शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

खामगाव येथील भाजीबाजारात शासनाच्या आदेशाला ‘खो’

By admin | Updated: August 5, 2016 00:45 IST

अडत्यांची मुजोरी शेतक-यांच्या मुळावर!

नाना हिवराळे खामगाव (जि. बुलडाणा)- शेतमाल व भाजीपाला अडतमुक्त करण्यात आला असला, तरी खामगावच्या भाजीबाजारात मात्र अडत्यांची मुजोरी कायम आहे. येथील भाजी बाजारात शेतकर्‍यांकडूनच १0 टक्के अडत घेतली जात असल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे.शेतकर्‍यांनी आणलेल्या शेतीमालावरील अडत ही शेतकर्‍यांकडून न घेता ती व्यापार्‍यांकडून घ्यावी, असा आदेश शासनानेच दिला आहे. तसेच भाजीपाला विक्रीवरील अडतही व्यापार्‍यांकडून घेण्याबाबत आदेश दिला आहे. शासनाच्या या आदेशाविरुद्ध व्यापार्‍यांकडून बाजार समितीचे व्यवहार तीन वेळा बंद ठेवण्यात आले. दरम्यानच्या काळात बाजार समित्या सुरू झाल्या आहेत. मात्र येथे शेकडा १0 टक्के दराने शेतकर्‍यांकडून अडत कपात करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हमाली व इतर खर्चही शेतकर्‍यांकडूनच वसूल करण्यात येत आहे. खामगाव ही बुलडाणा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ आहे. येथे जिल्हाभरातून नव्हे, तर इतर जिल्ह्यातूनही भाजीपाला विक्रीस येतो. भाजीपाला हे नियमनमुक्त असतानाही खामगावात १0 टक्के दराची अडत शेतकर्‍यांकडून कपात करण्यात येत असल्याने शेतकर्‍यांमध्ये ताराजी व्यक्त केली जात आहे. शेतकर्‍यांना दिली जाते कच्ची पावतीभाजीबाजारात सध्या शेतकर्‍याला अडत दुकानाच्या परवान्याची पावती न देता कोर्‍या पावतीवर हिशेब लिहून दिला जात आहे. या हिशेबामध्ये १0 टक्के अडत कपातीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच हमाली व इतर खर्चही कपात करण्यात आला आहे. याबाबत शेतकर्‍यांना विचारणा केली असता नेहमीच शेतमाल विकायला आणावा लागतो. त्यामुळे अडत्यांशी वैर नको, अशी प्रतिक्रिया शेतकर्‍यांकडून येत आहे. -"शासनाच्या अध्यादेशानुसार भाजीपाला विक्री करताना अडत घेता येत नाही. अडत घेणार्‍या व्यापार्‍यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी शेतकर्‍यांनी पुढे येण्याची गरज आहे. अशा व्यापार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे शेतकर्‍याचे नावही गोपनीय ठेवण्यात येईल."- एम.ए. कृपलानीसहायक निबंधक, खामगाव.