शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

अपहृत शुभमची खंडणीकरिता हत्या

By admin | Updated: March 4, 2015 02:23 IST

आंबोडा गावातील तीन आरोपी जेरबंद.

आकोट (जि. अकोला): शुभम शिवरकारचे खंडणीकरिताच अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आकोट ग्रामीण पोलिसांनी गावातीलच तीन आरोपींना मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. शुभमच्या हत्या प्रकरणात चौकशीकरिता ताब्यात घेतलेल्या दोघांवर संशय बळावल्याने त्यांना पोलीस खाक्या दाखवून विचारपूस करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीतून हत्येचे गुढ उकलले. त्यानुसार पोलिसांनी शंकर सुरेश कोष्टी, संतोष अण्णा कोमटी, रमेश मनोज अंभोरे (सर्व रा. आंबोडा) यांना अटक करण्यात आली आहे. आंबोडा येथील पोलीस पाटीलचा मुलगा शुभमचे २५ फेब्रुवारीला अपहरण करण्यात आले होते. दुसर्‍या दिवशी त्याचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत विहिरीत आढळून आला. तब्बल पाच दिवसांनंतर या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. अटक केलेल्या आरोपींना पैशाची गरज असल्याने त्यांनी शुभमचे अपहरण करून खंडणी मागण्याचा कट चार दिवसांपूर्वी रचला होता. त्यानुसार २५ फेब्रुवारीला शुभमच्या घरासमोरच राहणार्‍या शंकर कोष्टीने पाळत ठेवली. शुभम घराबाहेर खेळत असल्याची माहिती त्याने त्याचा सहकारी रमेश अंभोरेला दिली. कोणाचे लक्ष नसताना रमेश अंभोरेने शुभमला बाजूच्या शेतात नेले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे शंकर कोष्टी हा खंडणी मागण्याकरिता नविन सिम आणायला आकोटात आला. या ठिकाणी त्याला त्याची पत्नी भेटल्याने तो परत गावी आला. शुभमचे अपहरण झाल्याच्या घटनेने सर्व गावकरी एकत्र आल्याचे पाहून घाबरलेला शंकर शेतात गेला. या ठिकाणी त्याने सहकार्‍यांना गावातील माहिती दिली. शुभम हा आरोपींशी परिचित असल्याने बिंग फुटेल, या भीतीपोटी तिघांनी शुभमचा गळा दाबला. संतोषने एक पोते आणले. तिघांनीही शुभमला त्या पोत्यामध्ये भरले. त्यानंतर रमेशने पोते विहिरीत नेऊन टाकले, अशी माहिती पोलिसांनी दिली. कसून तपासानंतर आरोपीचे बिंग फुटल्याने त्यांना अटक केली. या घटनेचा तपास ठाणेदार किशोर शेळके, प्रेमानंद कात्रे, बाबूराव नवथळे, नारायण वाडेकर, सुरेश ढोरे, अनिल सिरसाट आदींनी केला.