शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव येथील भाजीबाजारात शासनाच्या आदेशाला ‘खो’

By admin | Updated: August 5, 2016 00:45 IST

अडत्यांची मुजोरी शेतक-यांच्या मुळावर!

नाना हिवराळे खामगाव (जि. बुलडाणा)- शेतमाल व भाजीपाला अडतमुक्त करण्यात आला असला, तरी खामगावच्या भाजीबाजारात मात्र अडत्यांची मुजोरी कायम आहे. येथील भाजी बाजारात शेतकर्‍यांकडूनच १0 टक्के अडत घेतली जात असल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे.शेतकर्‍यांनी आणलेल्या शेतीमालावरील अडत ही शेतकर्‍यांकडून न घेता ती व्यापार्‍यांकडून घ्यावी, असा आदेश शासनानेच दिला आहे. तसेच भाजीपाला विक्रीवरील अडतही व्यापार्‍यांकडून घेण्याबाबत आदेश दिला आहे. शासनाच्या या आदेशाविरुद्ध व्यापार्‍यांकडून बाजार समितीचे व्यवहार तीन वेळा बंद ठेवण्यात आले. दरम्यानच्या काळात बाजार समित्या सुरू झाल्या आहेत. मात्र येथे शेकडा १0 टक्के दराने शेतकर्‍यांकडून अडत कपात करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हमाली व इतर खर्चही शेतकर्‍यांकडूनच वसूल करण्यात येत आहे. खामगाव ही बुलडाणा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ आहे. येथे जिल्हाभरातून नव्हे, तर इतर जिल्ह्यातूनही भाजीपाला विक्रीस येतो. भाजीपाला हे नियमनमुक्त असतानाही खामगावात १0 टक्के दराची अडत शेतकर्‍यांकडून कपात करण्यात येत असल्याने शेतकर्‍यांमध्ये ताराजी व्यक्त केली जात आहे. शेतकर्‍यांना दिली जाते कच्ची पावतीभाजीबाजारात सध्या शेतकर्‍याला अडत दुकानाच्या परवान्याची पावती न देता कोर्‍या पावतीवर हिशेब लिहून दिला जात आहे. या हिशेबामध्ये १0 टक्के अडत कपातीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच हमाली व इतर खर्चही कपात करण्यात आला आहे. याबाबत शेतकर्‍यांना विचारणा केली असता नेहमीच शेतमाल विकायला आणावा लागतो. त्यामुळे अडत्यांशी वैर नको, अशी प्रतिक्रिया शेतकर्‍यांकडून येत आहे. -"शासनाच्या अध्यादेशानुसार भाजीपाला विक्री करताना अडत घेता येत नाही. अडत घेणार्‍या व्यापार्‍यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी शेतकर्‍यांनी पुढे येण्याची गरज आहे. अशा व्यापार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे शेतकर्‍याचे नावही गोपनीय ठेवण्यात येईल."- एम.ए. कृपलानीसहायक निबंधक, खामगाव.