत्पादक संस्थांना बाजार खुला राहणार  आहे.

ठळक मुद्देशासकीय दूध संस्था असर्मथ खासगी उत्पादकांना बाजार खुला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दैनंदिन वापरापेक्षा उद्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त  जिल्ह्यात दुधाची मागणी प्रचंड वाढणार आहे. त्याचवेळी ही  गरज भागवण्यास शासकीय दुध योजना असर्मथ ठरत आहे.  बुधवारी दिवसभर इतर जिल्हा दुध संस्थांशी संपर्क साधल्यानं तरही तेथून पुरवठा होण्याची शक्यता मावळली. त्यामुळे संपूर्ण  जिल्ह्यात खासगी दुध उत्पादक संस्थांना बाजार खुला राहणार  आहे.अकोला जिल्ह्यातील दुध उत्पादक संस्थांकडून उत्पादनात वाढ  झाली असताना त्यांच्याकडून दुध घेण्यावर जिल्हा दुग्ध विकास  अधिकारी कार्यालयाने निर्बंध लावले आहेत. तर त्याचवेळी  यवतमाळ, अमरावती येथील शिल्लक राहणारे दुध अकोला  जिल्ह्यात आणून विकले जात असल्याची परिस्थिती आहे. हाच  प्रकार लक्षात घेता उद्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुधाची मागणी  वाढणार आहे. हा अंदाज घेता जिल्हा दुग्ध विकास अधिकारी  दुधाने यांनी लगतच्या जिल्ह्यांतून दुध पुरवठा होण्यासाठी संपर्क  केला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत कोणत्याच जिल्ह्याने  पुरवठा करण्याबाबत होकार दिलेला नाही. त्यामुळे शासकीय  दुग्ध संस्थेतून दुध मिळण्याची प्रतिक्षा करणारांना उद्या दुधापासून  वंचित राहावे लागणार आहे. त्याचवेळी खासगी उत्पादक संस् थांच्या दुधाची विक्री मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. जिल्ह्यात शासकीय दुध डेअरीकडून दररोज किमान १६00  लिटर दुधाचा पुरवठा होत असल्याची माहिती जिल्हा दुग्ध  विकास अधिकार्‍यांनी दिली. प्रत्यक्षात त्यामध्ये प्रचंड तफावत  असल्याची माहिती आहे. अकोट, मूर्तिजापूर तालुक्यातील दुग्ध  उत्पादक सहकारी संस्थांकडून संकलित केलेले केवळ ७00 ते  ८00 लिटर दुधाचे वाटपच दररोज केले जाते. त्यामध्ये यव तमाळ, अमरावती जिल्ह्यातून शिल्लक राहिलेले दुध अकोला  जिल्ह्यात विक्रीसाठी बोलावले जाते, हा प्रकार जिल्ह्यात  दैनंदिन झाला आहे. उद्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मागणीत वाढ  होत असताना इतर जिल्ह्यातील दुध अकोल्यात विक्रीसाठी  येणार नाही. त्याचवेळी जिल्ह्यातील संस्थांच्या दुधाचेही  संकलन केले जात नाही, हा गंभिर प्रकार सुरू आहे. त्यातून  शासकीय दूधावर विश्‍वास ठेवणार्‍या ग्राहकांना त्यापासून वंचित  राहण्याची वेळ आली आहे.