शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

खामगाव येथील भाजीबाजारात शासनाच्या आदेशाला ‘खो’

By admin | Updated: August 5, 2016 00:45 IST

अडत्यांची मुजोरी शेतक-यांच्या मुळावर!

नाना हिवराळे खामगाव (जि. बुलडाणा)- शेतमाल व भाजीपाला अडतमुक्त करण्यात आला असला, तरी खामगावच्या भाजीबाजारात मात्र अडत्यांची मुजोरी कायम आहे. येथील भाजी बाजारात शेतकर्‍यांकडूनच १0 टक्के अडत घेतली जात असल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे.शेतकर्‍यांनी आणलेल्या शेतीमालावरील अडत ही शेतकर्‍यांकडून न घेता ती व्यापार्‍यांकडून घ्यावी, असा आदेश शासनानेच दिला आहे. तसेच भाजीपाला विक्रीवरील अडतही व्यापार्‍यांकडून घेण्याबाबत आदेश दिला आहे. शासनाच्या या आदेशाविरुद्ध व्यापार्‍यांकडून बाजार समितीचे व्यवहार तीन वेळा बंद ठेवण्यात आले. दरम्यानच्या काळात बाजार समित्या सुरू झाल्या आहेत. मात्र येथे शेकडा १0 टक्के दराने शेतकर्‍यांकडून अडत कपात करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हमाली व इतर खर्चही शेतकर्‍यांकडूनच वसूल करण्यात येत आहे. खामगाव ही बुलडाणा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ आहे. येथे जिल्हाभरातून नव्हे, तर इतर जिल्ह्यातूनही भाजीपाला विक्रीस येतो. भाजीपाला हे नियमनमुक्त असतानाही खामगावात १0 टक्के दराची अडत शेतकर्‍यांकडून कपात करण्यात येत असल्याने शेतकर्‍यांमध्ये ताराजी व्यक्त केली जात आहे. शेतकर्‍यांना दिली जाते कच्ची पावतीभाजीबाजारात सध्या शेतकर्‍याला अडत दुकानाच्या परवान्याची पावती न देता कोर्‍या पावतीवर हिशेब लिहून दिला जात आहे. या हिशेबामध्ये १0 टक्के अडत कपातीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच हमाली व इतर खर्चही कपात करण्यात आला आहे. याबाबत शेतकर्‍यांना विचारणा केली असता नेहमीच शेतमाल विकायला आणावा लागतो. त्यामुळे अडत्यांशी वैर नको, अशी प्रतिक्रिया शेतकर्‍यांकडून येत आहे. -"शासनाच्या अध्यादेशानुसार भाजीपाला विक्री करताना अडत घेता येत नाही. अडत घेणार्‍या व्यापार्‍यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी शेतकर्‍यांनी पुढे येण्याची गरज आहे. अशा व्यापार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे शेतकर्‍याचे नावही गोपनीय ठेवण्यात येईल."- एम.ए. कृपलानीसहायक निबंधक, खामगाव.