शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा: राज ठाकरे
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
4
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
7
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
8
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
9
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
10
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
11
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
13
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
14
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
15
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
16
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
17
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
18
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
19
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
20
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?

खारघरचा कार्यक्रम नियोजनशुन्य; राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

By रवी दामोदर | Updated: April 24, 2023 19:15 IST

अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषदेतून मागणी

अकोला : खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात उष्मघातामुळे तब्बल १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. कार्यक्रम नियोजन शुन्य असल्यानेच दुर्घटना घडली आहे. एखाद्या कार्यक्रमात काही घडले, तर त्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला जातो, त्यानुसार महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवार, दि.२४ एप्रिल रोजी स्वराज्य भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेत माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी याप्रसंगी खारघरचा कार्यक्रम भर उन्हात का घेतला, १३ कोटी रुपये खर्चून ढीसाळ नियोजन कसे, आदी प्रश्न उपस्थित केले. तसेच या घटनेची सत्य परिस्थिती समोर यावी यासाठी विधीमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे, अशी मागणीही याप्रसंगी करण्यात आली. पत्रकार परिषदेला कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगर काँग्रेस अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, साजीद खान पठाण, राज्य सचिव प्रकाश तायडे, महेंद्र गवई, डॉ. सुधीर ढोणे, निखिलेश दिवेकर, अंकुश गावंडे, मुजाहिद खान आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा!’

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी राज्य सरकारने मुंबईतील खारघर येथे भर उन्हात कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमात पाण्याची व्यवस्था अपूरी होती, तसेच कार्यक्रम नियोजनशुन्य होता. त्यामुळेच दुर्घटना घडली. या घटनेची नैतीक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांनी याप्रसंगी केली.